शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

अजातशत्रू अन् निष्ठावान नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:42 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या भावना...

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या भावना...भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाल्याचे कळले आणि मला धक्काच बसला. अनेक आठवणींचा पट उलगडला गेला. भावना दाटून आल्या. दिवंगत प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे आणि भाऊसाहेबांनी मला आणि भाजपामधील माझ्यासारख्या नंतरच्या पिढीतील अनेक जणांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि दिलेले प्रोत्साहन यातून आम्ही घडत गेलो. भाऊसाहेब स्वत: एक हाडाचे कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून ते तयार झाले आणि नंतर त्यांनी जनसंघ व भाजपाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. ४०-४५ वर्षे संघटना व पक्षनिष्ठेची वाट ते अविरत चालत राहिले. त्यातील अनेक वर्षांचा मार्ग हा कंटकीच होता; पण एका ध्येयाने प्रेरित भाऊसाहेबांसारखे कार्यकर्ते इतके भारावून गेलेले होते की त्यांना त्या काटेरी मार्गाची तमा नव्हती. मी अनेक वर्षे भाऊसाहेबांना जवळून पाहत आलो. जनसंघ, भाजपावरील त्यांचे निस्सीम प्रेम तर वादातीत होतेच पण रा.स्व. संघ हा त्यांच्यासाठी जीव की प्राण होता. मी अनेकदा बघितले की कोणत्याही बाबतीत संघाचा शब्द त्यांच्यासाठी अंतिम असे आणि त्या पलीकडे ते कधीही विचार करीत नसत. पक्षाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण पक्षाला काय दिले याचाच विचार त्यांच्या ठायी असे. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच त्यांना माहिती होते. पदांचा मोह त्यांनी कधीही बाळगला नाही. एखादी जबाबदारी मिळाली नाही म्हणून त्यांनी कधी आक्रस्ताळेपणादेखील केला नाही. मनाच्या विरुद्ध निर्णय झाला तरीही ते पक्षासोबतच राहायचे. पक्षाशी प्रतारणा करण्याचा विचार त्यांना कधी शिवलादेखील नाही.गोपीनाथराव आणि भाऊसाहेबांचा एकमेकांशी प्रचंड स्नेह होता. दोघांनी खांद्याला खांदा लाऊन भाजपाला प्रचंड उभारी दिली. तळागाळातील कार्यकर्ते जोडण्याचे मोलाचे कार्य केले. ‘शत प्रतिशत भाजपा’ हा नारा भाऊसाहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी दिला. तेव्हा ते अशक्यप्राय वाटत होते. युतीमध्ये भाजपाची भूमिका लहान भावाची होती आणि शिवसेनेपेक्षा आपण पुढे कसे जाऊ शकतो व ‘शत प्रतिशत’ कसे काय होऊ शकतो अशी शंकाही होती; पण, भाऊसाहेबांच्या त्या घोषणेने नवा विश्वास दिला. पक्ष मोठा करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी होता.आमगाव ते खामगाव ही शेतकरी दिंडी त्यांनी काढली होती. महादेवराव शिवणकर, अरुणभाऊ अडसड हेही होते. त्या दिंडीने भाऊसाहेबांना राज्यव्यापी नेतृत्व मिळवून दिले. ते हाडाचे शेतकरी होते. कापूस पणन महासंघाचे ते अध्यक्ष होते तेव्हा कापूस एकाधिकार योजना त्यांनी चांगल्या पद्धतीने राबविली. त्यातील भ्रष्टाचार बराच कमी करून पारदर्शकता आणली होती. ते अजातशत्रू होते. ज्या काळात राज्य सहकारी बँकेवर भाजपाचे कोणी निवडून येऊ शकत नव्हते तेव्हा ते बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवडून यायचे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील त्यांनी अतिशय चांगली भूमिका वठविली. ते सरकारवर जोरदार हल्ले चढवायचे पण त्याचवेळी त्यांनी कुणाशी कटुता येऊ दिली नाही. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये त्यांना मोठा मानसन्मान होता.ते वारकरी होते. आषाढीला दरवर्षी नित्यनेमाने ते पंढरपूरला जात. पंढरीच्या वाटेने जाणाऱ्या हजारो-लाखो कष्टकºयांच्या भावभावना आणि त्यांचे दु:ख जाणणारा व ते दूर करण्यासाठी मी काय करू शकतो याचा सातत्याने विचार करणारा हा नेता होता. कृषी व सहकार क्षेत्राचे त्यांना सखोल ज्ञान होते. कृषिमंत्री म्हणून ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अशी अतिशय चांगली योजना त्यांनी तयार केली. शेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला. मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनांचे आयोजन करून शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा आग्रह होता. कृषी क्षेत्रातील अडचणींवर मात करून प्रगतीकडे नेण्यासाठी कृषिमंत्री म्हणून ते अविरत कार्यरत होते.एक सामान्य कार्यकर्ता, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध भूमिकांमध्ये भाऊसाहेब वावरले; पण त्यांच्या वागण्याबोलण्यातील वºहाडी बाज आणि साधेपणा तीळमात्रही कमी झाला नाही. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडविले; मोठे केले; पण ते करत असताना त्याचे श्रेय त्यांनी स्वत:कडे घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. भाजपाला बहुजन चेहरा देण्यात भाऊसाहेबांचा मोठा वाटा होता. त्यांच्यासारखे नेते ध्येयपथावर निरंतर चालत राहिले म्हणूनच पक्षाला आज विशाल रूप मिळाले. त्यांच्या अकाली निधनाने राज्य भाजपाला एक पोरकेपणच आले आहे. सामान्यांशी नाळ जुळलेला निष्ठावंत नेता म्हणून भाऊसाहेबांची उणीव कायम भासत राहील.

(शब्दांकन : यदु जोशी)

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकर