शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

युरिया खताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:22 PM

शिंदखेडा तालुका : ऐन गरजेच्या वेळी टंचाई, शेतकऱ्यांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा/ मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे. युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकºयांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.मालपूरसह परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण फिरत आहेत. मात्र, साधे खत देखील उपलब्ध होत नाही. यातच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.गरज नसताना खते उपलब्ध असतात. मात्र, गरजेच्या वेळीच नेमका खतांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. येथे गेल्या आठवड्यापासून युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ आदी खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. यामुळे येथील शेतकरी खत घेण्यासाठी दोंडाईचा येथे जात आहेत. मात्र त्यांना तेथेही खत मिळत नाही. तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खते लिंक पध्दतीने विक्री करीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तसेच याबाबत कृषी विभागाशी संपर्क करुनही समाधान होत नसल्याचे मालपूर परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे.कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. त्याला येथील शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली. मात्र, त्याचे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नाही.मालपूर येथे युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ खतांचा साठा संपला असून रॅक लागल्यावरच खते मिळतील, असे येथील दुकानदार सांगत आहेत. मात्र तो साठा येथील क्षेत्रफळाच्या तुलनेत खुपच कमी असतो. दोन ते तीन टन खत मिळते. मात्र, ते पुरत नसल्यामुळे येथे नेहमीच खतांची टंचाई जाणवत असते. शेतकरी मागतील ते बियाणे व हवे तेवढे खत शेतकºयाना मिळाले पाहिजे, यासाठी पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खताची विक्री करणे, हा दरवर्र्षीचा प्रकार आहे. मात्र त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना सर्रास नाडले जात आहे.येथील बागायती व कोरडवाहू कापसाला खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार आदी ठिकाणी वणवण फिरत आहेत. मात्र, सद्यस्थितीत कुठेही खत सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बांधावर खत योजनेचा पुरता फज्जा उडाला असून दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल, असे म्हणण्याची वेळ येथील शेतकºयांवर आली आहे. शेतकºयांना त्वरित युरिया व खताची उपलब्धता करुन द्यावी.