शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना ?

By सुधीर महाजन | Updated: January 11, 2020 11:44 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले.

- सुधीर महाजन 

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना काय झाले आहे? हा प्रश्न जसा प्रसारमाध्यमांना पडतो, तसा औरंगाबादच्या सामान्य माणसालाही पडला आहे. त्याचे उत्तर दुसरे-तिसरे कोणी नसून खैरेच देऊ शकतात; पण ते देणार नाहीत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खैरे हे खासदारांसाठी राखीव आसनावर जाऊन बसले आणि खा. इम्तियाज जलील यांना बाजूला कोपऱ्यात बसावे लागले. शासकीय शिष्टाचारानुसार बैठकीची आसन व्यवस्था असते. तिचे पालन व्हावे हे अभिप्रेत असते आणि राजकारणातील मंडळी तेवढी परिपक्वता दाखवतात. या घटनेनंतर जलील यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यात केवळ खैरे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला नाही, तर शिवसेनेच्या प्रतिमेवर परिणाम झाला.

संगीत खुर्चीची ही घटना काही पहिलीच नाही. यापूर्वी दोन वेळा एकदा एका पंचतारांकित हॉटेलातील बैठकीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीच्या वेळी असाच प्रकार घडला होता; परंतु यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समक्षच ही घटना घडल्याने तिचे गांभीर्य वेगळे आहे. वास्तविक खैरे हे शिवसेनेचे नेते असले तरी कोणत्याही शासकीय पदावर नसल्याने त्यांना अशा प्रशासकीय बैठकांना उपस्थित राहता येत नाही; पण त्यांना टोकणारे प्रशासनातही कोणी नाही. त्यामुळेच असे वारंवार घडते. खरे तर उद्धव ठाकरेंनी त्याचवेळी सावरून घ्यायला पाहिजे होते. कारण यामुळे खैरेंपेक्षा जास्त शिवसेनेचे हसे झाले. ठाकरेंनी खैरेंना टोकले असते, तर ही नामुष्की टळली असती.

गेल्या ३५ वर्षांपासून चंद्रकांत खैरे हे राजकारणात आणि सातत्याने पदावर आहेत. नगरसेवकापासून ते मंत्री आणि खासदार, अशी त्यांची राजकीय कारकीर्द उंचावत गेली आणि सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेला हा पहिलाच पराभव होता. अशा प्रकारातून नव्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडते. जी सध्या तळागाळातून वरपर्यंत फोफावत आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलेसाठी आरक्षण असताना पदाधिकारी महिलेचे अधिकार त्यांचे नवरे सर्रास वापरताना दिसतात. ‘झेरॉक्स पदाधिकारी’ असा या नवरोबांचा चेष्टेने उल्लेख केला जातो; पण त्याचा परिणाम होत नाही. सार्वजनिक जीवनात हा कोडगेपणा सर्रास दिसून येतो.

आता विषय निघालाच, तर औरंगाबादच्या राजकीय संस्कृतीचीही दखल घ्यायला हरकत नाही. ३५/४० वर्षांपूर्वी तत्कालीन राजकीय वातावरणाच्या गरजेतून मुंबईबाहेर औरंगाबादेत शिवसेनेचा उदय झाला. काँग्रेस पक्षाची आत्मभग्नता आणि बेपर्वाई ही औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेच्या उदयाची कारणे आहेत. सेनेने येथे आक्रमक राजकीय संस्कृती आणली आणि ती फोफावली. या आक्रमकपणात राजकीय परिपक्वतेचा ऱ्हास झाला आणि पुढची पस्तीस वर्षे शिवसेनेचे राजकारण या आक्रमकतेभोवती फिरत राहिले. याचा परिणाम या संघटनेवर झाला आणि तो आज प्रकर्षाने जाणवतो. आज सेनेकडे परिपक्व, प्रगल्भ नेतृत्वाची वानवा आहे. भविष्याचा वेध घेणारा उच्चशिक्षित असा एकही नेता मराठवाड्यात सेनेजवळ नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे एखादे द्रष्ट्ये नेतृत्व नाही आणि उगवत्या कार्यकर्त्यांमध्येही कोणी दिसत नाही. चार्टर्ड अकाऊंटंट रोहन आचलिया हे एकच नाव दिसते. या उलट सेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या एमआयएममध्ये खा. इम्तियाज जलील, डॉ. गफार कादरी, डॉ. हाश्मी, नासेर सिद्दीकी ही नावे घेता येतील. भाजपमध्ये तर उच्चशिक्षितांची भलीमोठी यादी आहे. याचाच अर्थ जी संस्कृती सेनेने जोपासली त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. उलट मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा हाताळला असता, तर एमआयएमला त्याचे भांडवल करता आले नसते. खैरे मात्र ही संधी त्यांना वारंवार उपलब्ध करून देतात, त्यांच्यासारख्या राजकारणी व्यक्तीला हे समजत नसावे, असे म्हणणे चूक आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतरही तिच्या आभासात राहत चंद्रकांत खैरे स्वत:लाच फसवत नाहीत ना?

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाImtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन