शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 9:11 AM

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील.

विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील. २०१९ च्या निकालानंतर चमत्कारिक राजकीय घटनांचा सिलसिला सुरू झाला. दोस्त दुश्मन झाले आणि दुश्मन दोस्त होताना आपण बघितले. सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची खिचडी करून ठेवली आहे. आता छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. अर्थात त्याला विधानसभा निवडणुकीची किनार  आहेच. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती; पण, त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या राजकारणाचे समर्थन कसे करणार? छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक आम्हीच असे भासविण्याचे प्रयत्न दोन्हीकडे सुरू आहेत. मुळात गेल्या पाच वर्षांत आताच्या सहा आणि पूर्वीच्या चार प्रमुख पक्षांनी जे काही दगाफटक्याचे राजकारण केले ते छत्रपती शिवरायांच्या कोणत्या विचारांमध्ये बसणारे होते याचे प्रामाणिक उत्तर ज्याचे त्याने द्यावे.

आतापर्यंतच्या वाक‌्युद्धात  वापरलेली भाषा सभ्यतेच्या चौकटीत बसणारी नव्हतीच. सकाळपासून रात्रीपर्यंत कोण कोणापेक्षा खालच्या दर्जाचे बोलतो याची स्पर्धा महाराष्ट्रात दरदिवशी बघायला मिळते. खासगीमध्येही पूर्वीचे राजकारणी एकमेकांबद्दल ज्या भाषेत बोलत नसत, त्याहीपेक्षा खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर जाहीररीत्या केला जात आहे. ‘आमचेच शिवप्रेम कसे जाज्वल्य आणि तुमचे कसे बेगडी’ हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. इतिहासातील संदर्भ देत एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. दर्जाहीन शब्दसंपदा आता संपत चालली म्हणून की काय आता ‘जोडे मारो विरुद्ध खेटर मारो’ असे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांच्याकडून शहाणपणाची अपेक्षा आहे असे बडेबडे नेते एकमेकांच्या फोटोंना जोडे-चपलांनी बडवत आहेत. पायातील वहाणा या पायातच चांगल्या असतात, त्याचा अन्य कारणांसाठी असा गैरवापर करू नये एवढेही शहाणपण कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडे राहिलेले नाही असा त्याचा अर्थ! एक दिवस सांकेतिक आंदोलन करून विषय संपविता आला असता; पण नाही, आता राज्यभर हे आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. राज्यभर ‘जोडे मारो, खेटर मारो’ करत फिरण्याचे समर्थन कसे करणार?

सणासुदीचे दिवस आहेत. गणरायांचे आगमन चार दिवसांवर आले आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे सगळे उत्सवी आणि उत्साही वातावरण असेल. कोणाच्या राजकारणामुळे या वातावरणाला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वपक्षीय नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. ही भूमिका मांडल्यानंतर, ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतरही आंदोलन करायचे नाही काय?’ आणि ‘‘या आंदोलनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही काय?’ असे प्रश्न साहजिकच विचारले जाऊ शकतात. आंदोलन करण्यास काहीही विरोध नाही, फक्त त्यानिमित्ताने एकमेकांना शिवीगाळ करणे, एकमेकांना वहाणांनी मारणे असे प्रकार टाळले तर सामाजिक साैहार्द टिकेल. महाराष्ट्र निवडणुकीकडे जात असताना मध्ये रांगेने सण येणार आहेत. आपल्याकडे राजकारण आणि धार्मिक भावनांची सरमिसळ लगेच होते, हे संवेदनशीलपणे लक्षात घेण्याची गरज आहे. ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पडूनही दंगली कशा घडत नाहीत?’ असे विधान करणे किंवा दररोज वातावरण चिघळेल अशी भडकाऊ भाषा उद्धवसेना, शिंदेसेना किंवा भाजपच्या ‘लाउडस्पीकर’ नेत्यांनी वापरणे तातडीने बंद केले पाहिजे. अशी भाषा प्रत्येक पक्षातील ‘शाउटिंग ब्रिगेड’ वापरतच असते, किंबहुना अशा काही नेत्यांना प्रत्येकच पक्षाने त्यासाठी सोडून दिलेले असते. पण, आता ज्येष्ठ मानले जाणारे नेतेही अशी भाषा वापरू लागले आहेत ही अधिक चिंतेची बाब! एकमेकांविरुद्ध तुम्ही कितीही गरळ ओका, फैसला जनतेच्या दरबारातच होणार आहे. हा दरबारच कोणाला सत्तेत बसवायचे ते ठरविणार आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जाण्याची संधी जनताजनार्दनाकडे मागताना तरी या वहाणा बाहेर ठेेवा. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे सर्वपक्षीय अवमूल्यन झाले, त्याला लोक कंटाळले आहेत. विकास, राजकीय संस्कृती, सभ्यता याबाबत देशाला मार्गदर्शक ठरणारा पूर्वीचा महाराष्ट्र लोकांना हवा आहे. तो असे जोडे, खेटरे एकमेकांवर उगारून नेतेमंडळी देऊ शकणार नाहीत. बिहारच्या राजकारणाला आपण आजवर नावे ठेवत होतो; पण आपण तर त्याच्याहीपेक्षा खालची पातळी गाठत आहोत. हे वेळेत थांबले नाही, तर संत तुकाराम यांच्या भाषेत जनताच राजकारण्यांना ‘मोजोनी माराव्या पैजारा’ असे म्हणेल; ती वेळ येऊ नये एवढेच!

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती