शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

मान्सूनचा आनंद! १ जूनपासून पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 7:32 AM

भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १ जूनपासून सुरू हाेणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.

अंदाज खरा ठरला की, आनंद हाेताे. खाेटा ठरला की, निराशा येते. गृहीतांमध्ये ऐनवेळी बदल झाल्यास अंदाज चुकतात. ताे खरा की खाेटा ठरविणे कठीण बनते. भारतीय उपखंडावर काेसळणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचेदेखील तसेच आहे. हवामानशास्त्राचा विकास-विस्तार हाेत असल्याने अलीकडच्या काही वर्षांत मान्सूनचा पाऊस किती प्रमाणात हाेईल, याचा अंदाज बांधणे शक्य हाेत चालले आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १ जूनपासून सुरू हाेणाऱ्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. त्यानुसार येत्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा दाेन टक्के अधिकच पाऊस हाेईल, असे म्हटले आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला हाेता. त्यानुसार ५.६ टक्के पाऊस कमीच झाला. भारताच्या अर्थकारणासाठी मान्सूनचा पाऊस फारच महत्त्वाचा ठरताे. कारण भारताची लाेकसंख्या प्रचंड आहे. अन्नाच्या सुरक्षेसाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते. भारताची निम्म्याहून अधिकची लागवडीखालील शेती मान्सूनच्या पावसावर थेट अवलंबून आहे. जी शेती ओलिताखाली आहे तिच्यासाठी  हवे ते पाणी मान्सूनच देताे आहे. लाेकसंख्या आणि अर्थकारण या दाेन मुद्यांचा विचार करता मान्सूनचा पाऊस चांगला हाेणे, तसा अंदाज येणे ही माेठी आनंदाची बातमी ठरते. 

गतवर्षी सरासरी साडेपाच टक्केच पाऊस कमी झाला असला, तरी ताे वेळी-अवेळी झाला. परिणामी, भारतीय पीकपद्धतीला अनुकूल राहिला नाही. त्याचा कृषी उत्पादनावर माेठा परिणाम जाणवला. महाराष्ट्र, कर्नाटकासह काही प्रदेशांत एकही पीक साधले नाही. पाण्याचा साठा झाला नाही. ते प्रदेश आज पिण्याच्या पाण्यासाठी झगडत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यावरील उपाययाेजना आखलेल्या नाहीत. काही सवलती कृषी क्षेत्राला दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची फी माफी केली आहे. वीजबिलाची वसुली आणि कर्जवसुलीसाठी तगादा लावायचा नाही, इतकाच काही ताे दिलासा दिला आहे. वाढत्या लाेकसंख्येबराेबर बदलत्या जीवनपद्धतीत दुष्काळ पडणे आता परवडणारे नाही. दुष्काळ निवारणासाठी खूप माेठा खर्च येताे. अन्न आणि पाणी एवढ्याच माणसांच्या गरजा नाहीत. दरमाणसी पाण्याची गरज वाढली आहे. विजेचा वापर वाढला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. या सर्व निकषांच्या आधारे मान्सूनच्या पावसाकडे पाहिले तर त्याचे महत्त्व अधिकच अधाेरेखित हाेते. त्यासाठी मान्सून वेळेवर येणार, ताे अपेक्षेप्रमाणे काेसळणार याची मान्सूनपूर्व लक्षणे दिसणे हे शुभवर्तमान मानले पाहिजे. 

भारताची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलियन डाॅलर्सवरून पाच ट्रिलियन इतकी माेठी करायची असेल तर मान्सूनची साथ लागणार आहे. पाणी, कृषी उत्पादने आणि अन्न सुरक्षा ही गरज कारखान्यात उत्पादित करून भागविता येणार नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीनुसार, मान्सूनचा पहिला शिडकावा येत्या रविवारी, १९ मे राेजी अंदमान-निकाेबार बेटावर हाेईल. बंगालच्या उपसागरातून ताे पश्चिमेकडे सरकेल आणि नैऋत्य माेसमी वाऱ्यांचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये १ जून राेजी प्रवेश करेल. आपला पावसाचा हंगाम १ जून ते ३० सप्टेंबर आहे. गतवर्षी यातील निम्मे दिवस भाकड गेले हाेते. त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला. मान्सूनच्या परतीचा पाऊस झालाच नाही, त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर हाेऊन गेला. देशाच्या अनेक भागांत खरीप आणि रब्बीचे दाेन्ही हंगाम साधले गेले नाहीत. असंख्य धरणे क्षमतेप्रमाणे भरली नाहीत. पाण्यासाठी माेजपट्टी लावण्याची वेळ आली आहे. हा सर्व मान्सूनच्या लहरीपणाचा फटका आहे. भारतीय उपखंडावर पडणाऱ्या पावसाचा थेट संबंध ज्या नैसर्गिक साधनांवर अवलंबून आहे, त्याचे संवर्धन करण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

शिवाय या मान्सूनच्या पावसाने उपलब्ध हाेणारे पाणी अधिकाधिक साठवून ठेवण्याचे उपाय करावे लागतील. सरासरी पाऊस पडणार म्हणजे आपाेआप पाण्याची उपलब्धता निर्माण हाेणार नाही. ते धरणात, तळ्यात किंवा बंधाऱ्यात साठविण्याइतकेच जमिनीत साठविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सांगली जिल्ह्यातील जतसारख्या काेरडवाहू तालुक्यात यावर्षी पाणीपातळी अकराशे फुटांच्या खाली गेली आहे. जमिनीची चाळण करून पाणी मिळत नसते. चाळणीत काही पडले तर त्याचा पाझर उपयुक्त ठरणारा असू शकताे. तेव्हा मान्सूनच्या आगमनाचा आनंद साजरा करताना त्याचे संवर्धनही कसे उत्तम हाेईल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निसर्ग देत राहणार आणि आपण त्याचे जतन करणार नसू तर मान्सून वेळेवर येण्याच्या आनंदाची बातमी फार काळ दिलासा देणारी नसेल !

 

टॅग्स :monsoonमोसमी पाऊस