शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विशेष संपादकीय : भंडारा अग्नितांडव - कोरडी सहानुभूती नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 07:15 IST

लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही.

भंडारा अग्निकांडात बळी पडलेल्या बालकांच्या शोकव्याकूळ मातापित्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. त्या प्रसंगातील छायाचित्रात त्यांचा चेहरा का झाकण्यात आला, याबद्दलची भूमिका शेजारीच प्रकाशित करण्यात आली आहे. आजच्या अंकातही विरोधी पक्षनेत्यांसह विविध मंत्री व नेत्यांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. यामागचा नेमका हेतू अधिक स्पष्ट करणे गरजेचे आहे. भंडारा जिल्हा रूग्णालयातील आगीत बळी पडलेले कोवळे जीव हे सरकारी अनास्था व उदासीनतेचे केवळ एक उदाहरण आहे. असे अक्षम्य दुर्लक्ष सतत कुठे ना कुठे घडत असतेच. हे कधी थांबणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तेव्हा किमान लोकप्रतिनिधींनी तरी अशा दुर्घटना गंभीरतेने आणि अधिक संवेदनशीलतेने घ्याव्यात, यासाठी कोरड्या सहानुभूतीचे चेहरे प्रसिद्ध न करण्याची भूमिका नाईलाजाने 'लोकमत'ला घ्यावी लागली. 

लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही. आपत्ती अस्मानी असो वा सुलतानी, निष्पाप आणि निरपराधांना न्याय क्वचितच मिळतो. खरे गुन्हेगार कधीच पकडले जात नाहीत. लोक घटना विसरले की पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते. भंडारा अग्निकांडाबाबतही दुर्दैवाने असेच घडत आहे. आता बास्स! लोकांना या प्रकाराचा वैताग आला आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. ‘पत्रकारिता परमो धर्मः’ या न्यायाने समाजाच्या या भावनांची थेट दखल घेणे, जनतेच्या सात्त्विक संतापाला वाट मोकळी करून देणे 'लोकमत'चे कर्तव्य आहे. व्यापक लोकभावनेतून घेतलेली ही भूमिका कोणताही राजकीय पक्ष वा विशिष्ट नेत्यांच्या विरोधात किंवा बाजूने नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेशी बांधिलकी जपावी, प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने कार्यरत व्हावे, व्यवस्थेत सुधारणा घडावी, सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण व्हावे, हा स्पष्ट उद्देश या भूमिकेमागे आहे.     - समूह संपादक

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगUddhav Thackerayउद्धव ठाकरे