शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मुख्यमंत्री कोणाचे?

By admin | Published: January 31, 2017 4:59 AM

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते.

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते. त्यात सत्तेच्या हव्यासापायी परस्परांची इतकी उणीदुणी काढली जातात की ते पाहून आणि ऐकून मतदार बुचकळ्यात पडतात. नेत्यांचे खरे रूप कोणते हेच कळेनासे होते. राजसिंहासनासाठी मग कोणाला महाभारत आठवते, त्यातील कौरव-पांडव, शकुनीमामा आठवतात तर कोण कोणाची औकात काढून एकमेकांना पाणी पाजण्याचीही भाषा करतो. कोण कोणाविरुद्ध काय बोलतो या गोष्टी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात (सोयीने) घेऊन वाटचाल करणाऱ्या शिवसेना-भाजपाची युती काल-परवा संपुष्टात आली आणि उभय पक्षांकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्यापर्यंत मजल गेली. सारेच राजकीय पक्ष जनमताचा कौल आजमावण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्याच आयुधांचा वापर करतात. आरोपाला प्रत्त्युत्तर देतात. राजकीय पक्षांपुरते हे ठीक आहे; परंतु राज्याचा प्रथम नागरिक ज्यावेळी इतक्या टोकाची भाषा वापरून वा कोणे एकेकाळच्या मित्रपक्षाला चिथावणी देणारे वक्तव्य करीत असेल तर ते मुख्यमंत्री नेमके कोणाचे, राज्याचे की विधानसभेत ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षाचे असा प्रश्न आम जनतेत उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, या दोन्हीही महनीय पदांवरील व्यक्ती देश आणि राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात, त्यामुळे त्यांनी स्वपक्षाऐवजी त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे असते. लोकशाहीची मूल्ये जर तिचे रक्षण करणारेच अशा रितीने पायदळी तुडविणार असतील तर पक्षाचे प्रमुख किंवा अन्य नेत्यांच्या वक्तव्याबाबत काय अपेक्षा करायची?