शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

‘पर कॅपिटा हॅपिनेस’ वाढेल?

By admin | Published: September 12, 2016 12:11 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील एक हजार गावांचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांचा आर्थिक सहभाग असेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील एक हजार गावांचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांचा आर्थिक सहभाग असेल. एरवी उद्योगपती वा त्यांची माणसे मंत्रालयात आपापल्या फायली घेऊन फिरत असत. मात्र, एकाच वेळी टाटा, बिर्ला, अंबानी, महिंद्रसारखे उद्योगपती, महानायक अमिताभ बच्चन असे सगळे दिग्गज राज्याच्या विकासाप्रती बांधिलकी व्यक्त करीत मंत्रालयात आले आणि हजार खेड्यांच्या समृद्धीचा संकल्प त्यांनी सोडला. ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, प्रख्यात संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर अशा नामवंतांचीही साथ लाभली. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची तयारी असलेले दानी हात खूप आहेत आणि या दानाची गरज असलेल्या गावांची आणि माणसांची संख्या प्रचंड आहे. या दोघांना जोडणारा विश्वासार्ह दुवा नसणे ही मोठी अडचण आहे. इथे राज्याचे मुख्यमंत्रीच हा दुवा बनले आहेत. विकासाच्या प्रक्रियेत क्षमता असूनही आम्हाला सन्मानाने सामावून घेतले जात नाही अशी उद्योगपती, शास्रज्ञांसह समाजातील विविध घटकांची आजवर खंत होती. यानिमित्ताने ती दूर होण्यास आश्वासक सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात दोन दिवस थांबले. नऊ हजार बेरोजगार तरुण-तरुणींच्या मेळाव्यात तिथल्या तिथे काही कंपन्यांनी अनेक तरुणांना रोजगार दिल्याचे जाहीर केले. अल्पकालावधीचे कौशल्य प्रशिक्षण घेतल्यावर लगेच या तरुणाईच्या हाताला रोजगार मिळणार आहे.या सगळ्या उपक्रमातून दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम वाढेल. पण मुख्य प्रश्न असा आहे की, पर कॅपिटा हॅपिनेस वाढेल का? अस्वस्थ समाजाला आज त्याची कधी नव्हे इतकी आवश्यकता आहे. माणूस पैसा कमावतोय पण आनंद हरवत चाललाय. त्यातून ताणतणाव, हाणामाऱ्या, आत्महत्त्या वाढताहेत. महागाई वाढली पण जीव स्वस्त झालाय. गावांमध्ये विकासाची गंगा वाहायलाच हवी पण सामाजिक आरोग्यही तितकेच सुधारले पाहिजे. विकासाच्या आपल्या कल्पनांची सांगड केवळ श्रीमंतीशी घातली गेली तर भरभराट होईल पण समाज भरकटता कामा नये याचे भान बाळगणे नितांत गरजेचे आहे. उद्या केवळ सहा तासात आपण नागपूरहून मुंबईला पोहोचू पण एकाच मोहल्ल्यातीला दोन माणसांमध्ये कधीही न मिटणारे अंतर राहिले तर सकस समाज कसा घडेल? शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू समाधानी समूह हाच असला पाहिजे.विकास हा पर कॅपिटा हॅपिनेसशी जोडला पाहिजे. इवल्याशा भुतानमध्ये हे होऊ शकते तर आपल्याकडे का नाही? गुप्तचर यंत्रणा सरकारला समाजातील घडामोडी आणि त्यामागील कारणे यांचा फीडबॅक देत राहतील; पण समाजातील व्यक्ती व समूहाची अस्वस्थता सरकारपर्यंत पोहोचवून त्यावरील उपाययोजना अमलात आणणारी स्वतंत्र यंत्रणा सीएसआर फंडातून उभारली पाहिजे. समाजमन कळणाऱ्या सायकॉलॉजिकल कौन्सिलर्सची फळी त्यातून तयार करायला हवी. विकास प्रकल्पांतील गुंतवणुकीइतकेच समाजासमाजात संवाद वाढावा यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ती केवळ पैशांनी साध्य होणारी नाही. जाती-पोटजातींमधील दरी अधिक रुंदावत जाताना केवळ भौतिक विकासाच्या कल्पनांना सरकार वा समाज कवटाळून बसत असेल तर त्यातून श्रीमंत समाजाची उभारणी होईल पण स्वस्थ समाज नॉट रिचेबल झालेला असेल. कोणत्याही जिओ फोरजीने तो सांधता येणार नाही. हादरवून टाकणारी बाब ही आहे की मूक होणे ही समाजाची आज अभिव्यक्ती बनली आहे. व्यक्त होण्याऐवजी समाज मूक होणे पसंत करीत आहे. हा मूकपणा अधिक अस्वस्थ करणारा आहे. सरकार आणि समाजातील प्रबुद्धांनी त्यावर तातडीने उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवराय-फुले-आंबेडकर-शाहूंच्या पुरोगामी महाराष्ट्राने समजूतदारपणाचे बोट सोडलेले देशातील आघाडीच्या या राज्याला आणि पर्यायाने देशालादेखील परवडणारे नाही. - यदू जोशी