शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भाष्य - नासाडी थांबवा

By admin | Published: June 03, 2017 12:16 AM

गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र

गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र संप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आपल्या दाराला आलेल्या पाहुण्याला पोटभर खाऊ घालणे किंवा पिकलेला माल मनापासून दान करण्यासारखं मोठं मन बळीराजाशिवाय कुणाकडेच नाही. पण आज निसर्ग आणि बाजारभावाच्या चकव्यूहात बळीराजा देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. मोबाइल, पेट्रोलसारख्या बाबींवर मनसोक्त खर्च करणारा ग्राहक नेमके भाजीपाला व शेतमाल खरेदी करतानाच नाक मुरडतो. त्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. उत्पादन खर्चात आणि महागाईतही वाढ झाल्याने आता हे ओझे शेतकऱ्याला पेलवणारे नाही. स्वत:च उपाशी असलेला राजा दुसऱ्यांना काय दान देणार? गेल्या दोन दिवसांत शेतकरी संपामुळे शहरांकडे येणारे दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची आवक मंदावली आहे. जी आवक होते ती रस्त्यावर फेकून दिली जात आहे. दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे. विषय सरकारला घाम फोडण्याचा असला, तरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना आणि दूध ओतून देताना श्ोतकऱ्यांच्या आतड्याला किती पीळ पडतोय याची सरकारला कल्पना यायला हवी. एखादा पाऊस पडला की काळ्या आईची ओटी भरून तो आईसमोर नतमस्तक होतो. पिकाला पोटच्या लेकराप्रमाणे जपून वेळ अमावास्येला पिकाची पूजा करणाऱ्या शेतकऱ्याला आज शेतमाल फेकून देताना किती वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही. गोमातेला आईप्रमाणे सांभाळून तिचे दूध तिच्या वासराला न पाजता तुमच्या लेकराला पोच करणाऱ्या शेतकऱ्याला दूध रस्त्यावर ओतताना वासराचा अन् गायीचा हंबरडा कानात घुमल्याशिवाय राहत नाही. शेती आमची आई अन् बाप आहे, अशी भावना असलेला बळीराजा आईबापापासून कधीही तुटणे शक्य नाही. शेत परवडेना म्हणून विकून टाकावे असा विचारही मनात येत नाही. इतकं अतूट नाते असलेला बळीराजा संपावर गेला अन् आपल्या पिकांची नासाडी करू लागला. यामुळे सरकारला घाम फुटेल की नाही हे माहीत नसले, तरी शेतमालाची नासाडी करणे कदापिही व्यवहार्य ठरणारे नाही. आजही कित्येक बाळांना पुरेसे दूध मिळत नाही. मग ते आपले असो वा गायीचे. नासाडी करण्याऐवजी तिच्या अन् आपल्या बाळाला ते पाजलेलं कधीही चांगलं. भाजीपाला फेकून देण्याऐवजी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावा. पण नासाडी ही शेतकऱ्याला पचणारी अन् शोभणारी बाब नव्हे.