शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोना : गांभीर्य हरवू देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:33 IST

मिलिंद कुलकर्णी एखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी ...

मिलिंद कुलकर्णीएखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी मुकाबला करता येईल, असे तत्त्व सांगितले जाते. त्यात तथ्यांश आहे. परंतु, हे करीत असताना संकटाविषयीचे गांभीर्य कायम राहील, उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, सतर्क आणि सजग राहणे आवश्यक आहे, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनासंदर्भात सार्वजनिक आणि वैयक्तीक जीवनातील आमचे वर्तन आणि समाजमाध्यमातून व्यक्त होणारी अभिव्यक्ती पाहिली तर कुठे तरी गांभीर्य हरवत आहे, असे निश्चित वाटते.चिनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. भारत हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा देश असल्याने या संसर्गजन्य आजाराचा सर्वात मोठा धोका आपल्याला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक देशांशी विमानसेवेद्वारे थेट दळणवळण आहे. त्यामुळे महाराष्टÑात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाण त्यात जास्त आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने आणि प्रभावीपणे पावले उचलली आहेत.नागरिक म्हणून आता आमची जबाबदारी आहे की, हा आजार आणखी पसरु नये, वाढू नये. त्यादृष्टीने गर्दी होईल, अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे. रेल्वे आणि एस.टी.च्या फेऱ्या कमी करुन शासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच प्रवास करावा म्हणून बाध्य केले आहे. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल, शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा उद्देश सामूहिकरीत्या संसर्ग होऊ नये, हाच आहे. आठवडेबाजार बंद ठेवायचा असतानाही जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा आठवडे बाजार बुधवारी भरला. गर्दी कमी होती, पण बाजार भरलाच. नियम, निर्बंध आम्ही पाळायचे नाही, आणि साथ पसरली तर शासनाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो.कोरोनाला प्रतिबंध करणारी लस, औषधांवर संशोधन सुरु आहे. रामबाण उपाय अद्याप सापडलेला नाही. हे सगळेच देश सांगत असताना आम्ही मात्र काही देशी उपायांचा प्रचार आणि प्रसार करुन काय साध्य करु इच्छितो हे कळायला मार्ग नाही. समाजमाध्यमांचा यासाठी दुरुपयोग केला जात आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि संदेश तयार करुन दिशाभूल केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही ठळक बाबी स्पष्ट केल्या असताना असे घडत आहे.मास्क आणि सॅनिटायझरची अचानक टंचाई होणे हे स्वाभाविक आहे. अचानक आलेल्या आपत्तीमुळे असे घडू शकते. परंतु, त्याची उपलब्धता होण्यासाठी काही प्रयत्न होणे, पर्याय उपलब्ध होणे यासाठी हालचाली दिसून येत नाही. टंचाई निर्माण झाली की, स्वार्थी मंडळी त्याचा काळाबाजार करतात. यापेक्षा रासायनिक कारखाने, प्रयोगशाळा यांनी पर्यायी जंतुरोधक द्रव्य उपलब्ध करण्यास काही हरकत नाही. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे या बाबी क्लिष्ट असल्याने कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.भारतीय संस्कृती आणि पुराणात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, असा दावा प्रत्येकवेळी करण्याचे वेड अलिकडे वाढले आहे. विज्ञानाचा आधार, प्रयोगातून सिध्द झाल्याचा पुरावा असे काहीही न देता भारतीय पुराणात म्हटले आहे, म्हणजे ते खरेच असे हटवादीपणे म्हटले जाते. कोरोनाचे भाकीत ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी केल्याचे संदेश असेच प्रसारीत होत आहेत. कधी ते संत तुकारामांचे म्हटले जाते तर कधी रामदास स्वामींचे म्हटले जाते. अशा प्रकारांमधून घटनेचे गांभीर्य कमी होते, हे जितक्या लवकर आम्हाला कळेल, तो सुदिन म्हणावा लागेल. 

टॅग्स :Jalgaonजळगाव