शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा

By विजय दर्डा | Updated: April 17, 2023 10:09 IST

Amit Shah's warning to China: भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेचे पडसाद चीनला नक्कीच ऐकू गेले असतील.

- डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

चीनच्या आक्रमक वृत्तीला भारताकडून दिले जाणारे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराइतके कडक असत नाही, असा आरोप भारताच्या देशांतर्गत राजकारणात केंद्र सरकारवर कायमच होत आला. मग सरकार कुठल्याही पक्षाचे असी. सामान्य माणसालाही जवळपास असेच वाटत असते.

मात्र, गेल्या आठवडयात अरुणाचल प्रदेशात लागून असलेल्या सीमेपासून केवळ २९ किलोमीटर अंतरावरील फक्त १,२०० लोकसंख्या असलेल्या किबिथू या शेवटच्या भारतीय गावात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निडर आणि स्पष्ट संदेश दिला आहे. हा १९६२ चा भारत देश नाही. आमची इंचभरही जमीन ... कोणी हडप करू शकत नाही।"

अगदी अलीकडेच चीनने त्यांच्या नकाशावर अरुणाचलमधील आणखी काही शहरांची नावे तिसऱ्यांदा बदलली. हे आम्हाला मान्य नाही, असे भारताने कळविले तेव्हा पुन्हा आरोप झाला की, चीनला इतका मवाळ प्रतिसाद का? त्यानंतर लगेच अमित शाह 'व्हायब्रंट व्हिलेज' योजना सुरू करण्यासाठी किबिथूला पोहोचले. हा व्हायब्रंट व्हिलेज' कार्यक्रम काय आहे? हे आधी सांगितले पाहिजे. सीमेवर वसलेल्या गावांच्या विकासाची हमी देऊन युद्धाची तयारी करत राहणे ही चीनची रणनीती सगळे जग जाणते. अरुणाचलपासून लडाखपर्यंत चीनने रस्ते तयार केले. जेणेकरून सीमेवर जलद गतीने आपले सैनिक पोहोचवता येतील. चीनने नवी गावेही वसवली. याला उत्तर एकच होते की. भारतानेही सीमेवरच्या आपल्या गावांपर्यंत सुविधा पोहोचविल्या पाहिजेत त्यासाठी ४,८०० कोटी रुपयांची एक केंद्रीय योजना मंजूर झाली आहे. केवळ रस्ते बांधण्यासाठी त्यात २,५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. अरुणाचल, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये सीमावर्ती १२ जिल्ह्यातील २,९६७ गावांमध्ये ही व्हायब्रंट व्हिलेज' निर्माण केली जाणार आहेत. किंवियू हे या योजनेतील पहिले गाव! 

किबिथू हेच गाव का? तर जरा इतिहासात डोकावून पाहू.  १९६२ साली याच गावात भारत आणि चीनची भीषण लढाई झाली होती. २१ ऑक्टोबर १९६२ ला विजय दर्डा कुमाऊं रेजिमेंटच्या सहा अधिकाऱ्यांनी कमालीचे शौर्य दाखवून इतिहास निर्माण केला. चिन्यांना मागे हटावे लागले. भारतीय सैन्याच्या इतिहासात या लढाईकडे अत्यंत सन्मानाने पाहिले जाते. केंद्रीय गृहमंत्री 'व्हायचं व्हिलेज' कार्यक्रम सुरू चीनला इशारा देण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. असे मानले जाते, ते त्यामुळेचा अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून हे गाव सुमारे ६०० किलोमीटर दूर आहे. चीनच्या सीमेच्या दिशेने असलेले हे शेवटचे गाव; परंतु नजरिया बदलला आहे हे सांगून अमित शाह म्हणाले, "हे शेवटचे नव्हे तर पहिले गाव आहे.

नजरिया बदलाचा संदेश भारताने 'जी २०' बैठकीतही दिला आहे. चीनने पुष्कळ विरोध केला. परंतु 'जी २०'ची बैठक इटानगरमध्ये झाली. ५० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला. 'जी २०' ची बैठक आता २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल. कदाचित चीन या बैठकीला येणारही नाही परंतु भारताने चीनची पर्वा करण सोडून दिले आहे. १९६२ च्या युद्धात अरुणाचल प्रदेशच्या जवळपास अर्ध्या भागावर चीनने कब्जा केला होता. त्यावेळी या भागाला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी' (नेफा)  म्हणून ओळखले जात असे. १९७२ मध्ये अरुणाचलला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली आणि १९८७ साली ते पूर्ण राज्य झाले. १९६२ च्या युद्धात चीनने केलेल्या कब्जाची गोष्ट मी सांगत होतो. चीनला वाटले असते तर त्यांनी या भागावरील हक्क सोडला नसता; मग चीनने तो भाग परत का दिला? वास्तवात चीनला हे माहीत होते की, झुकणार अरुणाचलमधील लोक चीनचे शासन कधीही स्वीकारणार नाहीत. मोठे दंड होईल म्हणून कब्जा सोडून देण्यात आपले हित आहे हे चीनने जाणले.

