शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंतर्गत लाथाळ्या रोखण्यात भाजप नेते अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:43 IST

मिलिंद कुलकर्णी खान्देशातील भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्यांना ऊत आला असून त्याचे प्रदर्शन जळगावात झालेल्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत झाले. या घटनेचे ...

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्यांना ऊत आला असून त्याचे प्रदर्शन जळगावात झालेल्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत झाले. या घटनेचे गांभीर्य असे की, प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर या नेत्यांच्या समोर जिल्हा सरचिटणीस या पदावरील नेत्याला मारहाण, शाईफेक झाली. प्रदेश नेत्यांसमोर भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे वास्तव चित्र यानिमित्ताने आले. अर्थात या घटनेमागील कारणांविषयी वेगवेगळी चर्चा असली तरी प्राथमिक माहितीनुसार हा भुसावळातील अध्यक्षनिवडीचा वाद असल्याचे दिसते. मात्र त्याला अनेक पदर आहेत. अमळनेरपाठोपाठ जळगावात पक्षाच्या व्यासपीठावर हाणामारी झाली; त्या दोन्ही वेळेस गिरीश महाजन हे उपस्थित होते. युती सरकारच्या काळात ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले गेलेले महाजन हे खान्देशात आणि विशेषत: स्वजिल्ह्यात मात्र प्रभाव दाखवू शकलेले नाही. जिल्ह्याचे नेतृत्व खडसे यांच्याकडून महाजनांकडे आल्यानंतरच्या घटना पाहिल्या तरी पक्षातील बेदिली वाढलेली दिसते. नेतृत्व करीत असताना सर्व गटांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची कार्यपध्दती आणि मानसिकता हवी असते, पण तसे घडताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात दोनदा उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. ए.टी.पाटील यांच्याविषयी कथित वाद हा पक्षांतर्गत गटबाजीतून घडल्याची कुजबूज पक्षात आहे. उमेदवार बदलाच्या वादातूनच अमळनेरात माजी आमदार बी.एस.पाटील यांना तत्कालीन जिल्हाध्यक्ष स्व.उदय वाघ यांनी व्यासपीठावर मारहाण केली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी केलेले ठिय्या आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेपूर्वी मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेला तीव्र संताप, आमदारांचे घटलेले संख्याबळ, रोहिणी खडसे यांच्या पराभवाने संतापलेल्या खडसेंनी पक्षनेतृत्वावर केलेली प्रश्नांची सरबत्ती, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत आपल्या नावाला विरोध केल्याचा गौप्यस्फोट, जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीच्यावेळी रवींद्र पाटील या निष्ठावंत कार्यकर्त्यांने घातलेला गोंधळ आणि अर्ज भरण्यातील सावळागोंधळ आणि बंडखोरांपुढे नमते घ्यावे लागणे आणि आता संघटनात्मक निवडणुकांमध्ये पारोळा, भुसावळ, चाळीसगावात निर्माण झालेला असंतोष या सगळ्या घटनांमध्ये महाजन यांना प्रभावशाली आणि दमदार भूमिका निभावता आलेली नाही. त्यांच्या नेतृत्वाची मर्यादा या घटनांमधून अधोरेखित झाली.अमळनेर आणि जळगाव या दोन्ही मारहाणीच्या घटनांच्यावेळी खडसे हजर नव्हते, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. खडसे-महाजन वादामुळे भाजपमध्ये जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघानुसार दरी निर्माण झाल्याचे दिसून येते. महाजन यांचा जामनेर मतदारसंघ हा रावेर क्षेत्रात येत असला तरी ते रावेर मतदारसंघात फारसे लक्ष घालत नाही. आणि खडसे हे जळगाव मतदारसंघाकडे शक्यतो कानाडोळा करतात, असे दिसून आले आहे.भुसावळ तालुकाध्यक्ष निवडीच्या बैठकीच्यावेळी कुºहे पानाचे येथे वाद झाला होता. त्याची दखल जिल्हास्तरीय नेत्यांनी घेणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले गेले. पारोळा, चाळीसगावातही तसेच घडले. परंतु, पक्षनेतृत्वाला तालुकापातळीवर घडणाऱ्या घटनांची माहिती मिळत नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते हे कळायला मार्ग नाही. परंतु, भुसावळात जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र नाराजी आहे. संघटनात्मक बाबी असो की, भुसावळ पालिकेचा कारभार असो नेवे हे मनमानी करीत असल्याची तक्रार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघ तसेच भुसावळ व मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे नियोजन नेवे हे करीत होते. त्यावेळीदेखील नेते व कार्यकर्त्यांना नेवेंनी डावलल्याची तक्रार होती. मात्र एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय असल्याने नेते आणि कार्यकर्ते उघडपणे बोलत नसत. जळगावच्या बैठकीला खडसे येणार नाही, हे आदल्यादिवशी स्पष्ट झाल्याने भुसावळच्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक हे घडवून आणले, असे आता समोर येत आहे. खडसे समर्थकाला मारहाणीपर्यंत मजल जाते, यावरुन भाजपमधील सुंदोपसुंदी कोणत्या थराला पोहोचली आहे, हे स्पष्ट होते.प्रदेश नेतृत्वाने आता याठिकाणी लक्ष न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना रास्त आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव