शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

भाष्य - सदाभाऊंचा झाला चेंडू

By admin | Published: July 03, 2017 12:08 AM

कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महिनाभरापासून खूप चर्चेत आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी

कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महिनाभरापासून खूप चर्चेत आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी खोत यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदविला आहे. शेट्टी हे दर दोन तीन दिवसांनी खोत यांच्यावर टीका करतात. त्याला खोत प्रत्युत्तर देतात, असा नवा खेळ सुरू झाला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे खोत यांना जाब विचारण्यात येणार आहे. त्यासाठी समितीही स्थापली आहे. सदाभाऊंना बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मात्र दोघांची मने दुभंगली असल्याने आता सदाभाऊंची संघटनेतून गच्छंती होईल, असे बोलले जाते. वास्तविक सरकारमधील एक कार्यक्षम राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ पुढे आले आहेत. राज्यमंत्री म्हणून विशेष कोणतेही अधिकार नसताना त्यांनी संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शिवार बैठका घेऊन सरकारला शेतकऱ्याच्या बांधावर नेले. तूर खरेदीचा प्रश्न चिघळल्यानंतर त्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन बैठका घेतल्या. सध्या ते राज्यात पेरणीबाबत कार्यक्रम घेत आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या मिलिटरी अपशिंगे गावात विविध विकास योजना राबवित आहेत. अपशिंगेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांच्या या गावातील तरुण मोठ्या संख्येने सैन्यदलात आहेत. वास्तविक एखादा राज्यमंत्री एवढा कार्यक्षमपणे काम करत असताना त्याचे कौतुक होण्यापेक्षा ते मात्र टीकेचे धनी ठरत आहेत.शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपाची हाक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुणतांबा येथे पाठविले व मुंबईत बैठक घेऊन संपावर तोडगा काढला. मात्र त्यातून संपात फूट पाडल्याचा खोत यांच्यावर आरोप झाला. त्यांना ‘व्हिलन’ ठरविण्यात आले. सोशल मीडियावर तर त्यांच्याविरुद्ध स्वपक्षीयांनीच मोठी मोहीम सुरू केली होती. शेतकरी संपाच्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्री गप्प असताना खोत हे पुढे आले व त्यांनी शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करण्याची भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा रोष त्यांनी अंगावर घेतला. नंतर सुकाणू समिती स्थापन झाली, कर्जमाफी जाहीर करण्यासाठी मंत्रिगट नेमण्यात आला. त्यात मात्र सदाभाऊंना कुठेही स्थान मिळाले नाही. कर्जमाफीच्या या प्रक्रियेत सदाभाऊ कुठे दिसलेच नाहीत. कदाचित शेतकरी नेत्यांचा रोष वाढू न देण्यासाठी ही खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी. दुसरीकडे सदाभाऊंवर त्यांचा पक्ष भलताच नाराज झालेला आहे. आता पक्षातून त्यांची हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले आहे. सदाभाऊ चहूबाजूंनी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री तरी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.