शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

भाष्य - जुगाडासाठी वाव!

By admin | Published: January 12, 2017 12:17 AM

निश्चलनीकरणाचा शिमगा संपला असला तरी कवित्व अद्याप बाकी आहे. निश्चलनीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले की नाही, यावर सध्या चर्वितचर्वण सुरू आहे

निश्चलनीकरणाचा शिमगा संपला असला तरी कवित्व अद्याप बाकी आहे. निश्चलनीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले की नाही, यावर सध्या चर्वितचर्वण सुरू आहे आणि आणखी काही दिवस तरी सुरूच राहणार, असे दिसते. परवा माध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्या त्याच चर्वितचर्वणाचा भाग म्हणाव्या लागतील. हजार व पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी दिलेल्या मुदतीदरम्यान, सुमारे तीन ते चार लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बँकांमध्ये जमा झाला, ही त्यापैकी पहिली बातमी, तर निश्चलनीकरणानंतर सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे व्यवहार रोकडीऐवजी डिजिटल स्वरूपात झाल्याच्या सर्वेक्षण निष्कर्षाची दुसरी बातमी! स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने हे सर्वेक्षण केले होते. त्यातून हाती आलेला निष्कर्ष असा आहे, की एरवी रोख स्वरूपात होणारे सुमारे १५ टक्के व्यवहार निश्चलनीकरणानंतर डिजिटल स्वरूपात झाले. ही एक चांगली सुरुवात आहे, हे कुणीही नाकारणार नाही. वस्तू विनिमयापासून सुरू झालेल्या व त्यानंतर नाणी, चलनी नोटा असा प्रवास झालेल्या आर्थिक व्यवहारांचे भविष्य डिजिटल पेमेंट हेच आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. अखेरीस सर्वच अर्थव्यवस्थांना तेथपर्यंत पोहोचावेच लागेल. त्यामुळे आपला तो प्रवास इतरांपेक्षा जलद गतीने होणार असेल, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे; पण करचुकवेगिरीला आळा घालण्याचे उद्दिष्ट, मर्यादित स्वरूपातील डिजिटल व्यवहारांमुळे कसे साध्य होईल? सध्याच्या घडीला प्रामुख्याने मध्यमवर्गीयच डिजिटल व्यवहारांकडे वळले आहेत. त्यांच्याकडे काळा पैसा नसल्यामुळे आणि असलाच तरी फार कमी प्रमाणात असल्यामुळे, त्यांना डिजिटल व्यवहार करण्याची भीती नाही; पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते कशाला डिजिटल व्यवहारांच्या फंदात पडतील? उलट ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे, ते अधिकाधिक व्यवहार डिजिटल स्वरूपात करू लागल्यास, काळा पैसा बाळगणाऱ्यांना अधिक प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध होतील, जे त्यांना हवेच आहे. थोडक्यात, जोपर्यंत डिजिटल व्यवहार अनिवार्य होणार नाहीत व बड्या चलनी नोटा हद्दपार होणार नाहीत, तोपर्यंत डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून काळ्या पैशास आळा घालण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहील. उलट ‘जुगाडू’ भारतीयांना जुगाडासाठी वाव मिळेल. दोन्ही व्यवस्था एकत्र कायम राहिल्यास, दोन्ही व्यवस्थांचे आपल्यापुरते लाभ कसे उपटायचे आणि करचुकवेगिरी करून सरकारी तिजोरीला कसा चुना लावायचा, याचे मार्ग लवकरच शोधल्या जातील. त्यामुळे सरकारला खरोखरच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काळ्या पैशाची निर्मिती थांबवायची असेल, तर त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची जलद निर्मिती करून, आर्थिक व डिजिटल साक्षरता वाढवून, बड्या चलनी नोटा कायमस्वरुपी बाद कराव्या लागतील; अन्यथा ‘शेळी गेली जिवानिशी....’ अशी गत होईल!