शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अवघाची गलबला । फुकाचा धुराळा । कोरोनाच्या नावाने । जमविला गोतावळा ।।

By सुधीर महाजन | Updated: March 14, 2020 20:12 IST

कोणतेही सरकार आव्हानात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन सामोरे जाण्यापूर्वी तयारी करीत असते. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याचा वेडेपणा कोणी करीत नाही.

- सुधीर महाजन

आपण अतिसंवेदनशील झालो आहोत का? एखाद्या आपत्तीला सामोरे जाण्यापूर्वी आपण गर्भगळीत का होतो. समाजाने असे भयभीत होऊन चालणार नाही, एकटा-दुकटा माणूस घाबरला तरी त्याला समाजाचा, आप्तस्वकीयांचा आधार वाटतो; पण जेव्हा समाजच भीतीच्या सावटाखाली सरकायला लागतो त्यावेळी आभासी संकटाचे आपत्तीत रूपांतर होते. त्यावेळी आपल्याजवळ हात-पाय गाळण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून समाजाने भयभीत होऊन चालत नाही. ‘कोरोना’च्या साथीने जगभर हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि दक्षिण गोलार्धापासून उत्तर गोलार्धापर्यंत जगभर भीतीची लहर पसरली. त्याला बळी पडलेल्या संख्येचा आणि त्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केला, तर बळींचा आकडा पाचावर धारण बसण्यासारखा नाही. चीनमध्ये या साथीचा जोर कमी झाला आहे. अशावेळी या आपत्तीचा सामना करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागते, काही खबरदारी घ्यावी लागते आणि जगभरातील शासनकर्ते ती घेत आहेत, कारण ते त्यांचे कर्तव्य आहे. 

कोणतेही सरकार आव्हानात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन सामोरे जाण्यापूर्वी तयारी करीत असते. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याचा वेडेपणा कोणी करीत नाही. त्याच प्रमाणे या साथीचा प्रसार रोखण्यासाठी जगभर प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. कोरोनामध्ये आपल्या देशात आजवर फक्त दोन जणांना प्राण गमवावा लागला. बहुतेक ठिकाणच्या संशयित रुग्णांची चाचणी नकारात्मक आली. सर्दी, पडसे, ताप, खोकला ही लक्षणे इतर साथीच्या किंवा विषाणूजन्य आजाराची असल्याने अशी लक्षणे दिसतात. डेंग्यू किंवा स्वाईन फ्ल्यू, हिवतापाऐवजी कोरोनाची भीती वाटते हा भयगंड किंवा फोबिया निर्माण झाला आहे. आपण वर्षभरातील जिल्ह्यातील साथीच्या रोगात बळी पडलेल्यांची आकडेवारी पाहिली तर औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात स्वाईन फ्ल्यूच्या ६१ रुग्णांपैकी केवळ ४ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या ४५९ रुग्णांपैकी १३ जण मृत्यू पावले. आता दुसरे आकडे पाहू. वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यात ४७९ रस्ते अपघातांमध्ये ५९३ जणांचा बळी गेला. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाड्यात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

हे वास्तव असताना अपघात, आत्महत्या, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू यांच्या कोणत्याच आकडेवारीने आपण घाबरून जात नाही. अपघात रोज घडतात, बळी रोज जातात, शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही असा मराठवाड्यासाठी एकही दिवस नाही. येथे आपली संवेदना बोथट झाली का, असा प्रश्न पडतो आणि ‘कोरोना’च्या धास्तीने आपण सगळेच भुई धोपाटत बसलो. याउलट भाजी विक्रेते, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणारे कर्मचारी, फळ विक्रेते, कंडक्टर असे गर्दीच्या ठिकाणी काम करणारे तोंडाला मास्क लावून, खबरदारी घेत रोजचे व्यवहार पार पाडत आहेत. आरोग्यसेवेतील कर्मचारी चोवीस तास रुग्णांची देखभाल करीत कर्तव्य बजावताना दिसतात. भीतीपोटी एकाही कर्मचाऱ्याने रजा घेतल्याचे उदाहरण नाही. उलट त्यांचे कामाचे तास वाढले आहेत. या सकारात्मक उदाहरणांचे सामान्य माणसाने निरीक्षण केले पाहिजे. कोरोनाची साथ हे संकट आहे; पण हात-पाय गाळण्यासारखे नाही. त्याचा मुकाबला शक्य आहे. तो केला पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस