शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:43 IST

देशात असलेले संशयाचे वातावरण दूर करणे नितांत गरजेचे आहे. जो कोणी आहे व जसा आहे तो इथलाच, याच देशातील आहे, याची जाणीव सदैव ठेवावी लागेल.

- विजय दर्डामला अटल बिहारी वाजपेयींचा एक किस्सा आठवतो. पंतप्रधान झाल्यानंतर एक दिवस संसद भवनातील पं. जवाहरलाल नेहरू यांचा फोटो गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे कृत्य कोणी केले, असा त्यांनी लगेच प्रश्न केला. याची जबाबदारी कोणी घेतली नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी गायब झालेला नेहरूंचा फोटो पुन्हा होता त्या जागेवर लागलेला दिसला! नेहरूजी पंतप्रधान असताना ते विरोधी बाकांवर बसलेल्या अटलजींना बोलण्याची पूर्ण संधी देत असत. हल्लीचे राजकारण याच्या नेमके विपरीत झाले आहे. परस्परांविषयीचा आदर व सन्मान तर बिलकूल राहिलेला नाही. हल्ली दुसऱ्याला कमी लेखण्याचीच चढाओढ सुरू असते. ढळढळीत खोटे बोलले जाते. पण जागरूक जनता सर्व जाणते याचा राजकीय नेत्यांना विसर पडतो.असेच एक धादांत असत्य हल्ली देशाच्या राजकारणाचे अविभाज्य अंग बनू पाहत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशाचा विकासच झाला नाही, असे भाजपाचे बडे नेते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. विकास फक्त भाजपानेच केला, असा त्यांचा दावा आहे. प्रश्न असा पडतो की, सत्तेच्या प्रदीर्घ काळात काँग्रेसने काहीच केले नसेल तर देश आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला कसा? स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश शून्याच्या स्थितीत होता. तेथपासून आताच्या स्थितीपर्यंत देशाला आणणे हे काय सोपे काम होते? पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी औद्योगिक क्रांती व वैज्ञानिक दृष्टिकोन याआधारे देशाच्या विकासाचा भक्कम पाया घातल्याने आपण त्यांचे ऋण मानायला हवे. औद्योगिक कारखाने व पाटबंधारे प्रकल्प हीच विकासाची मंदिरे असल्याची भावना त्यांनी देशात रुजविली. आज भारताची जी औद्योगिक ओळख आहे ती नेहरूजींची देन आहे, हे कोणी नाकारू शकत नाही.जय जवान, जय किसानची घोषणा करणाºया लाल बहादूर शास्त्रींना आपण कसे विसरू शकू? शास्त्रीजींच्या आवाहनावरून त्या वेळी देशाने एक वेळचे जेवण सोडले होते. ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांचेही आपल्याला स्मरण ठेवावेच लागेल. त्यांनी देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे व नद्यांवर मोठ्या संख्येने पूल बांधण्याचे केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते साकारही केले. हल्ली आपण जी दळणवळणाची आधुनिक साधने सराईतपणे वापरतो त्यातील राजीव गांधींचे योगदान विसरून कसे चालेल? आॅटोमोबाइल उद्योगाचे स्वप्न पाहणाºया संजय गांधींनाही आपण कसे दुर्लक्षित करू शकतो? शेतकऱ्यांना स्वाभिमानाने उभे करणारे चौधरी चरणसिंग व देशाला नाजूक आर्थिक स्थितीतून सावरणारे चंद्रशेखर यांनाही विसरून कसे चालेल? जगभरातील देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध जोडणारे इंद्रकुमार गुजराल व खुली अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारे डॉ. मनमोहन सिंग यांना कमी लेखून कसे चालेल?मला आठवते की, एक काळ असा होता की, गरिबांच्या घरी दोन्ही वेळेला चूल पेटेल की नाही याची शाश्वती नसायची. त्यांना वर्षाला किमान १०० दिवस कामाची हमी देणारी रोजगार हमी योजना काँग्रेसनेच सुरू केली. इस्पितळे नव्हती, असतील तर तेथे औषधे व डॉक्टर नसायचे. मी लहानपणी आजोळी जायचो. तेथे जाण्यासाठी संपूर्ण एक दिवस प्रवास करायला लागायचा. आज तेच अंतर एक-दीड तासात कापता येते. गावोगाव रस्त्यांचे जाळे विणणारे अटलजी आपण कसे विसरू?जे लोक काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणतात त्यांनी स्वातंत्र्याच्या वेळी देशाची स्थिती काय होती, हे जरा आठवून बघावे. सर्व लोकांना पोटभर जेवण मिळेल, एवढे अन्नधान्य नव्हते. फळफळावळ तर दूर राहो. त्या काळात कोणी फळे घेऊन जाताना दिसला की त्याला ‘घरात कोणी आजारी आहे का?, असे विचारले जायचे. त्या स्थितीपासून देशाला आजच्या स्थितीपर्यंत आणणे हा काही खेळ नव्हता. पण काँग्रेसने ते करून दाखविले. माहिती अधिकार, अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा हक्क असे अनेक कालजयी निर्णय काँग्रेसनेच घेतले. आता आपण संसदेत चाललेले कामकाज थेट पाहू शकतो, हेही काँग्रेसनेच शक्य केले. राष्ट्रवादाबद्दल बोलायचे तर इंदिरा गांधींना विसरून चालणार नाही. संपूर्ण जगाची पर्वा न करता त्यांनी ज्याप्रकारे पाकिस्तानचे दोन तुकडे केले ते मोठे हिमतीचे काम होते. त्या वेळी पाकिस्तानचे सुमारे एक लाख सैनिक शरण आले होते!असे असूनही काँग्रेसने काहीच केले नाही, असे कसे म्हणता येईल! पण तरीही बिनदिक्कतपणे असे बोलले जाते. आहे की नाही कमाल! आपले नशीब उजळविण्याचा अधिकार प्रत्येकाला नक्कीच आहे. पण इतरांना खाली खेचणे ही तद्दन बेईमानी आहे. मोदी चांगले काम करत असतील तर आपण त्याला चांगले म्हटलेच पाहिजे. मी काँग्रेसी आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उत्तम काम करत आहेत, असे मी नि:संकोचपणे म्हणेन. भले विचारसरणी वेगळी असेल. पण त्याचा अर्र्थ आपण इतरांना कमी लेखावे, असा नाही. आज नेमके तेच होत आहे व त्यामुळे समाज विघटित होत चालला आहे. समाजात शांतता, आपुलकी, सौहार्द नसेल तर घर कसे असेल याचा विचार करा. देशात असलेले संशयाचे वातावरण दूर करणे नितांत गरजेचे आहे. जो कोणी आहे व जसा आहे तो इथलाच, याच देशातील आहे, याची जाणीव सदैव ठेवावी लागेल. राजकारणाची ही मोठी जबाबदारी आहे.

(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)

 

टॅग्स :congressकाँग्रेसJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्रीIndira Gandhiइंदिरा गांधीManmohan Singhमनमोहन सिंगRajiv Gandhiराजीव गांधीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी