शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

भाष्य - साथी हाथ बढाना...!

By admin | Published: July 05, 2017 12:19 AM

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून

व्यापक जनहिताची सार्वजनिक कामे करणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा आहे, अशी भावना ठेवून ‘साथी हाथ बढाना’ या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला तर काय घडू शकते हे धुळे जिल्ह्यातील घटबारी धरणात अलीकडेच झालेल्या जलसाठ्यातून दिसून येते. मुळातच कमी पावसाच्या साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील रोहिणी नदीवरचे हे छोटे धरण. १६० ते १७० टीएमसी एवढाच त्याचा पाणीसाठा आणि १२०० एकराचे सिंचन क्षेत्र. खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे गावच्या शेतकऱ्यांसाठी आशास्थान. गेल्या वर्षी ३ आॅक्टोबरला अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला, त्यात घटबारी धरणाचा बांध वाहून गेला. प्रचंड नुकसान झाले. परंतु आता धरणाला बांधच नसल्याने पाणी साठणार कुठे व कसे, हा खरा प्रश्न होता. शासनदरबारी पाठपुरावा सुरू झाला. अधिकारी येऊनसुद्धा गेले, पाहणी झाली, पंचनामे झाले, काही शेतकऱ्यांना अल्पशी मदतसुद्धा मिळाली; परंतु धरणाच्या पुनर्निर्माणाचा जो मुख्य प्रश्न होता त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ५६ लाख रुपये खर्च येणार होता. पण उन्हाळा आला तरी शासन दरबारी कुणीच पुकार घेईना. अशा वेळी खुडाणे, निजामपूर, जैताणे व आखाडे परिसरातील ग्रामस्थच एकत्र आले. त्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वत:च लोकसहभाग व श्रमदानातून धरणाच्या पुनर्निर्माणाचा विडा उचलला आणि मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात २१ मे रोजी आबालवृद्ध असे सुमारे साडेतीनशे ग्रामस्थ हातात टिकम, कुदळ, फावडे असे साहित्य घेऊन धरणाच्या पात्रात उतरले आणि घटबारी धरणाच्या लोकसहभागातून पुनर्निर्माणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी तहसीलदार, ग्रामसेवक असे शासकीय प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले. लोकांचा हा उत्स्फूर्त पुढाकार बघून खुडाणे येथील ट्रॅक्टरमालक व चालकांनीसुद्धा मोफत सेवा दिली, अनुलोम लोकराज्य संघटनेने तांत्रिक सहकार्य व मार्गदर्शन दिले आणि पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह अनेकांनी मदतीचे हात दिले. त्यामुळे बघता बघता ठरल्याप्रमाणे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या आतच घटबारी धरणाचा बांध पुन्हा उभा राहिला. योगायोगाने माळमाथ्यावर दमदार पाऊसही झाला, रोहिणी नदीला पूरही आला आणि घटबारी धरणात समाधानकारक जलसाठा झाला. ते पाहून भविष्याची चिंता मिटल्याच्या आनंदात अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि शासनावरच अवलंबून न राहता स्वत:च्या पुढाकारानेसुद्धा किती मोठे काम विनासायास होऊ शकते याची प्रचिती आली.