शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
5
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
6
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
7
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
8
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
9
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
10
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
11
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
12
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
13
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
14
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
15
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
17
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
18
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
19
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

संघर्ष आणि तडजोड

By admin | Published: May 19, 2017 2:40 AM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मिळून एखादे आंदोलन मिटवितात, असा एक दुर्मीळ योग शेतकरी संपाच्या निमित्ताने पहायला मिळाला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याने व सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्याने सरकारच्या विरोधात १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाची ठिणगी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून पडली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी हा संप स्थगित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मंत्रालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सरकार आंदोलन मिटविण्याबाबत पुढाकार घेणारच; पण या चर्चेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते हे विशेष ! फडणवीस व विखे यांनी मिळून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडली, असा आरोप किसान क्रांती आंदोलनाने केला आहे. हा आरोप एकदमच दुर्लक्षितता येत नाही. पुणतांबा हे विखे यांच्या प्रभाव क्षेत्रातील गाव आहे. शेतकरी संपाच्या आंदोलनात पुढाकार घेतलेले डॉ. धनंजय धनवटे हे विखेंचे समर्थक आहेत. त्यामुळे विखेंची मदत घेऊन फडणवीस यांनी संप मिटविला, असा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावात ग्रामसभा घेऊन आंदोलन उभारण्याबाबत चळवळ सुरू केली होती. सरकारला निर्णय घेण्यासाठी अगोदरच मुदत देता आली असती. दोन्ही कॉँग्रेसने एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष यात्रा काढली, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या वाटाघाटी विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत होतात, हा सगळाच विरोधाभास आहे. आता दोन्ही कॉँग्रेसनेही आपली संघर्ष यात्रा थांबवून सरकारला निर्णय घेण्यास मुदत देणे सयुक्तिक ठरेल. शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केल्यापासून सरकारची यंत्रणा जागी झाली होती. हे आंदोलन कसे थांबविता येईल याची चाचपणी कृषी विभागाचे अधिकारी करत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवायचे व त्यांची समजूत काढायची अशी रणनीती बहुधा ठरलेली होती. त्यात सरकारला अखेर यश आले. शेतकरी सरकारवर नाराज आहेत, म्हणून ते विरोधकांवर खूश आहे, अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनातून उद्या नवे नेते उभे राहिले तर ते विरोधकांनाही परवडणारे नाही. त्यामुळेच एकीकडे संघर्षाची व दुसरीकडे वाटाघाटीची भूमिका घेतली जाते. मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात फूट पाडत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला. मात्र, कॉँग्रेस अद्याप काहीही बोललेली नाही हेही विशेष !मुख्यमंत्र्यांनी केवळ शेतकरी संपातच नाही, बहुधा कॉँग्रेसमध्येही केव्हाच फूट पाडली आहे. कॉँग्रेस नेत्यांचे संघर्ष आणि तडजोड, असे दोन्ही डगऱ्यांवर हात आहेत.