शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

लाइफस्टाईल बदला!

By admin | Published: December 21, 2014 12:17 AM

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे.

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे. जागतिक स्तरावर हा प्रश्न चिघळला असून, महाराष्ट्रात गतवर्षी व यावर्षी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा त्याचाच परिणाम आहे. मुळात मनुष्यप्राणी निसर्गाला हानी पोचवित असून, वाढत जाणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे दिवसेंदिवस भरच पडत आहे. यावर साधा, सोपा व सरळ उपाय म्हणजेच निसर्गाला हानी पोचविता कामा नये.रत उष्ण कटिबंधातला देश आहे. त्याच्यामुळे शून्य डिग्री सेल्सिअसची जी पातळी असते, ती जमिनीपासून उंचीवर असते. तेव्हा गारा क्वचित पडतात. गारांमुळे पिकांची, जमिनीची पिटाई होते, मोठे नुकसानही होते. म्हणून त्याला गारपीट म्हणतात. हवामान खात्याची आकडेवारी पाहिली किंवा नीट निरीक्षण केले तर असे लक्षात येते, की वर्षात कुठे तरी गारा पडण्याच्या घटना घडतात. हे प्रमाण तसे कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गारपिटीची घटना क्वचित अथवा केव्हा तरी घडत असल्याने तिचे पूर्वानुमान करणे कठीण होऊन बसते, असे म्हटले जाते. मात्र ते तसे नाही. कारण पुढील २४ अथवा ४८ तासांचा अंदाज जर हवामान खाते वर्तवित असेल, तर त्या हवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते आणखी अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक बदल यात फरक आहे. स्थानिक तापमानवाढ होते ती शहरीकरणामुळे. परंतु गेल्या काही वर्षांत यात वाढ झाली. अनेक वेळा होते असे, की महाराष्ट्रातील गारपीट असो वा केदारनाथला झालेली अतिवृष्टी असो, अशा घटनांनंतर आपण घाईघाईने काही तरी निष्कर्ष काढतो. मात्र पर्यावरणात जो मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. महाराष्ट्रात गेल्यावर्षी आणि यावर्षी झालेल्या गारपिटीने शेतकरीवर्गासह पर्यावरणाची देखील हानी झाली. जसे शेतीचे नुकसान झाले आहे तसे ते पशुपक्ष्यांचे देखील झाले आहे.गारपीट झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने तत्परता दाखविली पाहिजे. गारपीट झालेल्या ठिकाणचे दौरे काढून काही होत नसते. कारण अशा घटनांनी शेतकरी आर्थिक आणि मानसिकरीत्या खचलेला असतो. म्हणून भरीव मदतीची आश्वासने देऊन काही होत नाही, तर तत्काळ त्याला मदतीच्या हाताची गरज असते. आणि दुसरे असे, की अशा घटनांकडे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहात नाही. या घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. यासाठी वैज्ञानिक आणि मोसम विभागाने एकत्र काम केले पाहिजे.सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे ते असे, की आपण आपली लाइफस्टाईल बदलली तर सगळे काही ठीक होईल. कारण आपण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी, आरामदायी जीवनासाठी धरतीमातेचा गळा घोटतो आहोत. विकासाचा हव्यास आपणाला विनाशाकडे घेऊन जातो आहे. विकासाची व्याख्या करताना आपण पर्यावरणाला जाणीवपूर्वक बगल दिली आणि अशा विकासाच्या हव्यासामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील सृष्टी नष्ट होते आहे. म्हणून धरतीला ताप आला आहे. ती आजारी पडली आहे. तिचा ताप कमी करायचा असेल तर येथील हरियाली वाढवावी लागेल आणि हा कॉमन सेन्स आहे. कुणाला सांगून ही हरियाली वाढणार नाही. यासाठी तुमचा, माझा आणि प्रत्येकाचा हात पुढे आला पाहिजे.

- डॉ. राजेंद्र सिंह

(लेखक जलपुरुष आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)(शब्दांकन - सचिन लुंगसे)अत्याधुनिक हवामान खाते काळाची गरजहवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.