शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुडत्या ‘बेस्ट’ला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 04:56 IST

संकटकाळात सगे-सोयरेही पाठ फिरवतात, असे म्हणतात. बेस्ट उपक्रमाची आजची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. आर्थिक मदत मिळण्याची आशा असलेल्या मुंबई महापालिका या पालक संस्थेने आधी स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्ला दिला.

संकटकाळात सगे-सोयरेही पाठ फिरवतात, असे म्हणतात. बेस्ट उपक्रमाची आजची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. आर्थिक मदत मिळण्याची आशा असलेल्या मुंबई महापालिका या पालक संस्थेने आधी स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्ला दिला. तर राज्य सरकारने यापूर्वीच कानावर हात ठेवले आहेत म्हटल्यावर बेस्टला पुन्हा मुंबईकरांचा आधार घ्यावा लागला आहे. बसभाडे हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत राहिल्याने बेस्ट प्रशासनाने आर्थिक गणित जुळवण्यासाठी बसभाड्यात पुन्हा वाढ केली आहे. आर्थिक शिस्त लावण्यासाठी बेस्ट उपक्र माचा कारभार प्रशासकाकडे सोपविण्याची तयारी महापालिकेच्या प्रशासकीय स्तरावर सुरू होती. प्रशासक नेमण्याच्या नुसत्या चर्चेवरून राजकीय वादळ उठले आणि तो विषय तेथेच बारगळला. मात्र यामुळे बेस्ट उपक्रमात काही आर्थिक सुधारणांचा स्वीकार राजकीय पातळीवर झाला. प्रवाशांसाठी लागू केलेल्या काही योजना, सवलती बंद करून ही बचत केली जाणार आहे. या सुधारणांना पालिकेच्या महासभेत शनिवारी मंजुरी मिळाली. मात्र कामगारांशी संबंधित बहुतांशी सुधारणा वादात सापडल्या आहेत. त्यामुळे या सुधारणांनी बचत केली तरी त्याचा बुडत्याला काडीचा इतकाच काय तो आधार ठरणार आहे. मग अखेर नेहमीप्रमाणे शेवटचा पर्याय म्हणून मुंबईकरांच्याच खिशात हात घालण्यात आला आहे. शहर भागात कुलाबा ते सायन, चर्चगेट ते माहीम अशा सुमारे दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा करणारा विद्युत पुरवठा विभाग नफ्यात आहे. २00३ नंतर हा नफा वाहतूक विभागाकडे वळविण्यास निर्बंध आल्यानंतर तो मार्गही बंद झाला. उत्पन्नासाठी बेस्टच्या बसगाड्या, बस आगार अशा मालमत्तांचा जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी वापर, बस आगार, बस स्थानकाचे व्यावसायिकीकरण असे प्रयोग अलीकडे सुरू झालेत. पण बेस्टचा आर्थिक भार पेलण्यासाठी एकही सक्षम स्रोत नाही. त्यामुळे भाडेवाढ हाच बेस्ट प्रशासनाचा नेहमी अंतिम पर्याय राहिला आहे. नवीन स्रोत विकसित करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही प्रयोग खड्ड्यात घालणारेच ठरले. राजकीय स्वार्थासाठी गेल्या दशकभरात बसभाडेवाढ टाळण्यात आली. याउलट अवास्तव सवलती व योजना, नगरसेवकांच्या इच्छेखातर आवश्यकता नसताना नवीन बस मार्ग सुरू करणे असे बेस्टचे नुकसानच करणारे प्रकार वाढले. मात्र बेस्ट नावाचे जहाज बुडायला लागल्यानंतर २0१0 नंतर २0१५ मध्ये दोन वेळा बसभाड्यात वाढ करण्यात आली होती. बेस्ट उपक्रमातील आर्थिक सुधारणेसह मंजूर झालेली ही भाडेवाढ चित्र पालटेल, अशातला भाग नाही. त्यामुळे भविष्यात भाडेवाढ होणार नाही, याची शाश्वती बेस्ट प्रशासनाला छातीठोकपणे देता येणार नाही.

टॅग्स :BESTबेस्टMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका