शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

न्यायालयालाच दया

By admin | Published: January 13, 2016 3:28 AM

ज्या मंत्रिमंडळात मेनका गांधी एक मंत्री असतात त्याच मंत्रिमंडळाचा एक निर्णय पशुंवरील होणाऱ्या संभाव्य अत्याचाराच्या मागणीपुढे मान तुकवितो हे एक आश्चर्यच असताना

ज्या मंत्रिमंडळात मेनका गांधी एक मंत्री असतात त्याच मंत्रिमंडळाचा एक निर्णय पशुंवरील होणाऱ्या संभाव्य अत्याचाराच्या मागणीपुढे मान तुकवितो हे एक आश्चर्यच असताना आता त्या मुक्या प्राण्यांची दया अखेर सर्वोच्च न्यायालयालाच आली आहे. पशुंवरील अत्याचार वा त्यांनी दिली जाणारी क्रूर वागणूक याबाबत देशात अलीकडच्या काळात बरीच जागरुकता आली आहे. त्यामागे ‘पिटा’सारख्या काही स्वयंसेवी संस्थांबरोबरच मेनका गांधींसारख्या काही व्यक्तींचाही मोठा सहभाग आहे. या मंडळींचे प्राणीप्रेम बऱ्याचदा व विशेषत: मोकाट आणि भटक्या कुत्र्यांबाबत जनसामान्यांना तापदायकही ठरत असते. पण लोक ते सहन करतात. अशा स्थितीत केन्द्र सरकारने मागील सप्ताहात बैलगाड्यांच्या शर्यतींवर असलेली बंदी उठविण्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला व तोच आता न्यायालयाने स्थगित ठेवला आहे. दक्षिणेतील जलीकट्टू येथील शर्यती हे त्यामागील तात्कालिक कारण. पण खरे कारण राजकीय. तेथील मतदारांचे बैलगाड्यांच्या शर्यतीवरील प्रेम पाहून्Þा सरकारने हा निर्णय घेतला कारण सरकारला बैलांच्या होऊ शकणाऱ्या छळापेक्षा तेथील मते महत्वाची वाटली. अर्थात प्रश्न केवळ बैलगाड्या किंवा बैलांच्या शर्यतीपुरता मर्यादित नाही. अगदी कबुतरे आणि कोंबड्यांपासून मोठ्या जनावरांपर्यंत शर्यतीच्या नावाखाली त्यांच्यात झुंज लावण्याची व त्यातून विकृत आनंद मिळवायची परंपरा तशी जुनीच म्हणावी लागेल. यात जुगाराचा खेळदेखील मग ओघानेच येतो. याशिवाय आपलेच जनावर शर्यतीत अव्वल ठरावे म्हणून संबंधित लोक वाट्टेल ते उपायदेखील योजीत असतात. पण तरीही या विकृतीला राजमान्यता मिळाली. वास्तविक पाहाता सर्कस ही आजच्या काळात मृतप्राय झालेली एक कला आणि अनेकांच्या रोजगाराचे मोठे साधन आहे. तिच्यातील शिकारखाना हा अबालवृद्धांचा परम आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. सर्कस मालक त्या जनावरांची देखभालही उत्तम करीत असत कारण त्यांचे पोट या प्राण्यांवर अवलंबून असे. सरकारी देखरेखीखालील प्राणी संग्रहालयातील मरतुकड्या वन्य जीवांपेक्षा सर्कसमधील असे जीव तजेलदारच असत. पण त्यांच्यावरील बंदी कायम असताना विकृतीला मान्यता देणे सर्वथा गैरच होते.