शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

झळाळती कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:44 IST

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला.

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला. काल-परवापर्यंत अगदीच लिंबूटिंबू समजल्या जाणा-या विदर्भ रणजी क्रिकेट संघाने त्या दिवशी रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून विदर्भातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची मान ताठ केली. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू महाराजा रणजितसिंह यांच्या नावाने १९३४ मध्ये सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विदर्भाचा संघ फार कमी वेळा आपल्या नावाचा ठसा उमटवू शकला. विदर्भाने रणजी स्पर्धेत पदार्पण केले ते १९५७-५८ च्या हंगामात! तेव्हापासून २००१-०२ मध्ये स्पर्धेचे स्वरूप बदलेपर्यंत, विदर्भाचा संघ मध्य विभागात खेळत असे आणि बहुतांश वेळा विभागीयस्तरावरच त्याचे आव्हान संपुष्टात येत असे. अपवाद फक्त १९७०-७१ आणि १९९५-९६ च्या हंगामाचा! त्या दोन हंगामामध्ये विदर्भ उपउपांत्य फेरीत पोहोचला होता. पुढे २००२-०३ च्या हंगामापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचे विभागीय स्वरूप संपुष्टात आणले आणि त्याऐवजी १५ आघाडीच्या संघांचा समावेश असलेला ‘एलिट’ गट आणि तळातील संघांचा समावेश असलेला ‘प्लेट’ गट, असे नवे स्वरूप स्पर्धेला दिले. त्यानंतर विदर्भाचा संघ २००२-०३ आणि २०११-१२ मध्ये ‘प्लेट’ गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. एवढीच काय ती विदर्भ रणजी संघाची आजवरची चमकदार कामगिरी! एकूण २५९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ ४१ विजय, ८९ पराजय आणि १२९ अनिर्णीत सामने ही आकडेवारी, संघाच्या एकंदर कामगिरीवरील बोलके भाष्य आहे. या पृष्ठभूमीवर, कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! कर्नाटकचा संघ यावर्षी सातत्याने दमदार कामगिरी करीत होता. मोठे सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा भरीव अनुभव त्या संघाच्या गाठीशी होता. अशा संघाला नमविणे ही सोपी गोष्ट नव्हती; मात्र विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंनी ते करून दाखविले. विदर्भ संघाच्या कामगिरीत झालेल्या या लक्षणीय बदलाचे श्रेय नि:संशयपणे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आहे. विदर्भाच्या क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता होतीच; मात्र त्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचे व संघाला विजयाची सवय लावण्याचे काम पंडित यांनी केले. संघात विजिगीषू भावना निर्माण करण्याचे श्रेय कर्णधार फैज फजललाही द्यावेच लागेल. संघाची कामगिरी अंतिम सामन्यातही अशीच बहरो आणि रणजी चषकावर नाव कोरता येवो, हीच शुभेच्छा!

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकRanji Trophy 2017रणजी चषक 2017