शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

संत काव्याचे व्यापकत्व

By admin | Published: January 19, 2017 12:00 AM

संख्यात्मक भूमिकेतून मराठी साहित्यातील आणि काव्य विश्वातील त्यांचे व्यापकत्व अबाधित आहे.

मराठी साहित्यसृष्टीत विचारतत्व आणि प्रबोधनतत्वाने जसे संत साहित्य हे व्यापक आहे तसेच संख्यात्मक भूमिकेतून मराठी साहित्यातील आणि काव्य विश्वातील त्यांचे व्यापकत्व अबाधित आहे. प्राचीन संतकाव्याचे ज्येष्ठ संशोधक जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांनी प्राचीन मराठी संतकवी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, एकंदर जुनी मराठी कविता किती आहे, असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर त्याला मी एवढेच उत्तर देईन की, जगातील दुसऱ्या कोणत्याही भाषेत एवढी कविता नाही. कमीतकमी १५ लाखाहून अधिक जुनी मराठी कविता आज उपलब्ध आहे आणि त्यातील १० लाखाहून अधिक काव्यसंख्या ही केवळ संतकाव्याची किंवा संत कवितेची आहे. त्यात अभंग, गौळण, भारुड, ओवी, पदे, रुपके यांचा समावेश आहे. नुसत्या ज्ञानदेवांची ओवी आणि अभंगरचना १० हजाराहून अधिक आहे. संत एकनाथांनी साठ हजार, रामदासांची दहा हजार, रामी रामदासांची दहा हजार, तुकाराम महाराज साडेचार हजार, नामदेवरायांची तीस हजार, याशिवाय निळोबाराय चोखोबा, जनाबाई, रमावल्लभदास, कृष्णदयार्णव, मुक्तेश्वर, सावतोबा, कान्होपात्रा, दासतुका, नरहरीमहाराज, शेख महंमद, गोरा कुंभार, जगमित्र नागा, माणकोजी बोधला, सेनान्हावी, कान्होपाठक, चांगदेव, बहिरा पिसा या संतांच्या काव्याचा समावेश करावा लागेल. या साऱ्या संतांचा कालखंड हा बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचा आहे. त्या कालखंडातील राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता व छपाईची, प्रसाराची, लोकसंपर्काची माध्यमे नसतानाही त्यांचे काव्य मराठी मुलुखातील सामान्य माणसापर्यंत पोचले होते. काव्याची मुख्य तीन लक्षणे सांगितली जातात. १) प्रसाद २) माधुर्य आणि ३) ओज. मराठी संतांची कविता तिच्यातील भावपूर्ण भक्तिरसामुळे प्रासादिकतेने ओथंबलेली आणि शब्दसौंदर्यामुळे माधुर्याने नटलेली तर प्रबोधनाच्या भूमिकेतून ‘ओज’ तत्वाने भारलेली होती. ज्ञानोबांनी एक सुंदर रुपक मांडले आहे.अंगाचेनि सुंदरपणे। लेणिया अंगचि होय लेणे।तेथ अलंकारिले कवन कवणे। हे निर्वचेना।।एखाद्या सौंदर्यवतीने अंगावर दागिने घालावेत व ती आणखी सुंदर दिसावी. अशा वेळी तिला वाटते की, मी मुळचीच सुंदर आहे. म्हणून माझ्यामुळेच दागिने नटले आहेत व दागिन्यांना वाटते, ही आमच्यामुळे सुंदर दिसते आहे. इथे कुणी कुणाला सुंदर केले वा अलंकारिले हे समजत नाही. तसेच संत काव्यामध्ये भावसौंदर्याने शब्द नटले की, शब्द सौष्टवाने भावतरंग उमटले. हे समजत नाही. पण संत काव्याच्या शब्दसौष्टवाने मराठी भाषा मात्र नटली हे निश्चित.-डॉ. रामचंद्र देखणे