शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

‘एआय’ तरुणांना घाबरवणार, की पुढे घेऊन जाणार; ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का?  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 9:57 AM

‘एआय’मुळे नोकऱ्या जातील किंवा रोजगार नष्ट होतील असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल; मात्र त्यावर हुकूमत गाजवण्याऐवजी दुर्लक्ष केलं तर फटका बसेलच.

अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

सध्या सगळीकडे अत्यंत गाजत असलेला विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). ज्यांचा तंत्रज्ञान क्षेत्राशी अगदी दुरूनही संबंध नाही अशा सगळ्या लोकांनासुद्धा ज्याविषयी ऐकून घ्यावंच लागतं असा हा विषय. ‘एआय’मुळे सध्या काय घडत आहे आणि भविष्यात काय घडू शकेल याविषयी असंख्य प्रकारचे तर्क-वितर्क लढवले जात असल्यामुळे सगळीकडे त्याविषयी बोललं जातंच. कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं काम आपण करीत असलो तरीही ‘एआय’चा त्यावर नक्कीच परिणाम होणार असल्याची भावना सगळ्यांनाच अस्वस्थ करून जाते. माणसानंच निर्माण केलेलं हे तंत्रज्ञान आपल्याच मुळाशी येणार का, ही भीती सर्वदूर पसरलेली आहे. खरोखरच आपण ‘एआय’मुळे एवढं घाबरायला हवं का? 

‘एआय’चं तंत्रज्ञान खरोखरच अत्यंत सनसनाटी आहे, यात शंका नाही. जी कामं अशक्यप्राय वाटायची किंवा जी कामं करायला प्रचंड वेळ लागायचा ती ‘एआय’मुळे अगदी चुटकीसरशी होऊ शकतात याविषयी कुणाच्याच मनात शंका असायचं कारण नाही. साहजिकच सध्या पारंपरिक प्रकारची आणि त्यातही तोचतोचपणा असलेली अनेक कामं एआय अधिक सहजपणे आणि क्षणार्धात करू शकतो, हे खरंच आहे; पण म्हणून एआयमुळे सगळ्याच नोकऱ्या संपुष्टात येतील किंवा रोजगार नष्ट होतील असं म्हणणं अतिशयोक्ती झाली. इंटरनेटचा किंवा त्यानंतर ई-कॉमर्सचा जन्म झाला त्याही वेळा अशाच प्रकारची भीती काही जणांनी व्यक्त केली होती. इतक्या टोकाच्या भाकितांमधला निष्फळपणा काही काळानंतर दिसून येतो; तो एआयच्या बाबतीतसुद्धा दिसून येईलच.

अर्थातच याच्या अगदी उलटा पवित्रा घेऊन एआयमुळे काहीच घडणार नाही किंवा माझा रोजगार सुरक्षित राहील असं मानून बिनधास्तपणे राहणं हा पर्यायच असू शकत नाही. एआयचं तंत्रज्ञान अद्भुत आहे, आजवर आपल्या कल्पनाशक्तीमध्ये सामावू शकेल अशा सगळ्यांपलीकडचं आहे. याचे परिणाम नक्कीच असंख्य क्षेत्रांवर निरनिराळ्या प्रमाणांमध्ये घडणार आहे. या तंत्रज्ञानामुळे नेमकं काय घडू शकतं आणि त्यातून तावून-सुलाखून आपण कसे बाहेर पडू शकू, अशा प्रकारचा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा ठाकणार आहे. वैयक्तिक पातळीवर हे किती जणांना जमू शकेल, किंबहुना त्याचं किमान आकलन तरी होईल हाच कळीचा मुद्दा असल्यामुळे याची जबाबदारी धोरण आखणाऱ्यांनी स्वत:वर घेणं क्रमप्राप्त आहे. लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून देऊन चालणार नाही. ज्याप्रमाणे सरकारांना बेरोजगारीवर मात करणं, तरुणांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी दूरगामी पावलं उचलावी लागतात तशा प्रकारचे प्रयत्न एआयच्या त्सुनामीशी लढण्यासाठी करावे लागणार आहेत.

पण, दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणे एआयचा फटका बसला नाही तरी सध्या शिक्षणाची जी परवड सुरू आहे, त्याचं काय? सरकारनं जणू शिक्षणाशी फारकत घेऊन खासगी महाविद्यालयं आणि विद्यापीठांवर सगळी जबाबदारी ढकलून दिल्याचे परिणाम पावलोपावली दिसतात. लाखो रुपये फी भरून विद्यार्थी ज्या प्रकारचं शिक्षण घेताना दिसतात त्यातून अत्यंत अनुपयोगी बेरोजगारांचे तांडे बाहेर पडण्याशिवाय दुसरं काय होणार? पदवीच काय; पण उच्च पदवी घेतल्यानंतरही अगदी किमान कौशल्यंही या विद्यार्थ्यांकडे नसतात, हा अनुभव आहे. यामुळे आपण आणखी मोठ्या संकटांना आमंत्रण देत आहोत.

एकीकडे शिक्षणक्षेत्राबाबत हताश होण्याची परिस्थिती असताना त्याच्या जोडीला एआयची भर पडल्यावर मात्र परिस्थिती नक्कीच गंभीर होणार, यात शंका नाही. एआयच्या धोक्यावर मात करण्याची क्षमता अशा वेळी कुठून येणार? जे लोक चाणाक्षपणे या सगळ्याकडे बघून मार्ग आखतात त्यांना यातून पुढे जात राहण्याचे मार्ग नक्कीच सापडत राहतील. आपल्याला दिशा दाखवणारं कुणीतरी भेटेल आणि त्यातून आपण आपला बचाव करू, असं मानणारे किंवा याचा विचारही न करणाऱ्यांना मात्र एआयचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे.     akahate@gmail.com

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स