शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

गाळप की लागवड?

By admin | Published: September 03, 2015 9:51 PM

मुख्यमंत्र्यांनीच आता खुलासा करुन टाकला ते बरे झाले. खरे तर अजून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरु व्हायला दोन-अडीच महिन्यांचा अवकाश आहे.

मुख्यमंत्र्यांनीच आता खुलासा करुन टाकला ते बरे झाले. खरे तर अजून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरु व्हायला दोन-अडीच महिन्यांचा अवकाश आहे. खुद्द सरकारच म्हणते की, अजून आम्ही पावसाची आशा सोडलेली नाही. परतीचा का होईना पाऊस मेहरबानी करुन जाईल, असे अनेकाना वाटते तर सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, पैसेवारीची (त्यांचा शब्द आणेवारी) वाट न पाहता, आत्ताच दुष्काळ जाहीर करुन टाका. महसूल मंत्री म्हणतात, साखर तयार करायला खूप पाणी लागते, तेव्हां गाळप होऊ देणार नाही. त्यांचेच सहकारी मंत्री याला विरोध करतात. पाचामुखी परमेश्वर असतो. इथे डझनामुखी सरकार दिसते. राज्यातील सहकारी साखर उद्योग काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीची पाठराखण करणारा असल्याने तिला नामोहरम करण्याचा हेतु यामागे असेल तर राष्ट्रवादीही तक्रार करु शकत नाही. कारण लोकानीच पाच वर्षांसाठी आपले भवितव्य विद्यमान भाजपा-सेनेच्या सरकारच्या हाती सुपूर्द केले आहे. पण आता मुख्यमंत्री म्हणतात, जिथे प्यायलाही पाणी मिळण्याची मारामार होऊ शकते, तिथे गाळपावरील बंदीचा विचार होऊ शकतो. लागवडीवरील बंदीबाबत त्यांची सूचना संबंधित शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाकडे वळावे अशी आहे. ते होईल तेव्हां होईल. पण मुद्दा तो नाही. महसूल मंत्री खडसे म्हणतात, गाळपावर बंदी लादून गाळपासाठी उभा असलेला ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरु! तो कसा वापरणार? ऊसाचे वाढे किंवा बांडी जनावरे खातात किंवा खाऊ शकतात कारण ते ऊसाच्या तुलनेत मऊ आणि पाणीदार असते. तरीही सधन शेतकरी आणि बडे दूध व्यावसायिक त्याची कुट्टी करुन म्हणजे यंत्रात ते बारीक करुनच जनावरांना खाऊ घालतात. त्याच्यात एक महत्वाचा फायदा म्हणजे चाऱ्याचे नुकसान होत नाही. जनावरे संपूर्ण ऊस मात्र खाऊच शकत नाहीत, त्याची कुट्टीच करावी लागते. सरकारला चिंता छोट्या शेतकऱ्यांची व मोजकी जनावरे बाळगणाऱ्यांची असते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. ते खरे असतेच असे नाही. तरीही अशा लहानांकडे कडबा कुट्टी वा तत्सम साधने नसतातच. मग राखून ठेवलेला ऊस, दुष्काळी भागातील लहान शेतकरी, त्याची जित्राबे व सरकारला वाटणारी या दोहोंची चिंता यांचा मेळ कसा बसू शकतो? सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडेच मोडायचे असेल तर गाळपावर नव्हे लागवडीवरच सरकारने बंदी आणावी. बिना मेहनतीच्या या पिकापायी राजकारणात वाढलेले तण तरी काही प्रमाणात कमी होऊ शकेल.