शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

पाळणाघर कायदा हवाच

By admin | Published: June 13, 2017 5:13 AM

आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही

आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडावे लागल्याने त्यांना आपल्या मुला-मुलीला सांभाळण्यासाठी पाळणाघराची मदत घ्यावी लागते. मूल अगदी लहान असेल, तर पाळणाघरात त्याला ठेवून जाणे महिलांसाठी फारच गैरसोयीचे ठरते. त्यांचा शारीरिक, मानसिक ताण त्यांच्यावर येतो. अशा महिलांचे प्रमाण मोठे असल्याने खासगी, सरकारी किंवा कोणत्याही संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलात पाचशेपेक्षा जास्त महिला काम करीत असल्यास तेथे स्वतंत्र पाळणाघर चालविणे बंधनकारक करावे, अशी शिफारस राज्य महिला आयोगाने केली आहे. राज्य शासनाने महिलांना दिलासा देण्यासाठी पाळणाघरविषयक कायदा करावा, अशी मागणीही आयोगाने केली आहे. खरे तर विशिष्ट महिला कर्मचारी संख्या असली तर पाळणाघर हवेच, असे नियम आहेत. पण त्यांचे अस्तित्व फक्त कागदोपत्रीच असल्याने यासंबंधी थेट कायदाच करावा, असा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने केला आहे. काही पाळणाघरांत बालकांची हेळसांड होते, काही ठिकाणी तर त्यांना अमानुष मारहाण होत असल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासन, स्वयंसेवी संस्था आणि खासगी व्यक्तींमार्फत चालविण्यात येत असलेली पाळणाघरांसाठी स्वतंत्र कायदा, तसेच कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने नुकताच घेतला होता. पण अद्याप त्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने पाळणाघरांसंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री-राज्यपालांना दिला आहे. मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत शासकीय आस्थापनांतच जिथे पाळणाघरांची सोय नाही, तेथे खासगी क्षेत्रातील याविषयीची उपेक्षा काय वर्णावी?