शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मोठ्या गाजावाजामागील चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:03 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी आपल्या नव्या अवतारात दिसले तर गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बदलाचे संकेत मिळत आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी आपल्या नव्या अवतारात दिसले तर गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बदलाचे संकेत मिळत आहेत. भाजपा भलेही विधानसभेच्या १६ जागांवरील आपले नुकसान लपविण्यासाठी मते १.२५ टक्क्यांनी वाढल्याचा आनंद साजरा करीत असेल. पण २०१९ ची लोकसभा निवडणूक सोपी नाही, हे मोदींना चांगलेच उमगले आहे. खासदारांना उपदेश देण्याचे त्यांना डावे-उजवे फटकारे मारण्याचे दिवस आता गेले आहेत. आता ते सलोख्याची भाषा बोलू लागले असून, संसद भवनात खासदारांच्या मोठ्या प्रमाणात भेटीगाठी घेत आहेत. पंतप्रधान सत्रादरम्यान त्यांच्या चेंबरमध्ये बसले असल्यास कुठलाही खासदार त्यांना जाऊन भेटू शकतो. त्यांनी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना सांगितले की, ते अक्षरश: २४ तास काम करीत आहेत आणि गुजरातमध्ये १२ डिसेंबरला संपलेल्या वादळी मोहिमेनंतर १५ राज्यांचा दौराही त्यांनी केला. परंतु यावेळी त्यांनी पूर्वीसारखा उपदेश देण्याऐवजी खासदारांना कठोर परिश्रम घेण्याची विनंती केली. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाºयांनासुद्धा इच्छुक खासदारांना भेटण्यास तसेच कार्यकर्त्यांच्या तक्रारी तातडीने दूर करण्यास सांगितले. अर्थात काही नेत्यांचा अहंकार अजूनही कायम आहे. परंतु ही वेळ मतभेद दूर करून नरमाईने घेण्याची आहे, याची मात्र त्यांना कल्पना आली आहे.शरद यादव संपुआचे संयोजक?काँग्रेस गुजरातमध्ये पराभवातही विजयाचा दावा करीत असली तरी, या जुन्या पक्षाने पुढील आव्हानांचा सामना करण्यासही कंबर कसली आहे. बातम्या काहीही असोत, सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट एका नव्या भूमिकेत संयुक्त पुरोगामी आघाडीला(संपुआ)पुनरुज्जीवित करण्यात अधिक सक्रिय होणार आहेत. सोनिया गांधी संपुआच्या अध्यक्षपदी कायम राहतील; पण एक संयोजक इतर पक्षातून निवडला जाणार असून तो उत्प्रेरकाची भूमिका वठवेल, हे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेते शरद यादव यांचे नाव संपुआ संयोजकपदासाठी समोर आले आहे. संपुआ-१ आणि संपुआ-२ दरम्यान कुणीही संयोजक नव्हते. परंतु विरोधी पक्षातून एक संयोजक असणे गरजेचे असल्याचे वाटू लागले आहे. शरद यादव यांना गांधी कुटुंबातून फार उच्च दर्जा देण्यात आला आहे. कारण त्यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाचा त्याग केला आणि आपला आधार तयार केला. काँग्रेस त्यांना राज्यसभेत पाठविण्यास इच्छुक आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तूर्तास भारतातील जातीय राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करीत असून, याची जाण मंडल आयोगाच्या राजकारणामागे राहिलेले शरद यादव यांच्यापेक्षा जास्त कुणाला असणार?काँग्रेसने राकाँ,बसपावर फोडले खापरगुजरातमध्ये युती होऊ न शकल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रारंभी राकाँने २४ जागा मागितल्याने वाटाघाटी फिस्कटल्या. नंतर राकाँ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अशोक गहलोत यांना पक्ष १२ जागांवरही समाधानी राहील, असे संकेत दिले. काँग्रेसने या पक्षाला सहा जागांचा प्रस्ताव दिला होता, जो त्यांनी स्वीकारला नाही. पुढे पुन्हा संपर्क झाला तेव्हा नामांकन मागे घेण्याची तारीख निघून गेली होती. खरे सांगायचे झाल्यास काँग्रेस आणि राकाँ हे दोन्ही पक्ष युतीसाठी उत्सुक नव्हते. त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीसुद्धा २५ जागा मिळाल्यास काँग्रेससोबत समझोत्यास तयार होती. परंतु काँग्रेसने प्रस्तावावर विचार करण्यासही नकार दिला आणि बसपाने स्वबळावर निवडणूक लढविली.शहांनी डॉ. जोशींना वाकून नमस्कार केला तेव्हा...भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाचे अनुभवी नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार केला तेव्हा संसदेचा सेंट्रल हॉल चकित झाला. त्याचे झाले असे की, नुकतेच राज्यसभेत पदार्पण झालेले अमित शहा राज्यसभेतून लोकसभेत जात असताना त्यांना डॉ. जोशी बसलेले दिसले. शहा त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना खाली वाकून नमस्कार केला. जोशींनीही त्यांना आशीर्वाद दिला. उभयतांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.-हरीश गुप्ता‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी