शिरपूर : तालुक्यातील बाळदे येथील ५० वर्षीय एका शेतकऱ्याने बँकेतून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडता आल्यामुळे तसेच शेतीत उत्पन्न न आल्यामुळे या त्रासाला कंटाळून गिधाडे तापी पूलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली़२८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ बाळदे येथील दिलीप हिलाल पाटील यांनी शेतीकामासाठी बँकेतून कर्ज घेतले होते़ तसेच गतवर्षी अति पावसामुळे कपाशीचे पिक वाया गेले, झालेला खर्च सुध्दा निघाला नाही़ या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वत:ची दुचाकी गाडी घेवून ते गिधाडे तापी पूलावर गेलेत़ बाजूला गाडी उभी करून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली़पूलावरून ये-जा करणाऱ्यांनी सदरची घटना गिधाडे गावात सांगितली़ त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पूलावर जावून गाडी कुणाची आहे याची खात्री केली असता ती गाडी बाळदे येथील असल्याचे निष्पन्न झाले़त्यानंतर सावळदे येथील पट्टीचे पोहणाºयांना बोलावून नदी पात्रात शोध घेतल्यानंतर दिलीप पाटील यांचे शव मिळून आले़ शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़मयत शेतकरी दिलीप पाटील यांना एकलुता मुलगा आहे़ २२ वर्षीय असलेला हा तरुण एका ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी काम करतो़ सततची नापिकी आणि अवकाळी पावसामुळे हातचे पीक गेल्याने वैफल्यग्रस्त असलेल्या या शेतकºयाने तापी नदीत स्वत:ला अर्पण करुन टाकल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरु होती़ तसेच या शेतकºयाला दोन मुली असून त्यांचे विवाह झाले आहेत़अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाळदे गावावर एकप्रकारे शोककळा पसरली आहे़ मयत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे़वाघाडी येथे एकाचा मृत्युवाघाडी येथील २१ वर्षीय अर्जून ज्योतीलाल कोळी याने २७ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली़ मयत अवस्थेत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला आहे़
तापीत उडी घेऊन संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:02 PM