शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

पुन्हा ‘कोमागाटा’!

By admin | Published: May 23, 2016 3:50 AM

शाळेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना कोमागाटा मारू हे नाव कानावरून गेल्याचे अनेकांना अंधुक का होईना, आठवत असेल. कोमागाटा मारू हे वाफेवर चालणारे जपानी

शाळेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना कोमागाटा मारू हे नाव कानावरून गेल्याचे अनेकांना अंधुक का होईना, आठवत असेल. कोमागाटा मारू हे वाफेवर चालणारे जपानी जहाज तब्बल एक शतकानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी कोमागाटा मारू प्रकरणासाठी, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात माफी मागितली. कॅनडामध्ये स्थायिक झालेले शीख बांधव गत एक शतकापासून त्यासाठी लढा देत होते. यापूर्वी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनीही या प्रकरणी एका भाषणादरम्यान क्षमायाचना केली होती; मात्र क्षमायाचना संसदेत व्हावी आणि ती ‘रेकॉर्ड’वर यावी, यासाठी शीख समुदायाने लढा सुरूच ठेवला होता. त्यांच्या त्या अविरत लढ्याला अखेर यश मिळाले. कोमागाटा मारू हे जपानी जहाज २३ मे १९१४ रोजी कॅनडातील व्हॅँकुव्हर शहराच्या किनाऱ्याला लागले होते. जहाजात पंजाबमधील ३७६ उतारू होते. त्यापैकी केवळ २४ जणांना कॅनडा सरकारने देशात दाखल होण्याची परवानगी दिली आणि उर्वरित ३५२ जणांना तब्बल दोन महिने जहाजातच अडकवून ठेवल्यानंतर भारतात परत धाडले. स्वातंत्र्य, समृद्धीची स्वप्ने मनाशी रंगवत मोठ्या हुरुपाने कॅनडाला पोहोचलेल्या त्या दुर्दैवी जिवांच्या नशिबाचे दशावतार तिथेच संपले नाहीत, तर भारतात परतल्यानंतर कोलकाता बंदरात जहाजातून खाली उतरत असताना, ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १९ जण ठार झाले होते. काही जण पलायन करण्यात यशस्वी ठरले; पण इतरांना पकडून एक तर तुरुंगात डांबण्यात आले, किंवा प्रथम महायुद्ध संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले. कॅनडा सरकारची ती कृती स्वत:च्या कायद्याला खुंटीवर टांगणारी तर होतीच; पण अत्यंत अमानवीयही होती. कोमागाटा मारूवरील प्रवाशांना देशात दाखल झालेल्या निर्वासितांचा दर्जा प्राप्त होऊ नये, यासाठी तत्कालीन कॅनडा सरकारने जहाजाला जाणीवपूर्वक किनाऱ्यापासून दूर तर लोटलेच; पण प्रवाशांना अन्न, पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूही नाकारल्या होत्या. युरोपातून लाखो लोक कॅनडात स्थायिक होण्यासाठी येत असताना, तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातील निर्वासितांना देशात प्रवेशच द्यायचा नाही, असेच धोरण कॅनडा सरकारने त्यावेळी स्वीकारले होते. कोमागाटा मारू अध्याय हा त्या वंशविद्वेशी धोरणाचाच परिपाक होता. कॅनडाच्या इतिहासातील तो एक काळाकुट्ट डाग आहे. तब्बल एक शतक उलटून गेल्यानंतर, माफी मागून तो डाग धुण्याचा प्रयत्न पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला आहे. ट्रुडो यांच्या माफीनाम्यामुळे कोमागाटा मारूवरील प्रवाशांना कोणताही फरक पडू शकत नाही. ते सगळे त्या पलीकडे निघून गेले आहेत; पण काळ सूड उगवत असतो म्हणतात! ज्या शीख समुदायातील लोकांना एक शतकापूर्वी कॅनडाने प्रवेश नाकारला होता, तोच समुदाय आज कॅनडाच्या अर्थकारणाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका अदा करीत आहे. ट्रुडो यांच्या माफीनाम्याला तो कंगोरा आहेच; पण तरीही त्यांनी ज्या दिलदारपणाचा परिचय दिला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे!