शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

उन्मादातील धोके

By admin | Published: September 25, 2016 11:42 PM

पाकिस्तानला एकदाचा चांगला धडा शिकवायची साऱ्यांनाच घाई झालेली दिसते. धडा शिकवलाच पाहिजे व त्यावर दुमत होण्याचे कारण नाही

पाकिस्तानला एकदाचा चांगला धडा शिकवायची साऱ्यांनाच घाई झालेली दिसते. धडा शिकवलाच पाहिजे व त्यावर दुमत होण्याचे कारण नाही. पण उन्मादाने धडा शिकवण्याच्या नादात त्याचा उलट परिणाम होण्याचाही धोका असतो. समोरासमोर युद्ध करण्याचा काळ इतिहासजमा झाला असल्याने कूटनीतीचा वापर करायला कोणाचीच हरकत नाही. पण जो करार केवळ द्विपक्षीय नव्हे तर त्रिपक्षीय आहे आणि त्याचा भंग करणे कोणत्याही एका पक्षाच्या हाती नाही. तो करार भंग करण्याची मागणी करणे वा तसा विचार करणे याला उन्माद असेच म्हणतात. १९६० साली पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी अध्यक्ष अयुबखान यांच्यात दोन्ही देशातील नद्यांमधल्या पाण्यावरील हक्क आणि त्यांचे वाटप याबाबत एक करार झाला होता. इंडस म्हणजे सिंधू करार हे त्याचे नाव. पण या करारात जागतिक बँक हा तिसरा पक्षही होता. या करारानुसार पूर्वेकडील बिआस, रावी आणि सतलज या नद्यांवर भारताचा, तर पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर पाकिस्तानचा हक्क मान्य करण्यात आला. परंतु यातील भौगोलिक स्थिती अशी होती की, पाकिस्तानच्या वाट्याला गेलेल्या नद्या भारतातूनच प्रवाहित होत असल्याने भारत त्यांचा प्रवाह रोखून धरून पाकिस्तानमध्ये कृत्रिम जलसंकट पैदा करू शकतो. सिंधू कराराने हा धोका नष्ट केला आणि म्हणूनच जगाच्या पाठीवरील पाणी वाटपाच्या करारांमधील हा सर्वाधिक यशस्वी करार मानला जातो. नेमका हाच करार आता मोडीत काढा आणि पाकचे नाक दाबा अशी मागणी काही लोक करीत आहेत, तर तसे करून दोन्ही देशातील तणावास प्रत्यक्षपणे जबाबदार नसलेल्या पाकिस्तानातील जनसामान्यांना वेठीस धरण्याचे व त्यायोगे मानवतेची हत्त्या करण्याचे काही कारण नाही असा विचार मांडणारेही लोक आहेत. पण हे दोन्ही विचार भावनांनी ओथंबलेले आहेत व आंतरराष्ट्रीय संबंध वा करारामध्ये भावना नव्हे तर वास्तव महत्त्वाचे असते. संबंधित सिंधू करार त्रिपक्षीय असल्याने त्यातील कोणताही एक पक्ष त्याचा भंग करू शकत नाही हे तर खरेच; पण भारताने चुकून तसे केले तर आज पाकिस्तानला कवेत घेणारा चीन तर गप्प बसणारच नाही पण चीनसकट नेपाळ आणि बांगलादेश यांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसू शकेल. नशीब म्हणजे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयानेदेखील करारभंग करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. भारत-चीन दरम्यान असाच पाणी वाटप करार करण्याचे काही दिवसांपासून घाटत आहे व भारतातील एकमेव नदी असलेला ब्रह्मपुत्र चीनच्या नियंत्रणात आहे.