शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

शेण पडले; माती घेऊन उठले !

By admin | Published: June 14, 2017 3:44 AM

मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाची झळ महाराष्ट्रात पोहोचू दिली नाही आणि शेतकऱ्यांचेही तोडग्यावर समाधान झाले ही सरकारच्या

मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाची झळ महाराष्ट्रात पोहोचू दिली नाही आणि शेतकऱ्यांचेही तोडग्यावर समाधान झाले ही सरकारच्या दृष्टीने जमेची बाजू धरता येईल. कर्जमाफीचा मुद्दा निकाली काढताना एकर, गुंठ्याची अट नाही हे बरे झाले. कारण विदर्भ-मराठवाड्यात जमीन जास्त असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. चर्चेचा तपशील जाहीर झाला त्यावेळी ‘तत्त्वत:’ या शब्दावर मोठ्या प्रमाणावर शब्दच्छल झाला. अनेकांनी तर्कवितर्क केले. पुढे हळुहळु तपशील पुढे येत असल्याने त्यातील स्पष्टता दिसायला लागली. आयकर भरणाऱ्यांना यातून वगळल्याचे निश्चित झाले. या निर्णयावर मतभिन्नता होण्याचे कारण नाही; पण कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीत असेल तर त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. हा निर्णय वरवर योग्य वाटत असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांची मुले नोकरदार नाहीत असे म्हणताच येत नाही; परंतु मुलगा नोकरीला लागेपर्यंत घराशी संबंध ठेवतो आणि पुढे विवाह झाल्यानंतर स्वतंत्र होतो अशी अनेक उदाहरणे आहेत. हा नोकरदार आई-वडील शेतीची जबाबदारी स्वीकारत नाही. आई-वडिलांचे आजारपण, शेतीची बी-बियाणे याचा खर्च उचलत नाही. आपण आपला चौकानी संसार यातच शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणी मशगुल असतो. निकषांचा विचार वस्तुस्थिती बरोबर भावनात्मक अंगाने केला तर वास्तवातील दाहकता समोर येते. हे दु:ख अनेक शेतकऱ्यांचे आहे; पण आता या निकषानुसार असे शेतकरी या कर्जमाफीचे लाभधारक ठरणार नाहीत, आंदोलक शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वाची मागणी हमीभावाची होती. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा असे एकत्रित हमीभावाचे सूत्र असावे, हा विषय केंद्र सरकारच्या कार्यक्षेत्रात आहे; पण सध्या तरी हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय विचाराधिन आहे. हमीभावाचा मुद्दा भावनिक नाही त्याची जोड बाजारपेठेच्या अर्थशास्त्राशी आहे आणि याचा विसर नरेंद्र मोदींना पडला. त्यांनीच २०१४ मध्ये चंदीगढ येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात स्वामिनाथन शिफारशीनुसार हमीभाव देऊ, असे आश्वासन दिले होते. बाजारपेठेत स्पर्धा असेल तर कोणत्याही मालाला भाव मिळतो हे तत्त्व आहे. शेतमालाच्या बाजारपेठेचा विचार केला तर येथे विक्रेते शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आणि खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांचे बाजारपेठेवर असलेले नियंत्रण नैसर्गिक म्हणावे लागेल. अर्थशास्त्राच्या नियमानुसार व्यापाऱ्यांना दोष देता येणार नाही. यासाठी सरकारने विक्रेत्यांची संख्या कमी करण्यासाठी शेतकरी कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच शेतमालाच्या बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होईल. मुळात स्वामिनाथन यांनी जे सुचविले ते तसेच्या तसे स्वीकारणे योग्य नाही. स्वामिनाथन हे कृषिशास्त्रज्ञ आहेत त्या अंगाने त्यांनी ही मांडणी केली. सरकारने त्याला अर्थशास्त्रीय जोड दिली पाहिजे. सरकारसुद्धा या आयोगाच्या काही शिफारशींची चर्चा करते; पण स्वामिनाथन यांनी या अहवालात जी निरीक्षणे नोंदविली त्याकडे काणाडोळा करते. या निरीक्षणानुसार देशात सरासरी जमीन धारण केवळ सव्वादोन एकर आहे. याचा अर्थ अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ऐंशी टक्क्यावर असताना सरकारी धोरणात हे कुठेही परावर्तित होताना दिसत नाही. म्हणजे सरकारच्या धोरणात मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत. निरीक्षणानुसार ४० टक्के शेतकरी शेती सोडायला तयार आहेत. हे भीषण वास्तव आहे; पण ते स्वीकारण्याची किंवा त्याला समोरे जाण्याची कोणाची तयारी नाही. समजा या शेतकऱ्यांनी शेती सोडलीच तर शेतीतील अनुत्पादकता वाढणार आणि दुसरीकडे बेकारी. शेतीतून बाहेर पडणाऱ्या या हातांना काम कोठे मिळणार हा प्रश्नच आहे आणि सरकारही ते देऊ शकणार नाही. अशा वास्तवाकडे सरकार पाठ का फिरवते कारण असे प्रश्नच पुढे आंदोलने उभी करतात. हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल कले तर व्यापारी दुसऱ्या राज्यात जाऊन व्यापार करू शकतात; पण शेतकऱ्यांनी जायचे कुठे हा प्रश्न आहेच. सरकारच्या धोरणामुळेच व्यापाऱ्यांचे फावते तर सरकारने संधीच देऊ नये. या उलट व्यापाऱ्यांच्या विरोधातील फसवणुकीचे खटले तातडीने निकाली कसे काढता येतील याचा विचार केला पाहिजे. आंदोलन संपले, काही प्रश्न मार्गी लागले; पण हे शेतकऱ्यांचे आंदोलन होते की उद्रेक याचा उलगडा होणे आवश्यक आहे. उद्रेकाचा संबंध भावनेशी असतो. तेथे विचाराची जोड नसते. भावनेबरोबर विचार आणि वास्तवाचे भान या गोष्टींना आंदोलनात स्थान असते. या संपलेल्या आंदोलनाकडे पाहिले तर त्याची वेळ चुकली. पेरणीच्या तोंडावर ते सुरू झाले. शरद जोशींनी कधीच पावसाळ्यात आंदोलने केली नाहीत. एवढे तरी आंदोलनाच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होते. दुसरे या आंदोलनाला दिशा नव्हती. भावनांच्या कल्लोळातून ते उभे राहिले. काही मागण्या मान्य झाल्या; पण यातून शेती हा व्यवसाय भविष्यात फायद्याचा होईल असे काही दिसत नाही. शेतीत गुंतवणूक कशी वाढेल हे कोणी बोलले नाही. शेवटी शेण जमिनीवर पडले की माती घेऊन उठतेच तसे आंदोलनाचे झाले.