शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

व्यूह

By admin | Published: October 03, 2016 6:18 AM

तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला.

तुका म्हणे होय मनाशी संवाद। आपुलाचि वाद आपणासी।। तुकाराम म्हणतात तसा मनाशी संवाद होतो का? तो झाला तर वाद आला विवाद आला. पण तुकाराम वाद इतरांशी करीत नाहीत. त्यांचा वाद स्वत:शी आहे. जे स्वत:शी बोलू शकतात ते स्वत:ला नवनव्या प्रवाहात सामील करून घेऊ शकतात, त्यातील आणि आपल्यातील टाकाऊ काय किंवा टिकाऊ काय हे पाहण्याची दृष्टी त्यांना मिळते, म्हणूनच आश्चर्य वाटतं प्रचंड जीवनाची हाव आणि हौस असणारी माणसं क्षणात विरक्त होतात. इतके की आपण पूर्वी कोण होतो याचीही त्यांना जाणीव राहत नाही. मराठीतील एक नामवंत लेखक आयुष्यभर माणसातील वासना, व्यवस्थेविरुद्धची तडफड, राग, स्त्रीविषयी प्रचंड आसक्ती आणि घृणाही... हे सगळं त्याच्या लेखनात होतं. कसा बदल होत जातो कळत नाही पण झाला आणि तो लेखक इतका विरक्त झाला की घरदार सोडून, भगवी वस्त्र घालून एका अनाम मंदिरात राहू लागला. सर्वसंगपरित्याग हा शब्द आहे. तो बोलायला छान, पण आचरायला कठीण. त्याने ते केलं. एखादा माणूस इतरांना क्षणात नकोसा होत नाही. त्याच्या वागण्यात बदल होऊ लागतात. तो एकतर कमालीचा चिडचिडा, उद्धट किंवा पराकोटीचा शांत, बधिर, एकटा, निर्विकार होत जातो.ही दोन्ही टोकं ज्याने आपल्या मनाच्या धाकाने बांधली वा जोडली तोच जिंकला. पण, हे जिंकणं सोपं नाही. आपण ऊठसूट काही संत-महात्मे यांची नावं घेतो. सगळे आपलेच सोयरे आहेत असं आपण बोलतो. पण खरं सांगायचं तर हा प्रचंड चक्रव्यूह आहे. वेद, तत्त्वज्ञान, धम्म या साऱ्यांत सहज म्हणून फिरता येत नाही. त्यात पूर्ण अवगाहन करून बुडून गेलेले स्वत:ला पूर्ण वाया गेलो अशी समजूत झालेले जेव्हा तक्रार न करता जगाला वेडं वाटावं असं वागतात किंवा बोलतात तेव्हा समजायचं ही चक्रव्यूह भेदण्याची धडपड आहे. बरेचसे अभिमन्यू होण्यात धन्यता मानतात. किती वेगळं जगता जगता संपत गेलो हे डोळ्यांनी पाहतानाही ते कृतार्थ असतात. कारण तथाकथित विषयांची, संसाराची, लौकिकार्थाची कुठलीही बंधनं त्यांनी स्वीकारलेली नसतात. म्हणून ही माणसं भणंग असतात. जगाला एक तर ते पराकोटीचे मूर्ख, गाढव वाटतात नाहीतर एकदम महान व्यक्ती. पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो. पिढ्या बरबाद कराव्या लागतात.त्यांना क्षमा करो, ते काय करतात त्यांना कळत नाही... हे म्हणायला क्षमेचे काटे आणि विरक्तीचा काटेरी मुकुट परिधान करावा लागतो. ज्यांनी जखमा जोजवल्या त्यांना हा छळ काहीच वाटत नाही. फक्त जगण्याचे हे व्यूह भेदून जाता यायला हवेत. ते ज्याला जमलं तो जिंकला. जेते झाला, नेते झाला, संत झाला.व्यूह करून शत्रूचा तळ उद््ध्वस्त करायला हिंमत लागते बाबा! त्याचाच जयजयकार होतो. तो खरा सैनिक!-किशोर पाठक