शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

देशाचे उपपंतप्रधानपद व गृहमंत्रिपद भूषविणारे दयनीय अडवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:43 IST

सत्तेतली पदे गेली की मोठी माणसेही किती अगतिक आणि लाचार होतात याचे लालकृष्ण अडवाणींएवढे मोठे वा लहान उदाहरण दुसरे नाही. परवा अहमदाबादला झालेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसलेले त्यांचे चित्र कमालीचे दयनीय व दीनवाणे होते.

सत्तेतली पदे गेली की मोठी माणसेही किती अगतिक आणि लाचार होतात याचे लालकृष्ण अडवाणींएवढे मोठे वा लहान उदाहरण दुसरे नाही. परवा अहमदाबादला झालेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसलेले त्यांचे चित्र कमालीचे दयनीय व दीनवाणे होते. एकेकाळी भाजपाचे अध्यक्षपद भूषविलेला आणि आपल्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेने सारा देश ढवळून काढणारा हा नेता आज कोणाच्याही खिजगणतीत नाही. कोणी त्याला विचारत नाहीत, पक्षातील पुढारी त्याच्याकडे पाहत नाहीत आणि संघाच्या नजरेतही ते निकामी झाले आहेत. रथयात्रेच्या काळात अडवाणींचे नाव पंतप्रधानपदासाठी सर्वात पुढे होते. त्यांच्या पत्नी कमलादेवी यांनी त्या काळात ‘भावी पंतप्रधानांची पत्नी म्हणून मला कसे वाटते’ या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरही दिले होते. पुढच्या काळात अडवाणींनी वाजपेयींचे नाव पुढे करून मनाचा मोठेपणा दाखविला. वाजपेयी पंतप्रधान आणि अडवाणी उपपंतप्रधान झाले. मात्र २००४ च्या निवडणुका त्यांच्या पक्षाला जिंकता आल्या नाहीत आणि त्यांना विरोधात बसावे लागले. विरोधी नेते म्हणूनही त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका बजावली. मात्र २००९ च्या निवडणुकीत त्यांना पुन: पराभव पहावा लागला. येथून त्यांचे ग्रह फिरले. प्रथम संघाने त्यांना पक्षाध्यक्षपद सोडायला लावून त्यांच्याजागी नितीन गडकरी यांची नियुक्ती केली. लोकसभेतील त्यांचे विरोधी पक्ष नेतेपदही पक्षाने काढले व ते सुषमा स्वराज यांना दिले. पुढे गडकरी पायउतार झाल्यानंतरही संघाने अडवाणींचा विचार केला नाही. त्याने ते पद राजनाथसिंगांना दिले. २०१४ ची निवडणूक ही त्यांची अखेरची संधी होती. पण ती त्यांच्याकडून मोदींनी हिरावली. या निवडणुकीत अडवाणींना भोपाळमधून लोकसभेवर निवडून जायचे होते परंतु मोदींनी त्यांना अहमदाबादेत बांधून ठेवले. नंतरच्या काळात त्यांची नुसती उपेक्षाच झाली. त्यांना राष्टÑपतिपद नाकारले गेले. पक्षात ज्याचा सल्ला घेतला जात नाही अशा एका सल्लागार किंवा मार्गदर्शक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आणि आता तर त्यांचा सल्ला कोणी घेतही नाही. त्यांना कोणी भेटत नाही आणि त्यांनाही कुणाला बहुधा भेटावेसे वाटत नाही. आपले नाव व जुने नेतृत्व याची ओळख टिकवायला ते कोणत्या ना कोणत्या समारंभात दिसतात. मात्र त्यातही त्यांची कोणी वास्तपुस्त करताना दिसत नाही. मध्यंतरी राहुल गांधींनी त्यांच्याशी विमानतळावर चर्चा केली तेव्हा त्याच्या विपर्यस्त बातम्याच तेवढ्या भाजपाच्या माध्यमांनी प्रकाशित केल्या. तेव्हापासूून विपक्ष नाही आणि स्वपक्षही नाही. अडवाणी एकटे आहेत. देशाचे राजकारण दीर्घकाळपर्यंत करणारा, त्यात मध्यवर्ती म्हणावी अशी भूमिका बजावणारा, देशाचे उपपंतप्रधानपद व गृहमंत्रिपद भूषविणारा आणि आता सर्वच पक्षांना समान आदरणीय वाटणारा हा नेता सध्या कुठे दिसला तरी दयनीय वाटावा अशी त्याची स्थिती आहे. सत्ता ही एक अविश्वसनीय आणि कृतघ्न अशी बाब आहे. ती नव्यांचा आदर जेवढ्या जोरात करते तेवढ्याच जोरात ती जुन्यांना विसरते. अडवाणींच्या वाट्याला सत्तेचे हे कृतघ्नपण आले आहे. त्यांनी आत्मचरित्र लिहिले. पण ते गाजले नाही. त्यातल्या चुकीच्या बाबींचीच चर्चा फार झाली. त्यातून मोदींच्या सरकारने त्यांना अयोध्या प्रकरणात आरोपींच्या रांगेत उभे केले आहे. तो खटला दीर्घकाळ चालेल आणि त्याचा निकाल आरोपींच्या बाजूनेच दिला जाईल हे उघड आहे. पण देशाचा राष्टÑीय राहिलेला नेता त्याच्या अखेरच्या काळात ‘आरोपी’ म्हणून उभा असलेला दिसावा, साºयांनी त्याची उपेक्षा करावी आणि हे सारे त्याला मुकाटपणे सहन करताना पहावे लागावे ही स्थितीच कमालीची वेदनादायक आहे. त्यांच्या चाहत्यांना ती जेवढी दु:खदायी तेवढीच त्यांच्या विरोधकांनाही खिन्न करणारी आहे.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी