शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

‘आमची सारी स्वप्नं मरून गेलीत !’ जिवंत राहायचंय?- प्रत्येकाने बंदूक उचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 06:51 IST

सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश. एक दशकापेक्षा जास्त काळ उलटला, इथला रक्तपात आणि हिंसाचार अजून थांबलेला नाही. लोक दारिद्र्याच्या खाईत तर लोटले गेलेच, पण आपल्या जीवनाचीही त्यांना शाश्वती राहिलेली नाही.

दहा वर्षांपूर्वी १५ मार्च २०११ रोजी सीरियाच्या डेरा या शहरात लोकशाहीवादी लोकांनी पहिल्यांदा आंदोलन केलं. सीरिया आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तेव्हा ‘अरब स्प्रिंग’च्या नावाखाली ठिकठिकाणी आंदाेलनं झाली. सीरियातील उठाव हादेखील त्याचाच एक भाग होता. लोकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारनं लोकांवर अत्याचार सुरू केले आणि एका रक्तरंजित प्रवासाला सुरुवात झाली. विरोधकांनीही या आगीत तेल ओतलं. सरकार आणि विरोधक यांच्यात एक गृहयुद्धच सुरू झालं. आंदोलन जसजसं वाढत गेलं, तसतसं लोकांवरचे अत्याचारही वाढत गेले. कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरत विदेशी शक्तीही या युद्धात उतरल्या. त्यांनी सिरियात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि सैनिक पाठवायला सुरुवात केली. ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘अल कायदा’सारख्या अतिरेकी संघटनांनही यात उडी घेतली आणि संघर्ष आणखी जोरात सुरू झाला. सर्वसामान्य नागरिकांच्या हालाला पारावार राहिला नाही. मानवाधिकाराचं इतकं उल्लंघन झालं की संयुक्त राष्ट्रसंघानंही त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. सीरियातील युद्धाला दहा वर्षं पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरस म्हणाले, सीरियात इतका खूनखराबा झाला, लोकांवर इतके अत्याचार झाले, पण ही दडपशाही करणाऱ्यांवर ना कारवाई झाली, ना त्यांना अटक झाली. ही फार मोठी शोकांतिका आहे.अमेरिकेनं सीरियातून आपलं सैन्य मागे घेतलं, तर लगेच त्यांच्यावर तुर्कस्ताननं हल्ला केला. हजारो तुर्कस्तानी घुसखोरांनी सीरियात प्रवेश केला. सीरियन लोक या सततच्या अत्याचाराला आणि हिंसाचाराला आता कंटाळले आहेत. पण त्यांनाही त्याविरुद्ध उभं राहण्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठी नागरिक स्वत:च सैन्यात भरती होऊ लागले. त्यासाठी ‘नागरिक सेना’ही स्थापन झाली. महिला आणि पुरुष या नागरिक सेनेत आता मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

सीरियात महिलांचं जिणं अजूनही मोठं दुष्कर आहे. अनेक महिलांना ना शिक्षण, ना कोणाचा आधार. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुढार्थानं शिक्षण घेतलेलं नसलं तरी आपल्या देशात होणाऱ्या संघर्षाला आता त्याही विटल्या आहेत आणि नागरिक सेनेत सामील होऊन त्यांनीही हाती शस्त्रं उचलली आहेत. गेल्या दोन वर्षांत तब्बल एक हजार महिला या सेनेत सामील झाल्या आहेत. त्या ना कधी शाळेत गेल्या, ना कधी त्यांना तशी संधी मिळाली, पण आता वेळ येताच, देशाच्या बाजूनं लढायला रक्त सांडायला त्या तयार झाल्या आहेत. त्यासाठीचं खडतर प्रशिक्षणही त्यांनी घेतलं आहे.

याच सैन्यात सहभागी झालेली २६ वर्षांची जिनाब सेरेकानिया म्हणते, आमच्या पाच जणांच्या कुटुंबात मी एकुलती एक मुलगी. मला शिकायची, शाळेत जायची खूप इच्छा होती, पण माझ्या भावांप्रमाणे शाळेत जाण्याची आणि शिकायची संधी मला मिळाली नाही. आईप्रमाणेच शेतात जाऊन राबणं हेच माझ्या नशिबी होतं, पण देशात होत असलेल्या अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध माझ्या मनात प्रचंड चीड होती. ‘लढायची’ खुमखुमी होती. म्हणून मी नागरिक सेनेत सहभागी झाले. २०१९ मध्ये अमेरिकी सैन्यानं सीरियातून काढता पाय घेतला. तुर्कस्ताननं ही संधी साधली आणि आमच्यावर आक्रमण केलं. आमच्या आसपास बॉम्ब पडायला लागले. आमचं शहर आम्ही डोळ्यांसमोर जळताना पाहिलं. रस्त्यांवर इतस्तत: पडलेल्या मृतदेहांमधून पळत वाळवंटात आम्ही आश्रय घेतला. या घटनेनंतर मीही ठरवलं, आपणही आता हातात बंदूक घ्यायची आणि मी नागरिक सेनेत दाखल झाले!”

ब्रिटनची संस्था ‘सीरियन ऑब्जरवेटरी फॉर ह्यूमन राइट्स’ (एसओएचआर) यांच्या मते २०११ ते २०२० या काळात जवळपास चार लाख लोक मारले गेले. त्यात एक लाख वीस हजार सामान्य लोक होते. दोन लाखांच्या वर नागरिकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. तब्बल २१ लाखांपेक्षा जास्त लोकांना कायमचं अपंगत्व आलं. जवळपास निम्म्या लोकांना आपलं घर सोडावं लागलं. ५६ लाख लोकांनी विदेशात आश्रय घेतला, तर देशातीलच ६७ लाख लोक आपल्याच देशात दुसरीकडे स्थलांतरित झाले. परदेशात गेलेल्या लोकांपैकी ९३ टक्के लोकांनी लेबनॉन, जॉर्डन आणि तुर्कस्तानमध्ये आश्रय घेतला. २०२०पर्यंत तब्बल दहा लाख सीरियन मुलांनी देशाच्या बाहेर जन्म घेतला. महागाई गगनाला पोहोचली. 

‘आमची सारी स्वप्नं मरून गेलीत !’ संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार सुमारे साठ लाख लोक आपल्या अत्यावश्याक गरजाही पूर्ण करायला सक्षम नाहीत. युनिसेफचं म्हणणं आहे, लहान मुलांचे सगळ्यात जास्त हाल आहेत. अनेक परिवारांकडे आता अक्षरश: काहीही राहिलेलं नाही. इदलिब या तरुणीनं सांगितलं, अगोदर आम्ही एकदम आलिशान घरात राहत होतो. आता आदिवासींप्रमाणे एका तंबूत राहतोय. आमच्याकडे काहीही नाही. आमची काही स्वप्नंही आता उरलेली नाहीत.