शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

समाजाभिमुख उद्योजक

By admin | Published: May 07, 2016 2:34 AM

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी

देशाच्या फाळणीने सर्वस्व गमावण्याची वेळ आली, निर्वासित व्हावे लागले; अशा बिकट समयी दु:खाचा महापूरच ताकद बनून बळ वाढवित राहिला़ त्या खडतर काळात देश घडविण्यासाठी ज्यांनी आकाशाएवढे कर्तृत्व गाजविले त्यामध्ये प्रल्हाद छाब्रिया यांचे नाव ठळकपणे समोर येते. कल्पकतेने आणि सकारात्मक विचारांनी त्यांनी परिस्थितीवर मात केली. आजच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये प्रल्हादजींचा जन्म झाला. वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने घरची सगळी जबाबदारी अंगावर पडली. १० रुपये पगाराची नोकरी करीत असताना देशाची फाळणी झाली. या आघाताने छाब्रिया कुटुंबाला निर्वासित व्हावे लागले. अमृतसरमध्ये नोकरी करीत असताना परिचितांनी पुण्यात बोलावले. अगदी ३० रुपये पगार असलेली चांगली नोकरीही मिळाली; पण उद्यमशीलता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बुधवार पेठेत त्यांनी इलेक्ट्रॉनिकचे दुकान टाकले. कापडविक्री केली. सायकलवर फिरून उपकरणांची विक्री सुरू केली. १९६०च्या दशकात महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाची पहाट फुटत होती. या वेळी फिनोलेक्स केबल या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. देशात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल आणि ठिबक सिंचन यंत्रणा त्यांनी सादर केल्या. फिनोलेक्स पाइपने जगभर झुळझुळ पाणी फिरू लागले. इस्राईलच्या कंपन्यांनाही फिनोलेक्सशी सहकार्याचे करार करावे लागले. अवघ्या ५० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या उद्योगसमूहाची आजची उलाढाल १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फाळणीचे अश्रू अनुभवतानाच माणुसकीचा गहिवरही पाहिलेल्या प्रल्हादजींनी समाजाशी आपली नाळ कायम ठेवली. ते उत्तम मराठी बोलायचे. समाजासाठी सतत काही ना काही करण्याची त्यांना तळमळ होती. सामाजिक क्षेत्रातील कामासाठी त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ व ‘होप फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर’ची स्थापना केली. नवे अभियंते घडविण्यासाठी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन फिनोलेक्स अकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. हिंजवडी येथे इंटरनॅशनल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू केली. रत्नागिरीमध्ये शाळा सुरू केली. उद्योजकतेतून सामाजिक विकासाचा आदर्श त्यांनी घालून दिला. उद्योजकता पेरत, सामाजिक भान बाळगत आपण समाजाचे काही देणे लागतो, असे मानणाऱ्या पुण्यातील उद्योजकतेच्या सुसंस्कृत परंपरेतील एक शिलेदार प्रल्हाद छाब्रिया यांच्या रूपाने गमावला आहे.