शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

धुळे तालुक्यात ‘युरिया’चा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:41 PM

राम भदाणे : शेतकऱ्यांना दिला जातोय फुकटचा सल्ला

धुळे : धुळे तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण होऊ पहात आहे़ त्याअनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर खते उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी केली आहे़ दरम्यान, काही कृषी सेवा केंद्राकडून शेतकºयांना पर्यायी खतांचा फुकटचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही भदाणे यांनी केला आहे़धुळे तालुक्यासह जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांची पेरणी झाली असुन पिके जोमाने शेतात डोलत आहे. पिकांना युरिया खताची मात्रा देण्याची गरज असताना मात्र धुळे तालुक्यातील कृषी केंद्रासह शहरातीत कृषी केंद्रांमध्ये युरीया खताचा साठा संपला आहे असे सांगण्यात येत आहे़ ऐन वेळेवर युरिया मिळत नसल्याने शेतकºयांना पर्यायी खतांचा फुकटचा सल्ला कृषी सेवा केंद्र संचालकांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे जे खत आहेत त्याचा देखिल साठा संपण्याचा धाक दाखवत आहे. युरीयाची १ बॅग घेण्यासाठी इतर खतांच्या ६ बॅगा घ्यावा लागत आहेत. तरी देखील युरिया चढ्यादराने मिळत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रामदादा भदाणे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे युरिया खत तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली आहे व चढ्यादराने खत विकणाºया कृषी केंद्रावर व खत असून न देणाºयांवर कडक कारवाईची मागणी भदाणे यांनी केली आहे.खरीप हंगामातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला या पिकांचा हंगाम सुरू आहे. पावसाचे प्रमाण साधारण असले तरी सर्व पिके वाढीला लागली आहेत. पिकांच्या योग्य वाढीसाठी त्यांना खतं देण आवश्यक आहे. कपाशीला खताची पहिली मात्रा मिळाली असुन दुसºया मात्रेत खत देण्यासाठी खतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, अशातच धुळे तालुक्यासह कृषी केंद्रात युरिया खतांचा साठाच संपल्याने आता वेळेवर शेतकºयांची धावपळ होत आहे. युरीया नसल्याचे सांगून अन्य खत फॉस्परस, मॅग्नेशीयम, पोटॅश, डी.ए.पी. बरोबरच अन्य खत घेण्याचा सल्ला कृषी केंद्र संचालक देत आहेत़ ६ बॅगांमागे १ युरीयाची बॅग ती पण चढ्यादराने देत आहे. अशी खंत शेतकºयांनी बोलवून दाखवली आहे. तसेच शेतकºयांना कृषी केंद्र संचालक इतर खते देखिल संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती घालुन खते विक्री करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे व भरारी पथके नेमून संबंधीतांनावर कारवाई करावी, अशी मागणी भदाणे केली आहे.शेतकºयांपुढे समस्याचप्रत्येक वर्र्षी हंगामाच्या सुरवातीला मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध असतो. परंतु जेंव्हा पिकांना आवश्यकता भासते त्याचेळेस दुकानातील युरिया संपल्याचे नेहमीचेच झाले आहे. कोरोनाच्या काळात कृषी साहित्याबरोबर बी-बियाणे, खतं अणि मजुरांची मजुरी वाढली आहे. त्यात आता खतांचा पुन्हा तुटवडा निर्माण केला जात असल्याने शेतकºयांंनी काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे