शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

या बाळांनो सारे या ! दोन तपांपासूनचा रिवाज

By सुधीर महाजन | Updated: January 21, 2021 09:05 IST

पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली.

लहानपणी घरी कोणी तत्कालीन तथाकथित प्रतिष्ठित आले की, आम्ही आपल्याच घरात अंग चोरून पाण्याचा तांब्या, पेला त्यांच्यासमोर ठेवताच ‘हा कोण मुलगा? नाव काय तुझे? कोणत्या वर्गात शिकतो,’ अशा प्रश्नांची सरबत्ती होताच दडपल्या मनानेच सारे सांगितल्यानंतर आता गणिताची कोडी घालतात का, अशी अनामिक भीती अन्‌ पोटात गोळा आलेला असे. एखादी कविता म्हणून दाखव, असे  म्हणताच  ‘या बाळांनो सारे या’ ही कविता तारस्वरात आम्ही सुरू करीत असू. हा प्रसंग परवा डोळ्यासमोर उभे राहण्याचे कारण म्हणजे पर्यटनमंत्री आणि छोटे ठाकरे आदित्य हे औरंगाबादला आले. रिवाजाप्रमाणे त्यांनी शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील नाणावलेल्या मंडळींची बैठक बोलावली. जसे की पूर्वी बाळासाहेबांनी, फडणवीसांनी, उद्धव ठाकरे यांनी अशा बैठका घेतल्या असल्याने आता हा रिवाजच पडला आहे, तर ही नाणावलेली मंडळीसुद्धा दोन तपांपासून त्याच- त्याच गोष्टी सांगत आहेत. सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात. म्हणजे ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे’ या म्हणीचा प्रत्यय औरंगाबादकरांना सवयीचा झाला आहे. मला तर वाटते तेच सभागृह, त्याच टेबल-खुर्च्या असल्याने ही सगळी भाषणे त्या भिंती, टेबले, खुर्च्यांना तोंडपाठ झाली असतील. आपणच त्यांना बोलण्याची संधी देत नाही.

दोन तपांपासून औरंगाबादची मंडळी पाणी, रस्ते, पर्यटन या त्रिकोणातच अडकून पडली आहे. या त्रिकोणाचा चौथा कोन त्यांना सापडत नाही. या शहराची महानगरपालिका गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगदी परवापर्यंत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होईपर्यंत सेना व भाजप हे दोघे, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ गात महापालिकेत झिम्मा खेळत होते; पण ‘वर्षा’तून बेवारस होताच एकमेकांचे गळे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत याला ‘गच्ची पकडणे’ असेसुद्धा म्हणतात, तर पंचवीस वर्षे शहराची सत्ता उपभोगताना या शहराचे प्रश्न काय आहेत, त्याचा विकास कसा करता येईल. हे माहीत करून घेण्यासाठी शिवसेनेला असे ‘रमणे’ भरवावे लागत असतील, तर पाव शतक त्यांनी काय केले? हा प्रश्न पडतो. पंचवीस वर्षांत या शहराचे वाटोळे केले? एवढेच स्पष्टपणे म्हणता येईल. महापालिकेच्या जागा विकल्या, बळकावल्या. जनकल्याणाचा विचार न करता सरकारी पैसा उधळला. या शहराचे धड नियोजन नाही. ‘आज पाणी येणार’ असा एसएमएस आला की, येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडतो. ही या शहराची अधोगती आहे. 

आदित्य ठाकरेंनीही त्यादिवशी नवेच काही तरी सांगावे म्हणून ‘को-गव्हर्नमेंट’चा जादूचा रुमाल फेकला. तो रंगीबेरंगी रुमाल पाहताच अनेकांच्या डोळ्यात मोरपंखी स्वप्ने उतरली. काहींना या ‘सीओजी’चे डोहाळे लागले. नेमका हा जादूचा रुमाल आहे काय, हे कळण्यापूर्वीच त्याचा गवगवा सुरू झाला. आता पुन्हा एकदा ‘या बाळांनो सारे या.’

-सुधीर महाजन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAaditya Thackerayआदित्य ठाकरे