शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

जात पंचायतींचे भूत

By admin | Published: March 26, 2016 3:20 AM

न्यायदान हे पवित्र व्रत मानले जाते. त्या व्रताचे पालन करणारा आणि अंमलबजावणी करणारा न्यायी, समतोल वृत्तीचा आणि सत्यनिष्ठेला कायद्याच्या तराजूत तोलणारा असावा

न्यायदान हे पवित्र व्रत मानले जाते. त्या व्रताचे पालन करणारा आणि अंमलबजावणी करणारा न्यायी, समतोल वृत्तीचा आणि सत्यनिष्ठेला कायद्याच्या तराजूत तोलणारा असावा लागतो हे सर्वश्रृतच आहे. परंतु अलीकडे काही जण जात पंचायतींच्या नावाखाली स्वत:लाच न्यायाधीश समजून कायदा हातात घेतात व अत्यंत जाचक स्वरूपाचा न्यायनिवाडा करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम करताना दिसतात. राज्यातील अनेक भागात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजात जात पंचायत नावाची अनेक संस्थाने निर्माण झालेली आहेत. त्यांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा जाच लक्षात घेता ती जात पंचायत की जाच पंचायत असा प्रश्न उपस्थित व्हावा इतकी त्यांनी मजल गाठली आहे. किरकोळ कारणावरून घरातील सुनेला पंचायतीसमोर उभे करणे, आंतरजातीय विवाह केला म्हणून, जागेचे बक्षीसपत्र न दिले म्हणून आणि पंचायतीने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून बहिष्कार आणि वाळीत टाकण्याचे प्रकार महाराष्ट्रात सर्रास घडत असतानाच्या तुलनेत या प्रकारांना आळा घालण्याचे धाडस करायला कोणी धजावत नाहीत. तक्रार केल्यावर कारवाई होणे साहजिक आहे, पण आजही या प्रकारामुळे असंख्य पीडित पंचांनी दिलेला निर्णय प्रमाण मानून मुकाट्याने बहिष्कृताचे जीणे जगत आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात जातपंचायतीचा आदेश डावलल्यामुळे एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना नंदुरबार जिल्ह्यातील एका विधवा महिलेच्या विरोधात चारित्र्यशुद्धीच्या परीक्षेचा फतवा काढण्यात आला होता. त्यात अजून एक भर पडली आहे गुरुवारच्या एका ताज्या घटनेची. दौंड तालुक्यातील वाळीत टाकलेल्या तिघांना समाजात परत घेण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये दंड आणि टक्कल करून गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा सुनावली आहे. समाजाने दिलेल्या अधिकाराचा जर कुणी अशाप्रकारे अतिरेक करीत असेल तर अशा पंचांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात.