शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

अन्वयार्थ: सुचिर बालाजीचा संशयास्पद मृत्यू आणि एआयचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 07:45 IST

माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्यातील गैरप्रकारांना आळा घातला नाही तर अराजक घडू शकते.

दीपक शिकारपूरमाहिती तंत्रज्ञान अभ्यासक

१९७० च्या दशकात संगणकाचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात सुरू झाला आणि गेल्या पाच दशकात त्यांचे स्वरूप कसे आमूलाग्र बदलले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन आहे. याचा वापर मानवजातीच्या कल्याणासाठी केला पाहिजे. तंत्रज्ञान आणि नैतिकता यांच्यातील संतुलन राखणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. संगणकाला 'विचारक्षमता' नसते असे मानणाऱ्यांचाही गट मोठा आहे.

कितीही वेगवान, कार्यक्षम असले आणि सर्वगुणसंपन्न भासले तरी अखेरीस ते एक यंत्र आहे. मानवी संशोधक डेटा गोळा करण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात बराच वेळ घालवतात. 'एआय' तंत्र जागतिक डेटाबेसमधून माहिती शोधून जलद निष्कर्ष काढते. वापरकर्ता या वेगामुळे खुश होतो. उद्योगही पैसे वाचल्याने समाधानी आहेत. पण कळीचा मुद्दा हा आहे, की हे निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय असते. कदाचित त्यामुळे अनेक देशांच्या कॉपिराइट कायद्याचा भंग झाला असेल. हेच मुद्दे सुचिर बालाजी या संशोधकाने ऑक्टोबरमध्ये व्यक्त केले होते. 'ओपन एआयने' लोकप्रिय चॅटजीपीटी ऑनलाइन चॅटवॉट विकसित करताना यूएस कॉपिराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याने केला होता. सूचिर त्या उद्योगात चार वर्षं संशोधक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्याचे मुद्दे गांभीर्याने घ्यायला हवेत. आता त्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे या सर्व बाबी अजून शंकास्पद झाल्या आहेत.

जनरेटिव्ह एआय टूल्स वापरकर्त्याच्या प्रॉम्प्ट (यूझर इनपूट) नुसार माहितीचे पृथकरण करून नवनिर्मिती करतात (ऑडिओ, टेक्स्ट, व्हिडीओ, फोटो इत्यादी). 'एआय'चा धोका असा आहे, की ते बनावट परंतु वास्तविक दिसणाऱ्या प्रतिमा आणि व्हिडीओ तयार करून चुकीची माहिती सर्वत्र प्रसार करू शकते. यामागे प्रतिगामी, गुन्हेगारी, दहशतवादी अथवा व्यावसायिक स्पर्धक असू शकतात; पण ते पाठीमागे, शांतपणे अदृश्य राहू शकतात. त्यामुळे जनमत प्रभाव सहज शक्य आहे.

माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींना कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडविण्याची क्षमताही प्राप्त झाली. या प्रकाराला (खरे तर गैरप्रकाराला) वेळीच आळा घातला नाही तर अराजक घडू शकते. परिणामी सत्य लपविणे, ते वेगळ्या रूपात दाखवणे किंवा स्वतःला सोयीचा असेल तेवढाच भाग सांगणेही अगदी सहज शक्य होईल.

याबाबत प्रगत राष्ट्रांमध्ये ऊहापोह होऊन जागृती झाली आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी, युरोपियन कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा (एआय' कायदा) अंमलात आला. या नवीन नियमांचा एक भाग म्हणून, 'एआय' कायदा प्रतिबंधित 'एआय' अस्वीकार्य पद्धतींची यादी तयार करतो.

आपल्या देशातही या विषयावर मंथन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकास आणि वापरासाठी स्पष्ट धोरण तयार करणे आवश्यक आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करण्यासाठी एक स्वतंत्र नियामक संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याची कायदेशीर व्याख्या करण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्थांनी खरेपणा तपासण्यासाठी काही वेबसाइट्स तयार करणे जरुरीचे आहे. तसेच सायबर कायदे बदलून त्यात फेक न्यूज, व्हिडीओचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना जबर शिक्षा व्हायला हवी.

हे सर्व प्रकार फक्त राजकीय अथवा देशांतील स्पर्धेपुरतेच नाहीत. उद्योगविश्व यातून अलिप्त राहू शकत नाही. उद्योग आपले उत्पादन लोकप्रिय व अधिक लाभदायी करण्यासाठी स्पर्धक उद्योगांबद्दल गैरसमज, फेक माहिती सोशल मीडियावर पसरवू शकतो. या प्रसारासाठी थर्ड पार्टी प्रसारमाध्यमांचा वापर (गैरवापर) होऊ शकतो. व्यवसायाचा हेतू फक्त लाभ असाच असता कामा नये, हे बाळकडू शालेय शिक्षणपद्धतीत, व्यवस्थापन उच्च शिक्षणात अंतर्भूत केलेच पाहिजे. नीतिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान ही बाब शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात अंतर्भूत करायची हीच वेळ आहे. 

deepak@deepakshikarpur.com 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सCrime Newsगुन्हेगारी