मग आता चीन अरुणाचलवर दावा का करतो ? असा प्रश्न निर्माण होईल. चीनला हे माहीत आहे की, भारत आपल्या सर्वांगीण विकासावर सध्या लक्ष देत आहे. अर्थव्यवस्था, उद्योगांपासून पायाभूत सुविधापर्यंत भारताने खूपच मोठी झेप घेतली आहे. हा देश आता पाचवी आर्थिक शक्ती झाला आहे आणि २०४० पर्यंत तिसरी शक्ती होईल. अरुणाचलातील शिओमी जिल्ह्यात युरेनियम शोधण्यात भारताने पुष्कळच प्रगती केल्याचे चीनला माहीत आहे. या प्रगतीने चीनचा भडका उडतो. मग तो भारताचे लक्ष विचलित करण्यासाठी असे चिमटे काढत राहतो, कधीही आपल्या शहरांची नावे परस्पर बदलतो तर कधी भारताचे पंतप्रधान मंत्री अरुणाचलच्या दौऱ्यावर गेले तर विनाकारण त्याला आक्षेप घेतो. कधी सीमेवर उत्पात करतो. आपले जवान चिन्यांना ठोकून काढतात, तर चकमकीत आपले किती सैनिक मरण पावले हेही तो देश सांगत नाही.अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध लढण्यासाठी पॅटन रणगाडे दिले होते आणि आपण त्याचे खेळ करून टाकले हे चीनला ठाऊक नाही काय ?

सीमेवरील गावात जाऊन अमित शाह यांनी चीनला कडक इशारा दिला आहे की, तू जर १०० किलो वजन गटातला पहिलवान असतील तर आम्ही काही १०  किलोचे पहिलवान नव्हे लक्षात ठेव, ६० किलोचा पहिलवान सुद्धा १०० किलो वजनगटातील पहिलवानाला चितपट करतो। शत्रूला आम्ही कमजोर मानत नाही; परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की. तुम्ही डोळे वटारावेत. आम्हाला चिमटे काढावेत १९६२ च्या युद्धात आमच्या सैनिकांकडे शून्यापेक्षा कमी तापमानात घालायचे कपडेही नव्हते. आता आमच्या सैनिकांकडे सहा पदरी गरम कपड़े आहेत आणि ते सियाचीन हिमनदीच्या प्रदेशात पूर्ण वर्षभर पहारा देत असतात. परिस्थिती कशीही असो, आम्ही ना घाबरणार, ना  झुकणार. 

व्यक्तिगत पातळीवर एक भारतीय नागरिक या नात्याने मी चीनला हे जरूर सांगू इच्छितो की, अशा खोड्या काढणे, बंद करावे आणि भगवान बुद्धाच्या रस्त्याने चालावे. बुद्धाला तसेही तुम्ही त्यागलेच आहे. आम्ही मात्र भगवान बुद्ध भगवान महावीर आणि गांधीजींनी दाखवलेल्या रस्त्यानेच आत आहोत. सत्य आणि अहिंसा आमची सर्वात मोठी ताकद आहे. आमच्याकडे सर्व धर्म समभाव आहे. तुम्ही तर धर्म सोडूनच दिला आहे लोक लपून छपून पूजा, प्रार्थना करतात. आमच्याकडे लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले नेतृत्त्व आहे. तुम्ही तर आपल्या लोकांचा आवाज बंद करून टाकला आहे. तुमच्या परी बडखोरी उपजते आहे. ती बंदुकीच्या जोरावर कुठपर्यंत रोखाल ? दुसऱ्याला नष्ट करण्याचे चक्र फिरवाल, तर एक दिवस जग तुमच्याकडचे सामान खरेदी करणे बंद करून टाकील. त्या दिवशी तुम्ही जमिनीवर यात तुमची ताकद आम्ही उत्तम प्रकारे जाणून आहोत. भ्रमात राहू नका. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशindia china faceoffभारत-चीन तणाव