शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

By admin | Published: August 30, 2016 5:06 AM

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली. अवघी सहा एकर शेती, मोठे कुटुंब, तीन वर्षांपासून नापिकी, या वर्षी अतिवृष्टीचा फटका, डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व सावकाराचे कर्ज, स्वत:सकट लेकाचे आजारपण, अशा चोहो बाजूनी उभ्या ठाकलेल्या नैराश्याच्या डोंगरापुढे हात टेकून, काशीराम मुधळकर यांनी मुलगा अनिलसह मरण जवळ केले. त्यांच्या आत्महत्त्येच्या दुसऱ्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने दही हंडीसाठीची २० फुटांची मर्यादा वाढविण्यास नकार दिल्याची बातमी आली आणि लगेच अवघा महाराष्ट्र दही हंडीवरील चर्चेत आकंठ बुडाला. निवडणूक आली की हटकून ‘बळीराजा’ची आठवण येणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला, दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादेपेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बापलेकाची आत्महत्त्या चर्चेयोग्य वाटली नाही. बापलेकानी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असावा का? की आधी बापाने गळफास घेतला आणि ते दृश्य बघून हादरलेल्या मुलानेही बापाशेजारीच स्वत:ची मान फासात अडकवली? की याच्या नेमके उलट झाले असावे? कोणत्याही संवेदनशील मनास पडावे असे हे प्रश्न, एकाही राजकीय नेत्याला पडल्याचे दिसले नाही; कारण घटनेस तीन दिवस उलटून गेल्यावरदेखील एकाही पदारुढ राजकीय नेत्याने मुधळकर कुटुंबास भेट देण्याची तसदी घेतली नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचे सोडून द्या; पण किमान जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही, त्या निराधार, सैरभैर झालेल्या कुटुंबाच्या पाठीवरून सहानुभूतीचा हात फिरवावासा वाटू नये? याला कोडगेपणा म्हणावे, की निगरगट्टपणा? साधारणत: १९९० च्या दशकात शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र विदर्भात सुरू झाले आणि २५ वर्षे उलटली तरी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. काही तुरळक अपवाद वगळता या वर्षी विदर्भात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सुदैवाने किडीचाही प्रादुर्भाव झालेला नाही. आणखी काही दिवस निसर्गाचा वरदहस्त असाच राहिल्यास, या वर्षी गेल्या तीन वर्षांची कसर भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली आहे. या आशादायक पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्त्यांच्या दरात घसरण अभिप्रेत होती; पण प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातच आॅगस्ट महिन्यात दहा शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला. गत तीन महिन्यातील हा आकडा २८ आहे. का निर्माण होत असावी ही टोकाची नैराश्याची भावना? आपले ‘अच्छे दिन’ कधी येऊच शकत नाहीत, हा प्रकांड विश्वास कोठून येत असावा? अवघ्या काही दिवसांपूर्वी ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याला, अवघा पाच पैसे किलोचा भाव मिळतो, तूर निघण्यापूर्वीच तूर डाळीचे भाव कोसळू लागतात, तेव्हा पुढील चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते अन् मग तो टोकाचा निर्णय घेतो. चांगले उत्पादन झाल्याने, उत्पन्न वाढत नाही आणि ‘अच्छे दिन’ तर मुळीच येत नाहीत, हे जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा शेतकऱ्यासमोर दुसरा कुठला मार्गच शिल्लक उरलेला नसतो; कारण तो साठेबाजी करून बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करू शकत नाही, की मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक उत्पादन घटवू शकत नाही! ...अन् जेव्हा नैसर्गिकरीत्या उत्पादन घटते, तेव्हाही मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांताचा लाभ त्याच्या पदरात कधी पडतच नाही! त्याचा जन्मच मुळी निसर्ग, सरकार, व्यापारी, ग्राहक, सगळ्यांकडून मार खाण्यासाठी झालेला असतो. त्याच्यावर जन्मत:च पराभूत होण्याचा शिक्का बसलेला असतो. - रवी टाले