शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
4
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
5
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
6
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
7
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
8
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
9
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
10
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
11
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
12
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
13
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
14
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
15
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
16
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य
17
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
18
1 October New Rules : Aadhaar, PPF, इन्कम टॅक्सपासून एलपीजीपर्यंत; आजपासून देशात १० मोठे बदल; खिशावर होणार परिणाम
19
रिव्हॉल्वरचे लॉक अडकलं अन्...; अभिनेता गोविंदाला गोळी कशी लागली?
20
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल

भाष्य - अज्ञ प्रकाश आमटे?

By admin | Published: January 10, 2017 12:30 AM

ज्याला अति मागास म्हणून नेहमीच हिणवले जाते, त्या बिहार राज्यात जर संपूर्ण दारुबंदी होऊ शकते, तर मग महाराष्ट्रात ती का होऊ नये, असा प्रश्न

ज्याला अति मागास म्हणून नेहमीच हिणवले जाते, त्या बिहार राज्यात जर संपूर्ण दारुबंदी होऊ शकते, तर मग महाराष्ट्रात ती का होऊ नये, असा प्रश्न डॉ. प्रकाश आमटे यांना पडला असून तो अज्ञानमूलक आहे, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात दारुबंदी नाही हे त्यांना कोणी आणि कसे सांगितले बरे? आता संपूर्ण आणि अपूर्ण हा घोळ घालण्यात अर्थ नाही. हुंड्याच्या प्रथेवर, बालविवाहावर, सती जाण्यावर संपूर्ण बंदी आहेच की म्हणून हे सारे प्रकार थांबले असे थोडेच आहे? परवा एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्या दरम्यान दारुबंदीच्याच विषयावर जे ‘अहो रुपम, अहो ध्वनि:’ झाले त्यातील मोदींच्या गुजरातेत संपूर्ण दारुबंदी लागू झाली आहे असे म्हणणे म्हणजे दंतकथेला प्रोत्साहित करण्यासारखे आहे. महाराष्ट्रातून गुजरातेत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर जी दारुची दुकाने आहेत, त्यांची विक्री एकदा आमटे यांनी जातीने तपासून पाहावीत म्हणजे सारा उलगडा होऊन जाईल. पण सध्या मुद्दा महाराष्ट्राच्या दारु आणि तिच्यावरील बंदीचा आहे. तर महाराष्ट्रात ती आहेच. कोणालाही दारु विकत घेणे, बाळगणे, वाहून नेणे आणि प्राशन करणे या बाबी वैध परवाना असल्याखेरीज करण्यावर संपूर्ण बंदी आहे. उत्पादन शुल्क खात्याच्या विद्यमान आयुक्तांनी अलीकडेच या बाबींवरदेखील काही मर्यादा घातल्या आहेत. याचा थोडक्यातला अर्थ इतकाच की महाराष्ट्रात वैध परवाना असल्याखेरीज दारुचा थेंबदेखील मिळू शकत नाही आणि त्याचे संपूर्ण श्रेय बाळासाहेब भारदे आणि विठ्ठलराव पागे या महाराष्ट्रातीलच आता दिवंगत थोर गांधीवादी नेत्यांकडे जाते. एरवी राज्याचे प्रथम मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सत्तरच्या दशकात दारुबंदीचे धोरण मोडीत काढण्याचा व दारु पूर्णपणे बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हां या दोघांनीच तसे करु नका, पिणाऱ्याला ती पिऊ द्या पण परवाना ठेवा असा आग्रह धरला. तेव्हां दारुबंदी आहे हो!