शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भीमजयंती साजरी करीत असताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 01:55 IST

बाबासाहेबांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या नरकात पिचत पडलेल्या दलित समाजाची अस्पृश्यतेच्या जखडबंद तुरुंगातून मुक्तता केल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी

बी. व्ही. जोंधळे

‘कोरोना’च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात बसून साजरी करीत आहोत. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात ही पहिली वेळ असावी की, अनुयायांना जल्लोष करून, मिरवणुका काढून जयंती साजरी करता येत नाही. यात काही गैर आहे असेही नाही. कोरोनाचे संकट संपलेले नाही. घरात बसून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना भीमजयंती कशी साजरी करावी, याचे आत्मचिंतन करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. तिचा भीमानुयायांनी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे असे वाटते.

बाबासाहेबांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या नरकात पिचत पडलेल्या दलित समाजाची अस्पृश्यतेच्या जखडबंद तुरुंगातून मुक्तता केल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी वाजत-गाजत त्यांची जयंती साजरी करणे स्वाभाविक आहे; पण प्रश्न असा आहे की, बाबासाहेबांचे आम्ही भक्त आहोत की अनुयायी? भक्त म्हटले की, बाबासाहेबांचे दैवतीकरण करून जयघोष केला की जबाबदारी संपते; पण अनुयायी म्हटले की, त्यांचे विचार कृतीत आणणे अपरिहार्य होऊन बसते. तेव्हा मुद्दा हा की, बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करताना आपण त्यांच्या समग्र सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न खरोखरच साकार केले आहे काय? निदान त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत काय? त्यांनी आयुष्यभर मूल्याधिष्ठित राजकारण केले; पण व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही, तर काळाची गरज ओळखून स्वत:चे स्वतंत्र पक्ष काढले आणि आम्ही? व्यक्तिगत स्वार्थाखातर त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची मोडतोड करून तत्त्वशून्य युती-आघाड्या करीत आलो. आता तरकाय? धर्मांध पक्षाशी युती करून सत्तेच्या खुर्च्या जशा उबवत आहोत, तसेच धर्मांध पक्षांना मदत करणाऱ्या राजकीय रणनीतीही आखत आहोत. बाबासाहेबांनी दलित समाजाला ‘शासनकर्ती जमात व्हा’ असा संदेश दिला. याचा अर्थ वाटेल त्याच्याशी तडजोड करून सत्तेच्या खुर्च्या मिळवा, असा होतो काय? नाही, तर मूल्याधिष्ठित राजकारण करा व प्रसंगी संविधान वाचविण्यासाठी समविचारी पक्षांशी सहकार्य करा, हेच त्यांना अभिप्रेत होते. राजकारणासोबत आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सत्ता मिळवा, जीवनाच्या सर्वांगात प्रवेश करा, असाही त्यांच्या संदेशाचा खरा अर्थ आहे; पण या संदेशाचा सोयवादी अर्थ काढून आपण दलित-शोषित समाजाची फसवणूक करणारे राजकारण करीत आलो. जातिअंत हे बाबासाहेबांचे जीवनध्येय होते. जाती मोडणे ही बहुसंख्याकांची खरी जबाबदारी आहे; पण आपण तरी खरेच जातिमुक्तझालो आहोत काय? राजकारण व धम्म ही माझ्या रथाची दोन चाकं आहेत, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यांच्या राजकीय संकल्पनेची आपण मोडतोड केलीच आहे; पण त्यांनी दु:खमुक्त,शोषणमुक्त समाजाच्या पुनर्रचनेसाठी जो बौद्ध धम्म दिला त्याचे तरी मनोभावे पालन आपण करतो काय? बाबासाहेबांनी प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडले पाहिजे, असे सांगून ठेवले. आपण किती सामाजिक ऋण फेडतो, हे कोण तपासणार? प्रश्न अनंत आहेत. याचे चिंतन भीमजयंतीच्या निमित्ताने तरी करणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न आहे.

दलितेतर पुरोगामी विचारवंतांनीही आत्मशोध घेण्याची गरज आहे. दलितांचे प्रश्न ही राष्ट्रीय समस्या आहे. दलितेतर पुरोगामी विचारवंतांची जबाबदारीही म्हणूनच मोठी आहे. प्रश्न आहे तो, बाबासाहेबांच्या जयंतीस सामाजिक अभिसरणाचे स्वरूप यावे म्हणून ते काय करतात हा! बहुसंख्याक समाजाचे मानसिक परिवर्तन करावयाचे, तर बाबासाहेबांची जयंती त्यांनी त्यांच्या पेठा-वस्त्यांतून साजरी करायला नको काय? दलितविरोधी मानसिकतेची तीव्रता ग्रामीण भागातून मोठी आहे. तिथे जयंती हाच अनेकांच्या पोटदुखीचा विषय असतो. मोठ्या प्रमाणात दलित अत्याचार तिथेच होतात. तेव्हा पुरोगामी विचारवंतांनी किमान जयंती काळात तरी (खरे तर सतत) ग्रामीण भागात जाऊन स्वकीयांचे प्रबोधन करायला नको काय? पण असे होत नाही. बाबा आढावांनी उभारलेल्या ‘एक गाव-एक पाणवठा’च्या धर्तीवर सामाजिक अभिसरणास चालना देणारे उपक्रम राबविले जात नाहीत. तात्पर्य, दलितेतर पुरोगामी विचारवंतांनी ग्रामीण भागात जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.(लेखक राजकीय, सामाजिक विश्लेषक आहेत)

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMumbaiमुंबई