शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

‘मराठी पाटी’च्या दुकानाचा मालक ‘मराठी’ असावा म्हणून..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 6:25 AM

दुकानांच्या पाट्या मराठी असतील आणि मालकसुद्धा मराठी असेल, यासाठी राज्य सरकारने शाळा - कॉलेजातून सुरुवात केली पाहिजे! दिल्लीने हे जमवले आहे!

नितीन पोतदार, कॉर्पोरेट क्षेत्रातील विधिज्ञ

महाराष्ट्र राज्यातील  दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक  मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरांत लिहिलेले असावेत, हा आपल्या अभिमानाचा विषय! जगाच्या पाठीवर सर्वत्र दुकानांच्या पाट्या या तेथील स्थानिक भाषेतच असतात. अमुक तमुक शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे म्हणून  स्वभाषेला डावलून परक्या भाषेत पाट्या लावा, असा हास्यास्पद प्रकार नसतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान हा असायलाच हवा. 

दुसरीकडे एक कटू प्रश्न- दुकानाच्या पाट्या मराठी भाषेत होतील; पण त्या दुकानांचा मालक मराठी भाषक असेल का? की त्या दुकानात काम करणारा नोकर किंवा खरेदी करणारा ग्राहक एवढ्यापुरतेच मराठी माणसाचे स्थान राहणार? आज मुंबईतील व्यापारउदिमावर, उद्योगधंद्यांवर अमराठी लोकांचाच वरचष्मा आहे. व्यापार, उद्योगधंदा या क्षेत्रांत मराठी माणूस पिछाडीवरच दिसतो. हे चित्र  फक्त मुंबईमध्येच आहे असे नव्हे! कोलकात्यामध्ये गेलात तर बंगाली माणूस हीच खंत व्यक्त करताना दिसेल. मुले शिकून मोठी व्हावीत, असा विचार आपल्या प्रत्येक मराठी कुटुंबात असतो... म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा बँकेत नोकरी; पण हे चित्र आयटी क्षेत्राने पूर्ण बदलवून टाकले.  मराठी तरुणांनी आयटीत मोठमोठ्या कंपन्या काढल्या, नाव कमावले. आता स्टार्ट-अप्समध्येही मराठी नावे दिसतात. यासाठी लागणारे उद्योजतकेचे बाळकडू शाळेपासूनच देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या संस्थेचा जन्मच मुळात सामान्य माणसांना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी झाला होता.  तरुणांना केवळ औद्योगिक प्रशिक्षणच नव्हे, तर त्यांना आवश्यक ते प्रोत्साहन, मदतही या संस्थेतर्फे पुरवली जाते; पण या संस्थेचा हवा तसा विस्तार झाला नाही. अशा संस्थांनी शाळा- कॉलेजच्या स्तरावर पोहोचले पाहिजे.

औद्योगिक प्रशिक्षणाला वाहिलेला एक अभ्यासक्रमच राज्य सरकारने आठवी ते बारावी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू केला पाहिजे.  व्यवसाय करण्यासाठी काय करावे लागते,  भांडवल कसे उभे करावे, प्रशिक्षित- अप्रशिक्षित मनुष्यबळ कसे मिळवावे,  धोके काय असतात, ते कसे टाळावेत, नफा कसा वापरावा, कुठे गुंतवावा, अपयशातून सावरण्यासाठी कोणती पावले उचलावीत, अशा गोष्टींचे ज्ञान  नसल्यामुळे सामान्य मराठी माणूस त्यात उडी मारायला बिचकतो. हे ज्ञान जर शालेय स्तरावरच मिळाले, तर किमान  एक वैचारिक बैठक मराठी मुलांमध्ये तयार होऊ शकते.

प्रत्येक शाळेत दर महिन्याला एक दिवस उद्योजकता दिवस म्हणून साजरा करा, असा कायदाच केला पाहिजे. त्यादिवशी स्थानिक उद्योजकांची भाषणे, मुलांसाठी स्टार्ट-अप स्पर्धा, उद्योगसमूहाला भेट, असे  कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. स्थानिक लघु उद्योजकांच्या अनुभवाचे बोलही मुलांसाठी उद्बोधक ठरतील. उद्योग उभारण्यासाठी स्थानिक वातावरणात त्यांना कोणत्या आव्हानांचा मुकाबला करावा लागला हे मुलांना कळेल.  इच्छुक विद्यार्थ्यांना ठरावीक कालावधीसाठी व्यवसाय प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याची गळसुद्धा या स्थानिक उद्योजकांना घालता येऊ शकते.

उद्योगधंद्यांत अग्रेसर असलेल्या मारवाडी, गुजराती, सिंधी समाजांतील मुलांना आर्थिक गोष्टींचे बाळकडू घरातूनच मिळत असते. मार्गदर्शनासाठी घरातील पालक, नातेवाईक सदैव तत्पर असतात. हे मराठी घरात होत नाही. एखाद्याला धंद्यात रस असलाच तरी त्याला या विषयातील ओ की ठो कळत नसते. शिवाय समजावून सांगायला आजूबाजूला कोणी माहीतगारही नसतो. ही कोंडी फोडायची असेल, तर  शालेय स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. शंभर मुलांमधून दहा जरी उद्योगक्षेत्राकडे वळली तरी त्यामागचा हेतू सफल होईल. मग दुकानांच्या पाट्यासुद्धा मराठी असतील आणि त्यांच्या गल्ल्यांवर बसणारा मालकसुद्धा मराठी असेल. त्यासाठी गरज आहे  जबरदस्त राजकीय इछाशक्तीची; जी दिल्ली सरकारने शाळेत उद्योजकता शिकवून दाखवली. आपल्याला काय पाहिजे?- फक्त मराठी पाट्या की, त्या खाली बसलेला मराठी मालकसुद्धा?

nitinpotdar@yahoo.com