शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

मतदानासाठी सर्व पक्ष महिला विधेयकाच्या बाजूने; उमेदवारी देताना वस्तुस्थिती नेमकी उलटी 

By नंदकिशोर पाटील | Updated: October 2, 2023 12:54 IST

आजवरच्या सर्व निवडणुकांवर नजर टाकली तर महिलांना उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आपला हात आखडता घेतल्याचे दिसून येईल. 

संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात महिलांना राजकारणात संधी निर्माण करणारे ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. या निमित्ताने सभागृहात झालेल्या चर्चेचा एकमुखी सूर असा होता की सगळे पक्ष जणूकाय महिलांचे कैवारी आहेत! दोन खासदार (बहुधा, एमआयएम) वगळता सर्व पक्षीय खासदारांनी या महिला विधेयकाच्या बाजूने मतदान करून स्त्री दाक्षिण्याबाबतचा आपला कथित दावा पक्का करून घेण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु वस्तुस्थिती मात्र नेमकी उलटी आहे. आजवरच्या सर्व निवडणुकांवर नजर टाकली तर महिलांना उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आपला हात आखडता घेतल्याचे दिसून येईल. 

आजकाल तर उमेदवारी देताना त्या उमेदवाराची शैक्षणिक, सामाजिक पार्श्वभूमी आणि योग्यता लक्षात न घेता निवडून येण्याची क्षमता (इलेक्टिव्ह मेरिट) हा एकमेव निकष लावला जातो आणि हाच निकष महिलांच्या उमेदवारीआड येतो. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या ताज्या अहवालानुसार ४० टक्के विद्यमान खासदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यात २५ टक्के गुन्हे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. या उलट एकही गुन्हा दाखल नसलेल्या खासदारांमध्ये बहुसंख्य महिला आहेत! १९९६ साली बँडिट क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलन देवी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मालेगाव बाॅम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि सध्या जामिनावर असलेेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. राजकीय पक्षात सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांवर राजकीय स्वरूपाचे गुन्हे असू शकतात; मात्र इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अपवादात्मक महिला आढळून येतील.

१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यामानाने तत्कालीन राजकीय पक्षांनी पुरोगामी भूमिका घेत महिलांना मोठ्या संख्येने (४८ टक्के) उमेदवारी दिली होती. मात्र, साक्षरतेचा अभाव असलेल्या मतदारांनी महिला उमेदवारांना मते देताना संकुचित भूमिका घेतल्याने केवळ २४ महिला उमेदवार संसदेत पोहोचू शकल्या. या निकालाचा विपरीत परिणाम असा झाला की, पुढच्या (१९५७) च्या निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी महिलांना डावलले! १९९६ च्या निवडणुकीत तर देशभरातील तब्बल १३ हजार ९५२ उमेदवारांमध्ये फक्त ५९९ महिला उमेदवार होत्या! राजकीय पक्षांच्या याच मनोवृत्तीमुळे आजवर महिला आरक्षण विधेयक रखडले होते. डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात मांडले गेलेल्या विधेयकाला भाजपसह इतर पक्षांनी कसा खोडा घातला होता, हा इतिहास सर्वांना माहिती आहे.

महिलांबाबत एवढी राजकीय अस्पृश्यता का यावर ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वूमन असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी सुधा सुंदरम् म्हणतात, ‘‘जातीपातीची समीकरणे, आर्थिक सक्षमता, पुरुषी अहंकार, घराणेशाही यासारख्या तथाकथित ‘इलेक्टिव्ह मेरिट’मुळे महिलांना उमेदवारी नाकारली जाते. आता ३३ टक्के आरक्षणामुळे ही परिस्थिती बदलू शकते; पण तिथेही तेच मेरिट लावून तथाकथित घराण्यातील महिलांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’

मागील चार निवडणुकांवर नजर टाकली तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तुलनेने मागास समजण्यात येणाऱ्या राज्यातून सर्वाधिक महिला खासदार निवडून येतात, तर महाराष्ट्र, गुजरात, प. बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक या प्रगतिशील राज्यातील महिला खासदारांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्रात तर १९७१ पर्यंत एकही महिला खासदार नव्हती! मराठवाड्याचा विचार केला तर या प्रदेशातील महिलांना खासदारकी मिळण्यासाठी १९८४ पर्यंत वाट पाहावी लागली आहे. ८४ साली बीडमधून केशरकाकू क्षीरसागर निवडून आल्या. पहिल्या निवडणुकीपासून गेल्या ६७ वर्षांचा लेखाजोखा मांडला तर केशरकाकू क्षीरसागर, सूर्यकांता पाटील, रजनीताई पाटील, रूपाताई निलंगेकर, कल्पना नरहिरे आणि प्रीतम मुंडे अशा सहा जणींनाच खासदारकीचा मान मिळाला आहे.

मराठवाड्यातील महिला खासदार१९८४- केशरकाकू क्षीरसागर, बीड (काँग्रेस)१९९१- सूर्यकांता पाटील, नांदेड (काँग्रेस)केशरकाकू क्षीरसागर, बीड (काँग्रेस)१९९६- रजनीताई पाटील, बीड (काँग्रेस)१९९९- सूर्यकांता पाटील, हिंगोली (काँग्रेस)२००४- सूर्यकांता पाटील, हिंगोली (काँग्रेस)रूपाताई पाटील, लातूर (भाजप)कल्पना नरहिरे, उस्मानाबाद (शिवसेना)२०१४- प्रीतम मुंडे, बीड (भाजप)२०१९-प्रीतम मुंडे, बीड (भाजप)

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक