शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कठीण परिस्थितीतून कर्नाटक राज्याला अग्निपरीक्षा द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 05:41 IST

आपल्याला वयानुसार थोड्या मर्यादा येतात म्हणून विजयेंद्र मदत करतो, असे सांगत येडियुरप्पा यांनी हस्तक्षेप मान्य केला आहे.

अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या बांधणीसाठी आणि सत्तेवर आल्यावर पायाला भिंगरी बांधून सतत राज्यभर फिरणारे येडियुरप्पा रविवारीच पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत येऊन गेले होते. सोमवार, २६ जुलै रोजी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार होती. त्यानिमित्त विधानसौधाच्या भव्य सभागृहात समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या समारंभात सरकारच्या कामगिरीचे वर्णन ऐकण्याऐवजी येडियुरप्पा यांच्या अश्रूंना वाट काढून देत केलेल्या भाषणाने समारंभ संपवावा लागला. ‘माझी ही दोन वर्षे म्हणजे अग्निपरीक्षाच होती,’  असे सांगून पद सोडण्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले.

चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले येडियुरप्पा यांना अशाच कारणांनी किंबहुना आरोपांमुळे सत्ता सोडावी लागली होती; पण कर्नाटकातील भाजप म्हणजे मी आणि मी म्हणजे कर्नाटकातील भाजप ! असा समज करून घेतलेल्या येडियुरप्पा यांना पक्षश्रेष्ठी हात लावतील, असे वाटले नव्हते. वय वाढत असताना त्यांना मर्यादा येत होत्या. त्यासाठी आपले सुपुत्र बी.वाय. विजयेंद्र यांची ते मदत घेत होते. मात्र, ते पर्यायी मुख्यमंत्री कधी झाले, याचा अंदाज येडियुरप्पा यांना आला नाही. पूर्वीदेखील औद्योगिक वसाहतीतील भूखंडाच्या हस्तांतरात नातेवाइकांचा हात असल्याचा आरोप झाला होता आणि त्यांच्या विश्वासू सहकारी शोभा करंदलाजे यांच्या सरकारमधील हस्तक्षेपाची भाजपमध्ये खदखद होती.

शोभा करंदलाजे आता खासदार असून, नुकत्याच केंद्रीय मंत्रीदेखील झाल्या आहेत. येडियुरप्पा यांनी काँग्रेस आणि जनता दलातून आयात केलेल्या आमदारांना निवडून आणून सर्वांना मंत्रिपदे दिल्याचा राग अनेक भाजप आमदारांना होता. ज्यांच्याविरुद्ध लढताना हरलो तेच भाजपमध्ये येऊन सत्ताधीश झाल्याचा तो राग होता. बसवनगौडा पाटील यत्नाळ, ए. एच. विश्वनाथ, सी. पी. योगेश्वर आदी आमदार मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप करीत होते. त्यांच्या आरोपांची पक्षश्रेष्ठींनी चौकशी केली नाही, तसेच त्यांना बोलण्यापासून रोखलेही नाही. बी. वाय. विजयेंद्र हे सरकार चालवितात. येडियुरप्पा नावाला मुख्यमंत्री आहेत, असा आरोपही ते करीत होते. वास्तविक या बंडखोरांचा संताप बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिल्याचा होता.

भाजपचे शिमोगा जिल्ह्यातीलच मातब्बर नेते आणि ग्रामीण विकासमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार करून मुख्यमंत्री माझ्या खात्यात हस्तक्षेप करतात, असा आरोप केला होता. भाजपने अलीकडे वयाची ७५ वर्षे झालेल्यांना सत्तापदे द्यायची नाहीत, असा निकष लावला आहे. त्याप्रमाणे ७७ वर्षीय येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार नव्हते. मात्र, दक्षिणेकडील एकमेव राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यात येडियुरप्पा यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना नाकारता आले नाही. शिवाय कर्नाटकातील सर्वात मोठा समाज लिंगायत आहे. येडियुरप्पा त्या समाजातून येतात, शिवाय लिंगायत समाज आणि मठाधिपती त्यांना मानतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी (मठाधिपती) बंगलोरमध्ये अधिवेशन घेऊन येडियुरप्पा यांना पदावरून हटवू नये, अशी जाहीर मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.

BIG BREAKING: Karnataka CM BS Yediyurappa resigns, says 'people lost trust in us'

आपल्याला वयानुसार थोड्या मर्यादा येतात म्हणून विजयेंद्र मदत करतो, असे सांगत येडियुरप्पा यांनी हस्तक्षेप मान्य केला आहे. भाजपला बहुमत नसताना सरकार स्थापन करून काँग्रेस आणि जनता दलाच्या एकूण सोळा आमदारांना गैरहजर ठेवून बहुमत शाबित केले. त्या सोळा आमदारांनी राजीनामे दिले. त्यापैकी पंधरा जणांना उमेदवारी दिली. चौदा जण निवडूनही आले. त्यापैकी बारा जणांना मंत्रिपद दिले. आता एप्रिल २०२३ पर्यंतची चिंता मिटली असे येडियुरप्पा यांना वाटत होते; पण बंडखोरांनी सातत्याने हल्ले चालू ठेवले, त्यातून येडियुरप्पा यांना अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागले. आता कर्नाटकचे सरकार अस्थिर झाले आहे. पर्यायी सरकार स्थापन करण्याइतके काँग्रेस आणि जनता दलाकडे बळ नाही. येडियुरप्पा यांना सरकारबाहेर ठेवताना त्यांच्या मर्जीतील नेत्यालाच मुख्यमंत्रिपद द्यावे लागेल. हा सत्तामेळ घालणे कठीण होणार आहे. मावळत्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना प्रशासनाचा वकूबही नव्हता. त्यातील अनेकजण प्रथमच थेट कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांना सांभाळून सरकारची बाजू ठामपणे मांडण्यासारखी येडियुरप्पा यांची शारीरिक क्षमता राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीतून कर्नाटक राज्याला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. शिवाय ज्याला लोकनेता म्हणता येईल, असा नेता भाजपमध्ये येडियुरप्पावगळता कोणी नाही, हे वास्तव आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा