शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

सामान्य माणसाला ‘बॅंकिंग’बाहेर फेकायचे ठरले आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 9:09 AM

सार्वजनिक क्षेत्रातील बँक-कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात संप पुकारला आहे. संपकरी कर्मचारी संघटनांची बाजू मांडणारे टिपण.

देवीदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेडरेशन

सरकारतर्फे बँकिंग कायदा अधिनियम २०२१ हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाले, तर सरकारतर्फे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार आयडीबीआय आणि  सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण या वर्षात करणे शक्य होईल.” फक्त तीन ते चार बँका सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात येतील आणि उर्वरित सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात येईल”, असे सरकारतर्फे दोन वर्षांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आकड्यांच्या परिभाषेतील  नफ्याबरोबर सामाजिक नफ्यासाठीही काम करतात. जनधन, जीवन सुरक्षा, जीवन विमा, अटल पेन्शन, शेतकरी कल्याण योजना, पीक कर्ज, पीक विमा, बेरोजगारांसाठीची मुद्रा योजना, फेरीवाल्यांसाठीची स्व निधी योजना, कोरोना महामारीच्या काळात छोट्या, मध्यम उद्योग, व्यापार या क्षेत्रांसाठी राबविण्यात आलेली आणीबाणीची मदत योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी सर्व योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण केले गेले, तर इतिहासाची चाके उलट्या दिशेने फिरतील.  खासगी क्षेत्रातील बँका नफा, फक्त नफा, वाट्टेल ते करून नफा यासाठी काम करतात.  या प्रक्रियेत खासगी बँका व्यवहार्यतेच्या नावावर  ग्रामीण भागातील शाखा, मागास भागातील शाखा बंद करतील.  आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना बंद करतील.  शेतीला देण्यात येणाऱ्या कर्जात कपात केली जाईल. एकूणच सामान्य माणसाला बँकिंग आणि पर्यायाने विकासाच्या वर्तुळाबाहेर फेकले जाईल. २०१७ ते २०२१ या चार वर्षांत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सामीलीकरणाचे धोरण अवलंबिले व या प्रक्रियेत  बँकांच्या २४०६ शाखा बंद करण्यात आल्या. यातील ८०७ शाखा ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहेत.  याच काळात खासगी क्षेत्रातील  बँकांनी एकूण १०,९८९ नवीन शाखा उघडल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाले, तर या चार वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४३४ शाखा बंद केल्या आहेत, तर याच काळात खासगी क्षेत्रातील बँकांनी १०३४ नवीन शाखा महाराष्ट्रात उघडल्या आहेत. तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारला  भांडवल उपलब्ध करून द्यावे लागते; या सबबीवर सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे; पण वस्तुस्थिती अशी की, या सर्व बँका या काळात कार्यगत नफा  कमवत होत्या. 

गेल्या १३ वर्षांत या बँकांनी १५.९७ लाख कोटी रुपये कार्यगत नफा कमविला होता. पण थकीत कर्जापोटी करावी लागणारी तरतूद होती १४.४२ लाख कोटी रुपये, ज्यात मोठा वाटा होता मोठ्या उद्योगांचा.  २००१ ते २०२१ या वीस वर्षांत बँकांनी या थकीत कर्जातील ९.८८ लाख कोटी रुपये निर्लेखित म्हणजे राईट ऑफ केले आहेत; ज्यात १० % पेक्षा कमी वसुली झालेली आहे . यातील ५ मोठ्या खात्यात बँकांनी ६८,६०७ कोटी रुपये निर्लेखित म्हणजे राईट ऑफ केले आहेत.  या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी रामबाण उपाय म्हणून दिवाळखोरी कायदा आला.  याअंतर्गत प्रक्रियेत तेरा मोठ्या खात्यात येणे रक्कम होती ४.४६ लाख कोटी रुपये. पण यात वसूल झालेली रक्कम आहे १.६१ लाख कोटी रुपये.  यासाठी बँकांना २.८५ लाख कोटी रुपये एवढ्या रकमेवर पाणी सोडावे लागले आहे.

खासगी बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरच भारतातील बँकिंग व्यवस्थेचा खऱ्याअर्थाने विकास शक्य झाला.  १९६९ मध्ये बँकांच्या शाखा होत्या ८,०००; ज्या आज आहेत १,१८,०००! बँकांच्या  राष्ट्रीयीकरणामुळे सावकारी नष्ट झाली, शेतीचा विकास शक्य झाला, देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनला, रोजगार निर्मिती झाली, बँका खेड्यात, मागास भागात जाऊन पोहोचल्या,  अर्थव्यवस्थेला उभारी आली. १८६९ ते २०२० या काळात खासगी क्षेत्रातील २५ बँका दिवाळखोरीत निघाल्या होत्या.  त्यांना वाचवले ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी. म्हणून बँकिंग तसेच अर्थव्यवस्था स्थिर आहे. 

शेतीचा विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक विषमता, आर्थिक तसेच सामाजिक मागासलेपण हे प्रश्न देशापुढे आहेत. अनेक जनसमूह भूक, गरिबी, दारिद्र्याशी झगडत आहेत.  अशा परिस्थितीत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण केले, तर बँकिंगमध्ये तसेच अर्थव्यवस्थेत अस्थैर्य निर्माण होईल, सामान्य माणूस बॅंकिंग म्हणजेच पर्यायाने विकासाच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल, हे नक्की!

टॅग्स :bankबँकIndiaभारत