धुळे : गेल्या काही वर्षापासून भटक्या कुत्र्यांसह मुख्य रस्त्यावर गुरांचा उपद्रवामुळे धुळेकरांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ महापालिकेकडून उपाय-योजना नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे़भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण होत नसल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांमध्ये प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. याचाच त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. गल्लो-गल्लीत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्लेही लोकांवर दिवसेंदिव वाढतच चालले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्यावरून चालणे भटक्या कुत्र्यांनी कठीण केले आहे. शहराच्या काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस चोरांसारखे भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक धावू लागतात. यामुळे अपघातही घडले आहेत. दहा वर्षात वाढलेल्या श्वानांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़गुरांची समस्या वाढलीशहरातील पाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात गुरे बिनदिक्कतपणे फिरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते. त्यात गायींचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर फिरतात. चौकात भाजीपाला विक्रेते असल्याने भाजी विक्रेते उरलेला भाजीपाला तेथे फेकत असल्याने येथे जनावरांची गर्दी होते. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात येते़ त्यानतंर गुरांच्या मालकावर कारवाई केली जाते़वाहतुक कोंडीचा मनस्तापशहरातील मुख्य रस्त्याच्या मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी सकाळ- संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होते़
मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांनी केला ‘कब्जा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:16 PM