शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वचक असायला हवा

By admin | Published: March 26, 2016 3:27 AM

एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही.

एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही. झालेच तर त्यासाठी कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीकडून कान टोचण्याचे निमित्त तरी लागते. रस्ता अपघाताच्या बाबतीतही उपरोक्त उदाहरण तंतोतंत लागू होते. सध्याच्या काळात प्रत्येक नागरिकाला सतावणाऱ्या ज्या काही गंभीर समस्या आहेत, त्यात अपघातांचे वाढते प्रमाण याचाही अंतर्भाव होतोच. पूर्वी असा समज होता की, अपघात हे केवळ नशापान केल्यामुळेच होतात. परंतु हल्ली तसे राहिलेले नाही. बऱ्याचदा या कारणाने अपघात होतातही पण सर्वच ठिकाणी ते कारण लागू होत नाही. वाहन चालविताना अतिघाई, निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती ही कारणे जशी जबाबदार आहेत तसाच भान हरवून बसलेल्या तरुणाईचा धिंगाणा आणि वाहनांच्या साहाय्याने भररस्त्यावर केली जाणारी मस्तीही तेवढीच कारणीभूत असते. काही मुले जन्मदात्याच्या पैशावर मौजमस्ती करण्यासाठी बाजारातील अत्याधुनिक मोटारसायकली खरेदी करतात आणि महाविद्यालयाचा परिसर असो की शहरातील मुख्य रस्ते असो त्याठिकाणी त्यांच्या नानाविध कसरती धूम स्टाईलने सुरूच असतात. त्यावेळी अल्पवयामुळे वाहन चालविण्याचा परवाना आपल्या खिशात नसतानाचे ठाऊक असतानाही ते भररस्त्यावर सुसाट वेगाने धावतात, कोणाच्या तरी अंगावर जाऊन धडकतात; पण त्याचे सोयरसूतक त्यांनाही नसते आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही नसते. कालपरवा अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात घडला, तेव्हा शासनाने तीन मुद्द्यांवर पंधरा दिवसाच्या आत अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला द्यावे लागले. ‘५० सीसी’च्या गाड्या चालवायला हव्या व त्यांच्या परवान्यावर तशी नोंद करायला हवी. आतापर्यंत झालेल्या अपघातांसाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत आणि मुलामुलींच्या दृष्टीने सोयीच्या ठरतील अशा पद्धतीने शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाच्या वेळा ठरविता येऊ शकतात काय, असे हे तीन मुद्दे आहेत. याचा अर्थ राज्यात जे अपघात होत आहेत व दिवसेंदिवस त्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाही त्यावर अंकुश ठेवण्याकामी शासनाची वाहतूक नियंत्रण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचाही अर्थ यातून स्पष्ट होतो. आता तरी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिशाहीन झालेल्या गलबताला किनाऱ्यावर सहीसलामत पोहोचण्यासाठी जशी होकायंत्राची गरज भासते, तशीच भूमिका कठोरपणे का होईना न्यायव्यवस्थेला बजवावी लागत आहे. कोणत्या का मार्गाने होईना रस्ते अपघातमुक्त होण्यासाठी किंवा समाजहिंताच्या अन्य बाबींसाठी न्यायसंस्थेचा असा वचक असायलाच हवा.