शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

भाष्य - स्वागतार्ह सूतोवाच

By admin | Published: December 26, 2016 12:25 AM

यापुढील काळात मोटार विकत घेण्यापूर्वी, ती नांगरून (पार्किंग) ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार

यापुढील काळात मोटार विकत घेण्यापूर्वी, ती नांगरून (पार्किंग) ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे सूतोवाच, केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंंकय्या नायडू यांनी केले आहे. आपण स्वत: या संदर्भात अत्यंत आग्रही असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. खरे तर हा निर्णय खूप आधीच व्हायला हवा होता. अगोदरच भारतातील बहुतांश शहरांमध्ये नियोजनाची बोंब आहे. अरुंद रस्ते-गल्ल्या, दुचाकी-तिचाकी-चारचाकी अशा नाना तऱ्हेच्या वाहनांची भरमसाठ गर्दी, वाहतुकीच्या नियमांना सर्रास ठेंगा दाखविण्याची नागरिकांची प्रवृत्ती, यामुळे देशातील सर्वच लहानमोठ्या शहरांमध्ये, काही तुरळक रस्त्यांचा अपवाद वगळता, वाहतुकीची पार ऐशीतैशी झाल्याचे चित्र सदासर्वकाळ बघावयास मिळते. त्यामध्ये भर पडते ती रस्त्याच्या कडेच्या जागेला किंवा पदपथांना आपली जहागीर समजून केलेल्या उभे केलेल्या वाहनांची! बहुमजली इमारतींमध्ये पाहुण्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय केलेली नसते. त्यामुळे अशा इमारतींसमोर पाहुण्यांच्या वाहनांनी रस्त्याचा बराच मोठा भाग व्यापून टाकल्याचे चित्र दिसते. ते कमी म्हणून की काय, अनेक इमारतींमध्ये रहिवाशांच्या वाहनांच्याच पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसते. असली तरी अनेकदा ती भयंकर अडचणीची असते. त्यामुळे अशा इमारतींमधील रहिवासीही अनेकदा त्यांची वाहने इमारतीसमोरील रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर उभी करून ठेवतात. त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्यामुळे मोठा मनस्ताप होतो. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन, कधीकधी अग्निशमन दलाचे बंब किंवा रुग्णवाहिकांचाही खोळंबा होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता नायडूंनी सूतोवाच केलेला निर्णय प्रत्यक्षात येणे अत्यंत गरजेचे आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने २०१५ मध्येच सिमला महानगरपालिकेच्या क्षेत्रापुरता असा आदेश राज्य सरकारला दिला होता. या वर्षीच्या प्रारंभी नोएडा येथील स्थानिक प्रशासनानेही व्यापारी वाहनांसाठी असाच आदेश अंमलात आणला होता. नोएडात साडेचार लाखांपेक्षा जास्त व्यापारी व खासगी वाहने आहेत आणि त्यामध्ये दररोज सरासरी सुमारे पाचशे वाहनांची भर पडत असते. परिणामी तिथे वाहतूक कोंडीचा मोठाच प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक वाहनतळांवर कब्जा करणारे ‘पार्किंग माफिया’ जन्माला आले आहेत. राष्ट्रीय राजधानीला खेटून वसले असल्यामुळे नोएडात या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले असले तरी, इतर शहरांमध्येही कमीअधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक झाले आहे. व्यंंकय्या नायडू यांनी सूतोवाच केले आहेच, तर हा मुद्दा रेटून धरून शेवटावर न्यावा, हीच अपेक्षा!