शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

आजचा अग्रलेख: जोडे विरुद्ध खेटरे; शिवपुतळा कोसळणं दुर्दैवी, पण दोन्हीकडच्या राजकारणाचं समर्थन कसं करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 09:16 IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील.

विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत जाईल आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील संघर्षाचे अनेक प्रसंग बघायला मिळतील. २०१९ च्या निकालानंतर चमत्कारिक राजकीय घटनांचा सिलसिला सुरू झाला. दोस्त दुश्मन झाले आणि दुश्मन दोस्त होताना आपण बघितले. सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची खिचडी करून ठेवली आहे. आता छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. अर्थात त्याला विधानसभा निवडणुकीची किनार  आहेच. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती; पण, त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या राजकारणाचे समर्थन कसे करणार? छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक आम्हीच असे भासविण्याचे प्रयत्न दोन्हीकडे सुरू आहेत. मुळात गेल्या पाच वर्षांत आताच्या सहा आणि पूर्वीच्या चार प्रमुख पक्षांनी जे काही दगाफटक्याचे राजकारण केले ते छत्रपती शिवरायांच्या कोणत्या विचारांमध्ये बसणारे होते याचे प्रामाणिक उत्तर ज्याचे त्याने द्यावे.

आतापर्यंतच्या वाक‌्युद्धात  वापरलेली भाषा सभ्यतेच्या चौकटीत बसणारी नव्हतीच. सकाळपासून रात्रीपर्यंत कोण कोणापेक्षा खालच्या दर्जाचे बोलतो याची स्पर्धा महाराष्ट्रात दरदिवशी बघायला मिळते. खासगीमध्येही पूर्वीचे राजकारणी एकमेकांबद्दल ज्या भाषेत बोलत नसत, त्याहीपेक्षा खालच्या पातळीवरच्या भाषेचा वापर जाहीररीत्या केला जात आहे. ‘आमचेच शिवप्रेम कसे जाज्वल्य आणि तुमचे कसे बेगडी’ हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. इतिहासातील संदर्भ देत एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. दर्जाहीन शब्दसंपदा आता संपत चालली म्हणून की काय आता ‘जोडे मारो विरुद्ध खेटर मारो’ असे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांच्याकडून शहाणपणाची अपेक्षा आहे असे बडेबडे नेते एकमेकांच्या फोटोंना जोडे-चपलांनी बडवत आहेत. पायातील वहाणा या पायातच चांगल्या असतात, त्याचा अन्य कारणांसाठी असा गैरवापर करू नये एवढेही शहाणपण कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडे राहिलेले नाही असा त्याचा अर्थ! एक दिवस सांकेतिक आंदोलन करून विषय संपविता आला असता; पण नाही, आता राज्यभर हे आंदोलन करण्याची भूमिका घेतली जात आहे. राज्यभर ‘जोडे मारो, खेटर मारो’ करत फिरण्याचे समर्थन कसे करणार?

सणासुदीचे दिवस आहेत. गणरायांचे आगमन चार दिवसांवर आले आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे सगळे उत्सवी आणि उत्साही वातावरण असेल. कोणाच्या राजकारणामुळे या वातावरणाला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वपक्षीय नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. ही भूमिका मांडल्यानंतर, ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतरही आंदोलन करायचे नाही काय?’ आणि ‘‘या आंदोलनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही काय?’ असे प्रश्न साहजिकच विचारले जाऊ शकतात. आंदोलन करण्यास काहीही विरोध नाही, फक्त त्यानिमित्ताने एकमेकांना शिवीगाळ करणे, एकमेकांना वहाणांनी मारणे असे प्रकार टाळले तर सामाजिक साैहार्द टिकेल. महाराष्ट्र निवडणुकीकडे जात असताना मध्ये रांगेने सण येणार आहेत. आपल्याकडे राजकारण आणि धार्मिक भावनांची सरमिसळ लगेच होते, हे संवेदनशीलपणे लक्षात घेण्याची गरज आहे. ‘छत्रपती शिवरायांचा पुतळा पडूनही दंगली कशा घडत नाहीत?’ असे विधान करणे किंवा दररोज वातावरण चिघळेल अशी भडकाऊ भाषा उद्धवसेना, शिंदेसेना किंवा भाजपच्या ‘लाउडस्पीकर’ नेत्यांनी वापरणे तातडीने बंद केले पाहिजे. अशी भाषा प्रत्येक पक्षातील ‘शाउटिंग ब्रिगेड’ वापरतच असते, किंबहुना अशा काही नेत्यांना प्रत्येकच पक्षाने त्यासाठी सोडून दिलेले असते. पण, आता ज्येष्ठ मानले जाणारे नेतेही अशी भाषा वापरू लागले आहेत ही अधिक चिंतेची बाब! एकमेकांविरुद्ध तुम्ही कितीही गरळ ओका, फैसला जनतेच्या दरबारातच होणार आहे. हा दरबारच कोणाला सत्तेत बसवायचे ते ठरविणार आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जाण्याची संधी जनताजनार्दनाकडे मागताना तरी या वहाणा बाहेर ठेेवा. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे सर्वपक्षीय अवमूल्यन झाले, त्याला लोक कंटाळले आहेत. विकास, राजकीय संस्कृती, सभ्यता याबाबत देशाला मार्गदर्शक ठरणारा पूर्वीचा महाराष्ट्र लोकांना हवा आहे. तो असे जोडे, खेटरे एकमेकांवर उगारून नेतेमंडळी देऊ शकणार नाहीत. बिहारच्या राजकारणाला आपण आजवर नावे ठेवत होतो; पण आपण तर त्याच्याहीपेक्षा खालची पातळी गाठत आहोत. हे वेळेत थांबले नाही, तर संत तुकाराम यांच्या भाषेत जनताच राजकारण्यांना ‘मोजोनी माराव्या पैजारा’ असे म्हणेल; ती वेळ येऊ नये एवढेच!

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती