शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

देवत्व जागवणारा नाशिक पॅटर्न

By admin | Published: September 17, 2016 4:41 AM

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही. मूर्तीत पाहिले जाणारे देवपण मनुष्यात उतरण्याची आवश्यकता म्हणूनच प्रतिपादिली जाते आणि आजच्या काळात अनेकविध समस्यांवर तेच लाभदायी ठरू शकणारे आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन न करता त्या मूर्ती महापालिका वा सामाजिक संस्थांकडे दान करण्याच्या नाशिककरांनी जपलेल्या व जोपासलेल्या चळवळीला यंदाही जो भरघोस प्रतिसाद लाभला, तो असाच माणसां-माणसांतील देवत्वाची प्रचिती देणारा तसेच पर्यावरणविषयक समस्येवर उपाय सुचविणारा ठरला आहे. अनंत चतुर्दशीला नदीत विसर्जित केलेल्या मूर्ती काही अंतरापर्यंत वाहात जाऊन नदीकाठी विद्रुपावस्थेत विखरून पडलेल्या आढळून येतात. दहा दिवस ज्या बाप्पाचे मनोभावे पूजन केले त्या बाप्पांच्या विसर्जित मूर्तीची ही विदारक अवस्था प्रत्येक सश्रद्ध मनासाठी वेदनादायीच ठरत असते. प्रत्येकच ठिकाणी हे असे होते. पण नाशकात त्याचे गांभीर्य अधिकत्वाने यासाठी जाणवते की, येथे शहराच्या मध्यवस्तीतून गोदावरी वाहाते. त्यामुळे गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर नदी किनारी जागोजागी आढळणाऱ्या भग्न मूर्तींचे वास्तव जसे समोर येते तसेच जलप्रदूषण व एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर १९९८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने मूर्तिदानाची संकल्पना पुढे आली. नदीपात्रात टाकून दिले जाणारे निर्माल्य गोळा करता करता विसर्जित मूर्तीही दान म्हणून मिळविण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला गेला. त्यास प्रारंभी काहीसा विरोध झाला हे खरे, परंतु या संकल्पनेमागील भूमिका लक्षात आल्यावर गेल्या काही वर्षांपासून मूर्तिदानास प्रचंड प्रतिसादही मिळू लागला. यंदाही अशा लाखो मूर्ती दान केल्या गेल्या. महापालिकेसह सामाजिक संस्था-संघटनाही याकरिता पुढे आल्याने व ‘देव द्या, देवपण घ्या’ अशा विचारप्रवृत्त करणाऱ्या आवाहनामुळे आता विसर्जित गणेशमूर्ती दानाचा ‘नाशिक पॅटर्न’ प्रस्थापित व्हावा, असे यश या चळवळीला लाभलेले दिसून येते.महत्त्वाचे म्हणजे, प्लॅस्टिकच्या पिशवीतून निर्माल्य नदीपात्रात फेकून देणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याबद्दल जनजागृती करीत यंदा अनेक सामाजिक संघटनांनी पाण्यात विलय होणाऱ्या पर्यावरणपूरक निर्माल्य पिशव्या मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचविल्या. त्याखेरीज यंदा प्रथमच पुण्यापाठोपाठ नाशकातही ‘पीओपी’ मूर्तींचे विघटन करू शकणाऱ्या अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचे महापालिकेतर्फे मोफत वितरण करण्यात आले. शहराच्या सहा विभागात चार टनपेक्षा अधिक पावडर वितरित केली गेली. नदीकाठी होणारी गर्दी, नदीतील विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण यासारख्या बाबींना फाटा देण्यासाठी घरच्या घरी बाप्पांच्या विसर्जनाची मानसिकताही जोर धरू पावत असल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. गणेशोत्सव साजरा करताना काही सार्वजनिक मंडळांनी डेकोरेशन व अन्य खर्च न करता जमलेल्या वर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविल्याचेही दिसून आले. सारे काही संपल्याचा निराशावादी उसासा टाकणाऱ्यांनी हरखून जावे, असेच हे चित्र आहे.एकीकडे बाप्पांच्या संदर्भाने या साऱ्या आश्वासक व विवेकवादी उपक्रमांना लोकमान्यता लाभत असताना, या सकारात्मकतेत भर घालणारी आणखी एक बाब जिल्ह्यातील अंदरसूलसारख्या छोट्या गावी घडून आली आहे. शासन अवयवदानाची मोहीम चालवित असताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजप्रणीत श्री संप्रदायाच्या पुढाकारातून अंदरसूलच्या पंचक्रोशीतील सुमारे ७०० गावकऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. बुवा-बाबांबद्दलच्या कुणाच्या धारणा काहीही असोत, परंतु श्रद्धेचा मार्ग रचनात्मक कार्यासाठी कसा प्रशस्त करता येतो, हेच यातून स्पष्ट व्हावे. बाप्पा गणरायाच्या निमित्ताने जागलेले हे समाजभान महत्त्वाचे आहे.- किरण अग्रवाल